Welcome to the Blog of Department of Psychology at Kanya Mahavidyalaya, Miraj

Friday, 18 February 2022

मानसशास्त्रीय विचारधारा

 

  • आपल्या हावभावांसह कसे बोलायचे हे आपणास कधीच शिकवले जात नाही, परंतु आपल्याला शब्दांद्वारे बोलणे शिकविले जाते.  

                                    - पौल एकमन


  • ज्या लोकांचा आम्ही तिरस्कार करतो त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जर आपला विश्वास नसेल तर आम्ही त्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही.                                   -नोम चॉम्स्की

  • माझ्या पिढीचा महान शोध असा आहे की मनुष्य त्यांच्या मनोवृत्तीत बदल करून आपले जीवन बदलू शकतो.                                                           -  विल्यम जेम्स


  • अप्रभाषित भावना कधीही मरत नाहीत. त्यांना जिवंत पुरले आहे आणि नंतर ते आणखी वाईट मार्गाने बाहेर येतात.

                                         - सिगमंड फ्रायड


  • ज्या लोकांचा असा विश्वास आहे की त्यांच्या जीवनात काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्याची शक्ती आहे, त्या लोकांपेक्षा आरोग्यासाठी अधिक प्रभावी आणि यशस्वी आहेत ज्यांना त्यांच्या जीवनात बदल करण्याची क्षमता नाही यावर विश्वास नाही 

                                        -अल्बर्ट बंडुरा


  • एखादी व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या निष्क्रीय असेल तर तो नैतिकदृष्ट्या मुक्त होऊ शकणार नाही.

                                        -जीन पायगेट

  • तुम्हाला सर्व काही माहित आहे असे कधीही समजू नका. आपण स्वत: ला किती उच्च महत्त्व देता, तरीही स्वत: ला सांगण्याची हिम्मत ठेवा: मी अज्ञानी आहे 

                                           -इवान पावलोव्ह


  • पूर्णत: साध्य नसतानाही आपण उच्च ध्येय राखण्याचा प्रयत्न करून चांगले होऊ.

                                        - विक्टर फ्रेंकल


  • बर्‍याच सामाजिक घटना संदर्भात समजल्या पाहिजेत कारण वेगळ्या झाल्यास त्यांचा अर्थ गमावतो.

                               -सोलोमन अस्च


  • आपल्याला खरोखर काहीतरी समजून घ्यायचे असल्यास ते बदलण्याचा प्रयत्न करा.

                                           -कर्ट लेविन


  • आपल्या अंतःकरणाचे अनुसरण करा परंतु आपल्या मेंदूला आपल्याबरोबर घ्या 

                                         -अल्फ्रेड अँडलर


  • देणे हे प्राप्त करण्यापेक्षा अधिक आनंद देते, कारण ते वंचित आहे असे नव्हे तर देण्याच्या कृतीतून माझे चैतन्य व्यक्त होते.

                                                -एरिक फ्रोम


  • अपरिपक्व प्रेम म्हणतात: "मी तुझ्यावर प्रेम करतो कारण मला तुझी गरज आहे." प्रौढ प्रेम म्हणतात: "मला तुझी गरज आहे कारण मी तुझ्यावर प्रेम करतो".

                                                 -एरिच फोरम


साभार :  https://mr1.warbletoncouncil.org 

Saturday, 29 January 2022

रोगप्रतिकारशक्ती कमी झाली.. कसं ओळखाल?

 संवाद हा आपल्या जगण्यातला अतिशय महत्त्वाचा घटक. कोणी आपल्याशी बोलायला नसलं, आपण एकटे असलो तरी संवाद थांबत नाही. आपण मनातल्या मनात आपल्या स्वत:शी संवाद साधत राहातो. संवादामुळे मन मोकळं होतं, ज्ञान मिळतं, असलेलं ज्ञान  इतरांपर्यंत पोहोचतं. रंजन-मनोरंजन होतं.  माहितीची देवाण घेवाण होते. जगण्यात संवाद नसता तर काय झालं असतं? आपण कसे जगलो असतो, याचा विचार देखील करवत नाही. इतका संवाद महत्त्वाचा आहे. पण म्हणून आपण संवादाकडे खरंच लक्ष देतो का? असा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे आपलं आपल्या शरीराकडे. आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष. शरीराच्या आत विविध क्रिया सुरु असतात. त्या जाणवतही नाही इतक्या त्या सहज होतात. पण त्यात काही अडथळा आल्यास, काही बिघाड झाल्यास त्याची कुणकूण शरीराला लागते. शरीर आपल्याला आरोग्याबाबतीत काहीतरी बिघडलंय हे सांगण्याचा प्रयत्न विशिष्ट लक्षणांद्वारे करत असतं. पण शरीर आपल्याशी साधणाऱ्या संवादाकडे आपण दुर्लक्ष करतो आणि आजारी पडतो. म्हणून तज्ज्ञ म्हणतात, की शरीर काहीतरी सांगत असतं, ते ऐकायला, समजून घ्यायला शिकलात तर निरोगी राहाण्याचा मार्ग सहज सापडतो.  आपण निरोगी आहोत, सशक्त आहोत  हे जसं आपलं शरीर सांगतं तसेच आपल्या आरोग्याचं रक्षण करणारी रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे हे देखील  शरीर आपल्याला सांगत असतं. याकडे जर दुर्लक्ष झालं तर आजारांपासून आपण आपल्या आरोग्याचं रक्षण करु शकत नाही. 


    कोरोना संसर्गापासून आपल्याला रोगप्रतिकारशक्तीची आपल्या आरोग्य राखण्यातली भूमिका किती महत्त्वाची आहे हे कळायला लागलं. विविध प्रकारच्या विषाणुंचा, घातक जिवाणुंचा संसर्ग होण्यापासून केवळ आपल्याकडील रोगप्रतिकारशक्तीच आपल्याला वाचवू शकते असं आरोग्यतज्ज्ञ सांगत आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्याकडे लक्ष देऊन आपली  रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं आपण मनावर घ्यायला हवं. आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती  चांगली की ढासळलेली हे समजून घेण्यासाठी  कुठल्याही बाहेरच्या तपासण्यांची गरज नसते. आपलं शरीर रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याचं विशिष्ट लक्षणांद्वारे सांगत असतं.  लक्षणांद्वारे आपली रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे हे ओळखता येतं. या लक्षणांकडे लक्ष देण्याची, ती वेळेत लक्षात घेऊन वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवून आपण आपल्या आरोग्याचं रक्षण करु शकतो. 


रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याची काही लक्षणे

1. सतत थकवा वाटणं

शारीरिक किंवा बौध्दिक कष्टाचं काम केल्यानंतर शरीराला, मेंदूला थकवा येतो. थोडासा आराम केला, काही खाल्ल्यास ऊर्जा येते.   झोपेतून उठल्यानंतर सकाळी छान वाटतं. ताजंतवानं वाटतं.  पण रात्री खूप वेळ झोपूनही सकाळी आपल्याला जर थकवा वाटत असेल, उत्साह वाटत नसेल , कष्टाचं काम न करताही थकल्यासारखं वाटत असेल, उठल्यानंतरही परत झोपावसं किंवा सुस्त वाटत असल्यास आपली रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे हे समजावं.  रोज व्यायाम केल्यास थकलेल्या शरीरला ऊर्जा मिळते. त्याचा परिणाम रोगप्रतिकारशक्ती वाढण्यावर होतो. पण व्यायाम करुनही थकवा जात नसेल, व्यायाम केल्यानंतरही थकवा जास्त वाटत असल्यास वैद्यकीयतज्ज्ञांचा सल्ला घेण्याइतपत आपली रोग प्रतिकारशक्ती कमी झाली आहे हे समजावं.


2. टिकून रहाणारी सर्दी आणि खोकला

प्रौढ व्यक्तींना वर्षातून दोनदा सर्दी पडसं होणं, खोकला होणं ही सामान्य बाब आहे असं तज्ज्ञ  म्हणतात. सर्दी  खोकला झाल्यावर त्याचा मुकाबला करण्यासाठी शरीर औषधं घेण्याआधीच सज्ज होतं. सर्दी खोकल्याशी नैसर्गिक रित्या लढण्यासाठी आवश्यक ती प्रतिपिंडं ( ॲण्टिबाॅडीज)विकसित करण्यासाठी आणि त्यांच्याशी लढण्यासाठी किमान 3 ते 4 दिवस लागतात. 4-5 दिवसानंतर सर्दी खोकला औषधाशिवायही कमी व्हायला लागतो.  याचं कारण आपली रोगप्रतिकारशक्ती. पण तिच जर कमजोर असेल तर सर्दी खोकला 4-5 दिवसात आपोआप कमी न होता, तो वाढतो, आठवडा उलटून गेल्यावरही टिकून राहातो. दीर्घकाळ टिकून रहाणारी सर्दी आणि खोकला आपली रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याचं सांगते. 


3.  पोटाच्या पचनाच्या समस्या

पचनाचा थेट संबंध हा रोगप्रतिकारशक्तीशी असतो. एखाद्याचं पोट जर कायमच खराब असेल, पचनाशी निगडित समस्या जर एखाद्याला कायमच सतावत असतील तर तज्ज्ञांच्या मते अशी व्यक्ती कधीच निरोगी राहात नाही. वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात की आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या ऊती आपल्या आतड्यात असतात.  वारंवार जुलाब होणं, आतड्यांना सूज येणं, बध्दकोष्ठतेचा त्रास कायम जाणवणं या पोटाशी, पचनाशी निगडित समस्या आपली रोगप्रतिकारशक्ती कमजोर असल्याचं सांगतात.


4. नेहमीपेक्षा जास्त तणाव घेणे

रोगप्रतीकारशक्ती कमी झालेली असल्यास छोट्याछोट्या गोष्टींचा ताण येतो, सोपी सहज कामं करताना चिडचिड होते. ताणतणाव जास्त झाल्यास , चिडचिड होत असल्यास  त्याचा परिणाम म्हणून रोगप्रतिकारशक्ती आणखी कमी होते. आपली रोगप्रतिकारशक्ती ही रक्तातील पांढऱ्या पेशी, लसिका ग्रंथी आणि शरीरातील प्रतिपिंडांवर अवलंबून असते.  मानसिक ताणतणावाचा परिणाम या तिन्ही गोष्टींवर होतो. म्हणून एरवीपेक्षा आपण जास्तच चिडचिड करतोय किंवा सततच्या तणावानं अस्वस्थ वाटत असल्यास आधी डाॅक्टरांकडे जावं. दुर्लक्ष केल्यास कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती आणखी कमकुवत होते. 


5. जखमा भरायला उशीर लागणे

काम करताना, चालताना हातापायाला छोटी जखम झाली तर ती दोन तीन दिवसात भरायला लागते, हे प्रत्येकाला कळतं. पण छोट्या जखमा भरायलाही शरीर जास्त वेळ घेत असेल तर त्याचा संबंध कमी झालेल्या रोगप्रतिकारशक्तीशी असतो.  म्हणून सावध होवून डाॅक्टरांकडे जाणं हा योग्य उपाय ठरतो.


(संदर्भ :  लोकमत)


Monday, 3 January 2022

सोशल मीडिया आणि मेंदू


पहिली पिढी

जिच्या सामाजिक आंतरक्रिया आणि संवाद प्रामुख्याने ऑनलाईन जगात आकाराला येतात, अशी मानवी इतिहासातील पहिली किशोरवयीन पिढी आपण एकविसाव्या शतकात पाहतो आहोत. तिचे भावविश्व सोशल मिडियाने व्यापलेले आहे. या माध्यमाने देहाने दूर असणाऱ्यांना परस्परांच्या जवळ आणले. जीवनातल्या सुख-दु:खाला त्वरित व्यक्त करण्याची संधी दिली. जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटनांची माहिती २४×७ पुरवायची जबाबदारी घेतली. आणीबाणीच्या प्रसंगात तात्काळ मदतीसाठीचे मार्ग उपलब्ध करून दिले. अन्न-वस्त्र-निवारा या शारीरिक गरजांइतकीच ‘संवाद’ ही मूलभूत मानसिक गरज असल्याने ती भागवण्याची मोठीच सोय करणारा हा ‘सोशल मिडिया’ आता केवळ त्यांच्याच नाही तर प्रौढांच्याही जीवनाचा अविभाज्य घटक बनू पाहतो आहे! मात्र, छोट्या-छोट्या सुखांचे आवळे सतत चाखायला देणाऱ्या या सोशल मीडियाला त्याबदल्यात आपण ‘बुद्धीचा कोहळा’ तर काढून देत नाही आहोत ना? प्रश्न थोडा विचित्र वाटेल, पण मेंदूचे अभ्यासक, डॉक्टर्स, मानसोपचारतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, सुजाण पालक या साऱ्यांनाच हा प्रश्न भेडसावतो आहे. एवढेच नव्हे, तर ज्यांनी हा उद्योग यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली त्यांनीही आता ‘जागल्या’ची भूमिका घेत या संभाव्य धोकयांचे स्पष्ट संकेत दिले आहेत.


हि खालील काही उदाहरणे पहा :

१. ‘मादक द्रव्यसेवन आणि जुगार खेळताना मेंदूतील जे चेतामार्ग उत्तेजित होतात, तेच मार्ग स्मार्टफोनवर सोशल मीडिया वापरताना उत्तेजित होतात’ – ख्रिस मारसिलिनो, ‘आय फोन’चे ‘पुश’ नोटिफिकेशन विकसित करणारा तज्ञ


२. ‘मेंदूतील डोपामाइन या चेतरसायनावर आधारीत तात्काळ सुख देणारी जुळणी खऱ्याखुऱ्या सामाजिक संवादास मारक ठरेल हे माहीत असूनही, याच मानवी कमजोरीचा फायदा घेत आम्ही ‘फेसबुक’चे आर्थिक साम्राज्य उभारले. त्याबद्दल मला प्रचंड अपराधी वाटते’. – चामथ पलिहापितीया, माजी व्हाईस प्रेसिडेंट, ‘फेसबुक’ ग्राहक वृद्धी विभाग


३. ‘अवधान क्षमतेचा ऱ्हास/नाश करणारी बलाढ्य अर्थव्यवस्था आम्ही निर्माण केलीयं. आता तिचे धोके समाजाला समजावून सांगत, तिचा सर्व पातळ्यांवर विवेकी वापर वाढावा यासाठी मी प्रयत्नशील आहे’. – ट्रायस्टन हॅरिस, प्रॉडक्ट व्यवस्थापक, ‘गुगल’ कॉर्पोरेशन


४. ‘स्क्रीनच्या वापराने होणाऱ्या अवधान क्षमतेच्या ऱ्हासापासून आपल्या देशाची पुढची पिढी वाचवण्यासाठी शाळांमध्ये स्मार्टफोन वापरण्यावर बंदी घातलेली आहे’. – जिन-मिशेल ब्लॅक्वेर, फ्रान्सचे शिक्षण मंत्री (सप्टेंबर, २०१८ पासून हा कायदा तिथे अंमलात आलाय).


डोपामाईनवर आधारीत उद्योग...


मानवी उत्क्रांतीचा विचार केला तर सुख देणाऱ्या वर्तनाची माणूस पुनरावृत्ती करताना दिसतो. चविष्ट अन्नाची मेजवानी, लैंगिक सुख, केली गेलेली स्तुती अशा अनेक गोष्टींसाठी माणूस हपापलेला असतो. ते मिळाले की डोपामाईन नावाचे रसायन (तांत्रिक भाषेत चेतपारेषक) मेंदूत स्त्रवते आणि सुखाची अनुभूती येते. मात्र, हे हवहवेसे वाटणारे सुख तात्पुरत्या काळापुरते असते. त्यामुळे ते पुन्हापुन्हा मिळावे यासाठी माणूस खटपट करीत राहतो. नेमकी हीच मानवाची कमजोर बाजू सोशल मिडियाने विविध संशोधनांतून सखोल अभ्यासली आहे. त्यांचे फायद्याचे गणितच मुळात जाहिरातींवर आधारलेले असल्याने त्या मिळवण्यासाठी वापरकर्त्यांची नजर सतत स्क्रीनवर खिळवून ठेवण्याची आवश्यकता त्यांना आधी जाणवलेली होतीच. मग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर सुखाची झुळूक सतत निर्माण करण्यासाठी  ‘डोपामाइन’ कार्यन्वित करू शकणारे अत्युच्च दर्जाचे संगणकीय ‘अल्गोरीदम्स’ म्हणजेच प्रोग्राम्स या कंपन्यांनी बनवले आणि अब्जावधी डॉलर्सचा धंदा उभारला! विविध प्रकारचे भाव व्यक्त करणारे इमोजी, रंगीबेरंगी शब्दांच्या-चित्रांच्या-‘गिफ’च्या माध्यमातून केलेले कौतुक, ओळखीच्या व्यक्तींचे सकारात्मक संदेश, चोवीस तास नोटिफिकेशनची आणि अलर्टची सुविधा, भूतकाळातील स्मृतींचे कोलाज उपलब्ध करून देणे, लाईक्सची संख्या देणे, अनेकांशी संपर्क करण्यास सुचवणे, आवडीनिवडीनुसार विविध गोष्टी सतत पुरवत राहणे...किती गोष्टी सांगाव्यात! अशा सुखावणाऱ्या पर्यावरणाची करोडो लोकांना भुरळ पडली नसती तरच नवल! त्यातही तात्कालिक सुखाच्या पाठीमागे धावण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांना तर सोशल मिडियाचे व्यसन लागणेही ओघानेच आले. कोरोनाच्या महामारीने यात भरच घातली आणि आता सोशल मीडिया नियमितपणे न वापरणारे शोधावे लागतील अशी स्थिती आहे.


माणसाची आवड सवयीत कशी बदलते आणि सवय व्यसनात कशी परावर्तित होते याबाबतचे अनेक सिद्धांत मानसशास्त्रातील संशोधकांनी प्रस्थापित केलेले आहेत. त्यातील स्कीनर नावाच्या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने (याने पहिल्या महायुद्धात कबूतरांना प्रशिक्षण देऊन शत्रूपक्षांवर बॉम्ब टाकण्याचा प्रस्ताव अमेरिकन लष्कराला सादर केला होता.) प्रथम सिद्ध करून दाखवलेली ‘बदलती प्रबलन सारणी’ सोशल मीडिया कंपन्या सर्रास वापरताना दिसतात. यात वापरकर्त्याची आशा सतत वाढती राहील आणि तो पुन्हापुन्हा आपल्या वॉलवर येत राहील अशा पद्धतीने त्याला संदेश देण्याची व्यवस्था अतिशय सूत्रबद्ध रीतीने केलेली असते. त्यासाठी जागतिक दर्जाच्या तज्ञांची भलीमोठी फौज कंपन्यांच्या दिमतील असते. ‘डोपामाइन लॅब’ या कॅलिफोर्नियामधील कंपनीच्या अभ्यासानुसार इन्स्टाग्राम नव्या ग्राहकांना मिळणारे सुरुवातीचे ‘लाईक्स’ हेतूपूर्वक दडवून ठेवते की जेणेकरून वापरकर्त्यांचे मन खट्टू होईल आणि ते पुन्हापुन्हा ‘इन्स्टा’वर येतील. नंतर मग एकदम सारे ‘लाईक्स’ दाखवले जातात आणि डोपामाइनचा प्रवाह मेंदूत वाहू लागून ते खूप खुश होताना दिसतात! ‘फेसबुक’ यासाठी शब्दांचे रंग, उडणारे फुगे आदी अनेक क्लृप्त्या सतत लढवत असते. नोटिफिकेशन ‘ऑन’ ठेवण्याचे डिफॉल्ट सेटिंग यासाठीच तर असते. आता आपण म्हणू की छोटे-छोटे विरंगुळयाचे, संवादाचे, विनोदाचे, कौतुकाचे क्षण आपल्याला सोशल मीडिया उपलब्ध करून देत असेल तर छानच आहे की. त्यात बिघडले कोठे? तर्क खरंच बिनतोड आहे पण जरा गंभीर विचार केला तर दुसरी बाजूही समोर येते.


... अवधानक्षमतेचा ऱ्हास


एकाचवेळी अनेक कामांमध्ये लक्ष विभागले जात असेल तर ‘समग्रतेकडून सूक्ष्माकडे’ जाण्याचा प्रक्रियेस खीळ बसते. आपली खोलात जाऊन आकलन करण्याची क्षमता कमी कमी होत जाते आणि दीर्घकालीन स्मृती विकसित होण्यात अडथळा निर्माण होतो. खरेतर कोणत्याही कामातली अत्युच्च गुणवत्ता गाठण्यासाठी त्यात खोलवर बुडी मारावी लागते. आजूबाजूची सारी व्यवधाने गळून पडावी लागतात आणि दीर्घकाळ एकाग्रचित्ताने कार्यरत व्हावे लागते. त्यातूनच  सर्जनशील आनंदाची आणि सार्थकतेची अनुभूती येते. सोशल मिडियावर दीर्घकाळ राहणारी मंडळी या अनुभूतीला पारखी होत आहेत अशी अनेक संशोधने सांगत आहेत (उदा. ली, २०१५). त्यांच्या मेदूतील ऍन्टिरिअर सिंग्यूलर कॉर्टेक्समधील ग्रे मॅटरची दिसून आलेली कमतरता याचेच निदर्शक आहे. नोमोफोबिया (नो मोबाईल फोन फोबिया) असणाऱ्या कुमारांच्या मेंदूमध्ये ‘गाबा’ रसायनाची अतिरिक्तता आणि ‘ग्लुटामेट-ग्लुटामाइन’ची कमतरता आढळल्याने अवधान केंद्रित करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे दक्षिण कोरियन विद्यापीठातील अभ्यासात दिसून आले आहे. कोणतेही काम करत असताना १५ सेकंदांपेक्षा जास्त काळ इतर गोष्टींकडे आपले अवधान गेल्यास मुख्य कामामधल्या चुकांची संख्या लक्षणियरीत्या वाढते असे अनेक संशोधनांचे एकत्रित निष्कर्ष सांगतात. २००० ते २०१३ या कालावधीत कॅनडामधील लोकांच्या अवधान क्षमतेमध्ये ३३ टक्क्यांनी घट झाल्याचा निष्कर्ष ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीच्या २०१५ च्या अहवालात नमूद करण्यात आला आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूलने सोशल मिडियाच्या वापरवृध्दी बरोबरच अवधान अक्षमतेने बाधित विद्यार्थ्यांच्या संख्येतही प्रचंड वाढ होत असल्याचा इशारा दिला आहे. चीनमधील ७००० शालेय विद्यार्थ्यांवरील संशोधनातूनही असेच निष्कर्ष हाती आलेले आहेत. सततच्या सोशल मिडियामध्ये डोकावण्याच्या सवयीमुळे कामातली एकाग्रता वारंवार भंग पावत आहे. त्यामुळे  उत्पादक कार्याचा कालावधी जवळपास ४० टक्क्यांनी कमी होत असून (उदा. मेयर) भविष्याचा सारासार विचार करून बौद्धिक नियमन करणाऱ्या मेंदूमधील प्री-फ्रन्टल कॉर्टेक्सच्या कार्यात गोंधळ निर्माण होतो आहे (लोह व कानाई, २०१५, मोईसाला व सहकारी, २०१६). ‘जगाशी जोडले जात आहोत’ या क्षणभंगूर सुखाच्या लकेरीत बहुतेकांचे या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे.


सोशल मिडियामुळे आपल्याला हवी ती माहिती, फोटो, व्हिडिओ इ. कधीही उपलब्ध होऊ शकणार असल्याने प्रत्यक्ष अनुभव घेताना करावयाचे सूक्ष्म निरीक्षण, होणारी तरल भावनांची निर्मिती, त्रिमीतिय अवकाशाचा विचार आणि त्यातून जगावायचे वर्तमान याकडे माणूस दुर्लक्ष करू लागला आहे. परिणामी, नव्या पिढीला ‘डिजिटल स्मृतिनाश’ नावाच्या नव्या समस्येला तोंड द्यावे लागण्याची भीती शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत (काहानमान, २०११; कासपेरस्की लॅब, २०१५). वास्तविक पाहता, हा ‘केवळ व्यत्यय’ नाहीयं. तो आपल्या मनात एकाचवेळी आपण खूप गोष्टी करतो आहोत असा भ्रमित आनंद निर्माण करतो आहे आणि प्रत्यक्षात मात्र आपल्याला प्राधान्याने करावयाच्या गोष्टींपासून भरकटायला लावतो आहे. त्यामुळे वेळीच सावध होणे आवश्यक आहे.


ताण – भीती – बर्नआउट - नैराश्य...


जेव्हा आपण समाज माध्यमावर सतत सक्रीय राहतो तेव्हा मेंदूकडून ग्लुकोजचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे, सततचा ताण, मानसिक ओझे, काम करताना लवकर थकायला होणे, बर्नआउट/कार्य-क्लांती, सहनशीलता कमी होऊन चटकन चिडचिड होणे आदी वर्तनातील बदल होताना दिसत आहेत. मेंदूत ‘ताण-भीती व त्यांची स्मृती’ असे जाळे विकसित होऊन चिंता, नैराश्य, विचारांमधील अस्पष्टता, वास्तवातील सामाजिक संवाद करताना येणारे अडथळे, झोपेच्या समस्या आदी तक्रारींमधील वाढीबाबतही अनेक संशोधने आपल्याला जागे करू पाहात आहेत (अमेरिकन सायकॉलॉजीकल असोसिएशन सर्वेक्षण; कंझ्यूमर मोबिलिटी रिपोर्ट, २०१५; मॅक्स विन्टरमार्क, न्यूरोरेडिओलॉजिस्ट, स्टॅनफोर्ड विद्यापीठ; ह्यूंग सुक सिओ, न्यूरोरेडिओलॉजिस्ट, कोरिया; लस्टिंग, एंडोक्रोनोलॉजिस्ट).    


विचारप्रक्रियेचे ध्रुवीकरण


सोशल मिडियाच्या वापरकर्त्याला हवी तेवढी पण एकाच प्रकारची माहिती सतत पुरवत राहण्याच्या व्यावसायिक गरजेमुळे आभासी दुनियेतील संवादामध्ये समाजाचे वैचारिक ध्रुवीकरण होतानाही दिसते आहे. समोरासमोर होणाऱ्या संवादातील संवेदनशीलता, आपुलकी, आदर कमी होत जाऊन माणसे आक्रमक, तर्कदुष्ट आणि एकारलेपणाकडे झुकत आहेत. मेंदूमध्ये विचारांचे पूर्वग्रहात आणि कट्टरतेत रूपांतर होऊन सामाजिक सौहार्द आणि विविधतेचा आदर कमी होत चालला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोशल मिडियाच्या बेलगाम व्यवहारावर वाजवी बंधने घालण्याबाबत जनमत तयार करण्याच्या चळवळी हळूहळू मूळ धरू लागल्या आहेत.        


विवेकी वापर शक्य आहे


मानवाच्या प्राणीय स्तरावर कार्यरत असणाऱ्या ‘तात्काळ सुख’ मिळवण्याच्या सहजप्रवृत्तीला समाज-माध्यमांमधून आता ‘सामाजिक दर्जा/स्टेटस’चे रूप प्राप्त झाले आहे. ह्या ‘आभासी दर्जा’मध्ये अडकून न राहता अधिक तारतम्याने वागण्याची निकड समजावून घेण्याची आता हीच वेळ आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या चौथ्या क्रांतीचा हा संक्रमणकाळ आहे. अशा संक्रमणकाळात नेहमीच ‘जुने ते सारे कालबाह्य’ आणि ‘नवे ते सारे सोने’ वाटत असते. अशावेळी योग्य काय अन् अयोग्य काय, चूक काय अन् बरोबर काय, इष्ट काय अन् अनिष्ट काय हे ठरवता येणारा सारासार विवेक निरंतर प्रयत्नांनी रूजवावा लागतो. वैज्ञानिक निरीक्षणांचा आधार इथे विशेषत्वाने उपयुक्त ठरतो. सोशल मिडियाने मेंदूलाच ‘लक्ष्य’ केल्याने अवधानक्षमतेबाबत आधुनिक विज्ञान काय सांगते हे पाहणे म्हणूनच कळीचे आहे. ज्याप्रमाणे पैसा हे आर्थिक व्यवहाराचे चलन आहे आणि ते काटकसरीने वापरून आपण आपली प्रगती साधायला शिकलो त्याप्रमाणेच ‘अवधानक्षमता’ हे बौध्दिक व्यवहाराचे चलन आहे! निसर्गाने आपल्याला ते मर्यादीत स्वरूपात दिलेले आहे हे उत्क्रांतीच्या वैज्ञानिक अभ्यासात अधोरेखितही झालेले आहे. सोशल मिडियाच्या आहारी जाऊन तिची उधळपट्टी न करता आपल्या संपन्न आणि समाधानी आयुष्यासाठी ते पैशासारखेच जपून वापरणे म्हणूनच शहाणपणाचे ठरणार आहे. उन्नत अशी मानवी स्तरावरील दीर्घकालीन उद्दिष्टांची निर्मिती करणे, ध्येयपूर्तीसाठी निरंतर ‘लगे रहो’ची वृत्ती घडवणे, प्रतिकूल परिस्थितीतही निर्धाराने उभे राहण्याची ताकद कमावणे आदींसारख्या कुवती विकसित करण्यासाठी अवधानक्षमतेचाच प्रमुख आधार आपल्याला असणार आहे. जागतिक स्पर्धेचे २१ वे शतक छोट्या-छोट्या मोहांना वा व्यत्ययांना बळी न पडता ठरवलेल्या कार्यावर दीर्घकाळाकरता लक्ष केंद्रित करून ते उत्कृष्टरित्या पार पाडणाऱ्यांनाच करिअर बहाल करणार आहे. ‘सोशल मिडियाची आकर्षक भूल’ विरुद्ध ‘स्वयं-शिस्तीचे व्यवधान’ या नव्या द्वंद्वाची सोडवणूक कठोर आत्मपरीक्षणाने शक्य होणार आहे. नोटिफिकेशन ऑफ करणे, स्क्रीनचा प्रकाश मंद करणे, उठसूट स्क्रीन पाहून संदेश पाठवण्यावर लगाम घालणे आदींसारख्या नव्या सवयी आता अंगिकाराव्या लागणार आहेत. स्मार्टफोनमध्ये व्यसनी बनविण्याचे अंगभूत गुण असल्याने आपण ‘मानसिक आजारी तर बनत नाही ना’ हा प्रश्न रोखठोक पद्धतीने विचारावा लागणार आहे. सोशल मिडियावर जाण्याऐवजी पुस्तक वाचणे, वाद्य वाजवणे, मैदानावर खेळणे, न थांबता सलग ३० मिनिटे लिहीणे, गाणे गाणे, व्यायाम करणे, नवी भाषा शिकणे, छंदासाठी पुरेसा वेळ देणे, छोटे- छोटे समाजोपयोगी कार्य करणे, ध्यान करणे, निसर्गात भटकंती करणे, फोटोग्राफी करणे, चित्रे काढणे, नृत्य करणे... अशा कितीतरी उत्पादक गोष्टींची कास धरावी लागणार आहे. दिवसातून विशिष्ट वेळीच सोशल मिडियावर जाणे आणि आठवड्यातून काही दिवस ‘नो सोशल मीडिया डेज’ म्हणून साजरे कराणे ही काळाची गरजसुद्धा ओळखावी लागणार आहे. मेंदूचे आरोग्य तो तरतरीत, तल्लख आणि सर्जनशील राहण्यात आहे ही खूणगाठ मनाशी बांधून आपण सोशल मिडियाचा विवेकी वापर करू शकलो तरच नवे तंत्रज्ञान रुजवू पाहात असलेल्या माहिती-क्रांतीच्या संक्रमणकाळाला सकारात्मक प्रतिसाद दिला असे आपण ठामपणे म्हणू शकू.


- प्रा. डॉ. शिरीष शितोळे, मानसशास्त्र विभाग, महावीर महाविद्यालय, कोल्हापूर

Monday, 27 December 2021

रत्नपारखी


दुसऱ्यांशी चांगले वागूनही लोक आपल्याशी वाईट का वागतात?  जाणून घ्या कारणं...

आपण चांगले तर जग चांगले, ही थोरामोठ्यांची शिकवण आपण अंमलात आणतो. परंतु बरेचदा अनुभव असा येतो, की कितीही चांगले वागा, पण लोक आपल्याशी वाईटच वागतात. असे का? हा प्रश्न आपल्याला पडतो आणि चांगुलपणावरून आपला विश्वास उडायला लागतो. त्यावर उत्तर दिले एका साधूमहाराजांनी!


एका गावातला एक तरुण अतिशय साधा, भोळा आणि प्रेमळ होता. कोणी कसेही वागो, पण त्याने आपला चांगुलपणा कधीच सोडला नव्हता. परंतु एक वेळ अशी येते, जेव्हा संयमाचा बांध फुटतो आणि आपल्याला स्वत:च्या चांगुलपणाचाही राग येऊ लागतो. मन व्यवहारी होते, स्वार्थी होते, परंतु हा बदलही आपल्याला सहन होत नाही. कारण चांगले वागणे हा आपला स्थायी भाव असतो. 

त्या तरुणाच्या बाबतीतही तेच झाले. तो अतिशय अस्वस्थ होता. त्याने गावातल्या एका साधूबाबांकडे जाऊन शंकेचे समाधान विचारले. साधू महाराजांनी त्याला आपल्या सदऱ्याच्या खिशातून एक अंगठी दिली आणि म्हणाले, `पुढचा आठवडाभर ही अंगठी तू तुझ्याजवळ ये आणि त्याची किंमत किती मिळू शकेल याचा शोध घे. फक्त काही केल्या ही अंगठी विकू नकोस!'

प्रश्न आणि उत्तर यांचा परस्पर काहीही संबंध नसताना साधूमहाराजांनी दिलेले काम पाहून तरुण निराश झाला. परंतु त्याने दिलेले काम पूर्ण करायचे ठरवले. तो एका व्यापाऱ्याजवळ गेला. त्याला अंगठी दाखवली. तो त्या अंगठीचे हजार रुपये देईन म्हणाला. तरुण मुलगा दुसऱ्या व्यापाऱ्याकडे गेला,त्या व्यापाऱ्याने दहा हजाराची बोली लावली. तिथून तो एका सोनाराकडे गेला. सोनाराने अंगठी नीट पाहिली आणि म्हणाला एक लाख रुपए देतो, पण ही अंगठी मलाच विक! तरुण मुलगा गोंधळला. तिथून तो एका जवाहिराकडे गेला. त्याने मोल ठरवायला वेळ लावला पण त्याने जे उत्तर दिले ते ऐकून तरुण मुलगा चक्रावला. जवाहीर म्हणाला, `माझी सगळी संपत्ती देऊ केली तरी या अंगठीचे मोल मला फेडता येणार नाही,हे ऐकून गोंधळलेला तरुण साधूमहाराजांकडे परत आला. त्याने सगळी हकीकत सांगितली. त्यावर साधूमहाराज म्हणाले, बाळा, अंगठीची किंमत ज्याने त्याने आपल्या कुवतीनुसार सांगितली. जो खरा रत्नपारखी होता त्याने ही अंगठी अमुल्य आहे असे सांगितले. याचाच अर्थ आपले गुण ओळखणारा आणि त्या गुणांची कदर करणारासुद्धा तेवढाच गुणवान असावा लागतो. जे लोक तुझी किंमत करत नाहीत, ते त्यांच्या कुवतीप्रमाणे तुझ्याशी व्यवहार करतात. मात्र जे तुला ओळखतात ते तुझी किंमत , योग्यता समजतात. तू ही अंगठी आहेस हे आधी ओळख आणि तुझी किंमत सामान्य व्यापाऱ्याने ओळखावी अशी अपेक्षा करू नकोस. तू तुझा चांगुलपणा कायम ठेव. कोणीतरी रत्नपारखी आयुष्यात नक्कीच भेटेल.

Friday, 12 November 2021

मनाची भूमिका आणि शारीरिक आजार

 *कुठलाही आजार आपल्याला का होतो?* 

तर त्याचे सहज सोपे उत्तर आहे. 

*तुम्ही स्विकारल्यामुळे!*


आपल्या शरीरात पाण्यावर तरंगण्याची नैसर्गिक शक्ती आहे. पण तरीही माणूस पाण्यात बुडून मरतो. याला काय म्हणाल आपल्या मनाने अतिशय स्ट्रॉंगली स्विकारलेय की मला पोहायला येत नाही आणि कोणालाही पोहायला येत नाही ही अंधश्रद्धा आहे. हत्ती किती जड आहे तोही पोहतो. कारण त्याने ठरवलेले नाही. त्याला माहीतच आहे  तो पाण्यावर तरंगणार आहे. अहो सापाला हात पाय नसतात. तोही पाण्यात पोहतो. म्हणजे हात पाय हलवले, तरच आपण पाण्यावर तरंगू शकतो हाही गैरसमजच आहे. बघा जी माणसं पाण्यात बुडून मरतात त्यांचे शरीर काही वेळाने पाण्यावर तरंगायला लागते. याप्रमाणेच आपल्यात प्रतिकारशक्ती आहे. 

ती आपल्याला कसलाच आजार होऊ नये यासाठी सतत काम करत असते. तिला मनापासून स्ट्रॉंगली मान्य करा. हेच खरे शरीर शास्त्र आहे. मेडीकल सायन्स ही शक्ती तुमच्यात नसेल तर काहीच करू शकत नाही. तर ताप आल्यावर,सर्दी झाल्यावर, शिंक आल्यावर कसलाही आजार झाल्यावर थोडे थांबा. 

*तुमच्यातील प्रतिकारशक्तीला काम करू द्या.*

अशा आजारांवर वारेमाप खर्च करणे *शरीरावर अत्याचार* आहेत. ही अंधश्रद्धा आहे. 

शरीरशास्त्रात नैसर्गिक प्रतिकारशक्ती म्हणजे खरे विज्ञान आहे.

आपल्या शरीरातली अर्ध्याहून अधिक आजारांच्या मागे आपलं अज्ञ मन असतं. पण कित्येकदा पेशंटला याची माहीती नसते. डॉक्टरांकडे गेलं आणि उपचार घेतले की तात्पुरतं बरं वाटतं, थोड्या दिवसांनी पुन्हा दुखणं, उफाळून येतं, काय करावं, ते समजत नाही.


*मन आणि शरीर यांना जोडणारी काही लक्षणे बघू या.*


१) एखाद्या गोष्टीची जबरदस्त भिती किंवा चिंता वाटली की घशाला कोरड पडते. 


२) परीक्षेचा किंवा अजून कसला तणाव असेल तर पोटात गोळा येतो, 


३) समोर एखादा अपघात किंवा दुर्घटना पाहिली की हातापायातली शक्ती गळून जाते.


४) आणि याविपरीत सतत हसतमुख असणारी व्यक्ती नेहमी क्वचितच आजारी पडते.


तर हे सिद्ध झाले आहे की, आपल्या शरीरातल्या आंतरिक क्रियांवरही अज्ञात मनाची सत्ता चालते. जसं की, समोर मातीचे कण उडाले की सेकंदाच्या दहाव्या भागात लगेच पापण्या मिटतात. अज्ञात मन शक्तीशाली आहे पण एखाद्या सेनापतीसारखं, त्याच्यावर सत्ता चालते विचारांची!


ताकतवार असला तरी तो गुलामच! दिलेला आदेश पाळणं एवढचं त्याचं काम!

आपण जे काही बोलतो तेच आपले विचार आहेत.


१) ब्लडप्रेशर आणि हृदयविकार - 

समजा एखादा माणुस, नकळत, अशी वाक्ये पुन्हा पुन्हा वापरत असेल, 

उदा.

- त्याला बघितलं की माझं रक्तच खवळतं!

- ह्यांच्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं, आणि हे बदलले!

- माझी तळपायाची आग मस्तकाला जाते!


क्वचित अशी वाक्ये वापरली गेली, तर हरकत नाही, पण पुन्हा पुन्हा हेच बोलल्यास आणि ते सुप्त मनात गेल्यास त्याचा विपरीत परिणाम रक्ताभिसरणावर नक्कीच होतो.


डॉक्टरकडे गेल्यावर औषध-उपचाराने काही काळ बरं वाटतं, पण अज्ञात मन त्याचा पिच्छा सोडत नाही.


ही सर्व वाक्य सतत तणावात असणार्‍या व्यक्तीच्या सवयीचा भाग बनतात आणि लवकरच तिला ब्लडप्रेशर आणि मोठ्या स्वरुपाचे हृदयाचे विकार घेरण्यास सुरुवात करतात.


थोडक्यात सतत मानसिक तणाव, हताशपणा आणि निराशा अनुभव करणाऱ्या व्यक्तीला हृदयाचे विकार लवकर घेरतात.


२) आतड्यांचे विकार – जी व्यक्ती स्वतःलाच घालून पाडून बोलते, स्वतःची निंदा करते, स्वतःला दुबळा समजते, तिला छोट्या आतड्यांच्या विकारांची समस्या उदभवते.


३) अपचन – बहुसंख्य लोक ह्या आजाराने त्रस्त आहेत, खरं तर मलविसर्जन ही अतिसहज आणि नैसर्गिक क्रिया आहे, तरीही काही जणांना ‘धक्का देण्यासाठी’ कृत्रिम उपायांचां, जसं की एखादे चुर्ण किंवा एखादं औषध ह्यांचा आधार घ्यावा लागतो.


आता ह्याची बरीचशी कारणं आहेत, इथे एका उदाहरणची चर्चा करुयात.


काही वेळा ह्याचं कारण बाल्यावस्थेत दडलेलं सापडतं, कडक शिस्तीच्या नादात आई वडीलांनी मुलाला एखादी शिक्षा केलेली असते, त्याचा राग त्याच्या मनात असतो, लहान मूल आईवडीलांवर राग काढू शकत नाही, त्याला त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकावीच लागते, त्यांना विरोध म्हणून ही क्रिया तो रोखून धरतो.

ह्या ठिकाणी आई वडील त्याला जबरदस्ती करु शकत नाहीत, हळुहळू तो मोठा होतो, शिस्तीचा बडगाही संपतो पण आपल्या आतड्यांवरचं नैसर्गीक नियंत्रण तो हरवून बसतो.


असं ही बघण्यात आलं की जेव्हा व्यक्ती आर्थिक संकटात सापडते, तेव्हा तिची पचनशक्ती कमजोर होते. जे लोक कंजुष वृत्तीचे असतात, त्यांच्यामध्ये मुळव्याध्याची समस्या जास्त आढळते.


४) छोट्याछोट्या गोष्टींवरही एखादी व्यक्ती वारंवार उत्तेजित होते, चिडते, अस्वस्थ होते, त्याचा परिणाम जठर आणि पित्ताशयावर पडतो.


५) डोकेदुखी – 

आजकाल बहुतांश भगिनीवर्गाला झंडुबाम शिवाय झोप येत नाही. कारण काय असेल बरं?

- ह्या व्यक्तीला बघितलं की माझं डोकं दुखतं!

- त्याने माझं खुप डोकं खाल्लं!

- आमच्या ह्यांच्यासमोर कितीही डोकं फोडा, काही फायदा नाही,


निरंतर, नकळत असं बोलत राहील्याने अज्ञ मनात संदेश पोहचतो की माझ्या डोक्याला दुखायचे आहे.

आणि मायग्रेनचा त्रास चालू!


डोकेदुखीची अजुनही काही कारणे आहेत, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी अप्रिय घटना घडलेली असतेच, पण तिला मनातल्या मनात पुन्हा पुन्हा तिला उगाळण्याचा स्वभाव असेल तर डोकेदुखी सुरु होते.


तेव्हा असे कटु अनुभव विसरुन जाणेच इष्ट!


कधी नकोसे वाटणारे काम, त्रासदायक काम अंगावर येऊन पडते, आणि डोके दुखते. जितके पोस्टपोन केले तेवढा त्रास होतो, तेव्हा अशी कामे तात्काळ निपटून काढावीत.


६) पाठदुखी वा कंबरदुखी – 

एखादी व्यक्ती सतत जबाबदारीच्या ओझ्याने वाकून थकुन गेली असेल तेव्हा तिला पाठदुखीला वा कम्बरदुखीला सामोरं जावं लागतं. असह्य वेदना होतात, ह्यात मानेपर्यंतचे स्नायू आखडले जातात. त्यांच्यावरचा ताण जाणवतो.


चेहरा मूळ स्थानी न राहता उजवीकडे किंवा डावीकडे कलतो.


आता सर्वात महत्वाचे, ह्यावर उपाय काय आहे?


आपापले औषधौपचार चालू ठेवा, पण हे रोग शरीरातून समूळ उपटून काढायचे असतील तर स्वयंसुचन हाच ह्यावरचा एकमेव उपाय आहे.


जसं की डोकेदुखीचं उदाहरण घेऊ – तंद्रावस्थेत जाऊन आपल्या अज्ञात मनाला सुचना द्या –


आता माझं डोकं एकदम हलकं हलकं होत आहे, 

आता ते अजून शिथील आणि हलकं झालं आहे, 

डोके दुखण्याचे प्रमाण कमी होत आहे, माझ्या डोक्यात जमा झालेलं अतिरीक्त रक्त आता शरीराच्या इतर भागात सुरळीतपणे पसरत आहे.

माझा डोकेदुखीचा त्रास नाहीसा होत आहे, काही क्षणांमध्ये ही बैचेनी दुर होईल!


आणि डोकेदुखी गायब!

प्रत्येक रोगासाठी अशा सुचना तयार करुन त्या अज्ञ मनापर्यत पोहचवून रोगमुक्त होता येते.


सारांश काय तर मित्रांनो, भावनांची कोंडी करुन जगू नका, रोग बनून ते शरीराला पोखरतील, राग व्यक्त करा, आणि मोकळे व्हा!


इथे मला एका महापुरुषाचा दृष्टांत आठवतो, त्यांना राग आल्याक्षणी ते कागद घ्यायचे आणि सविस्तर लिहून काढायचे, मनातले संपुर्ण भाव ओतून रिते व्हायचे, ते कागद दोन चार दिवस तसेच टेबलावर ठेवायचे आणि नंतर जाळून किंवा फाडून टाकायचे.


अशा प्रकारे मनातली सारी खळबळ बाहेर काढून टाकता येते. आता क्रोधाची भावना नाहीशी होते आणि हलकं हलकं वाटतं.


चला तर मग सर्वांनी निरोगी आणि ठणठणीत आयुष्यासाठी प्रयत्न करूया..

Sunday, 7 November 2021

भावना दुखावण्याच्या आजारावर औषध!




‘भावना दुखावण्या’चे परिणाम वाईटच : अपमान / अपयश / टीका सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन, टोकाचे पाऊल उचलले जाते… हे व्यक्तींच्याच नव्हे, तर समाजांच्याही बाबतीत होऊ शकते. या आजारावर मात कशी करायची, याची पद्धती शोधणारे डॉ. आरॉन बेक नुकतेच दिवंगत झाले…


डॉ. आरॉन बेक या जगविख्यात मनोविकारतज्ज्ञाचे नुकतेच फिलाडेल्फिया येथील राहत्या घरी निधन झाले. शंभर वर्षांचे अत्यंत अर्थपूर्ण आणि समाधानी आयुष्य त्यांना मिळाले. मानवी मनाची ‘अव्यक्त मन आणि व्यक्त मन’ अशी मांडणी करणारा सिग्मंड फ्रॉइड आपल्याला थोडाबहुत माहीत असतो; पण डॉ. आरॉन बेक आणि त्यांचे मनोविकार क्षेत्रातील काम यांविषयी आपण ऐकले किंवा वाचले नसणे अगदी स्वाभाविक आहे. या पार्श्वभूमीवर मानवी मनाचे आणि वर्तनाचे आकलन मूलगामी पद्धतीने बदलणाऱ्या डॉ. आरॉन बेक यांचे काम समजावून घेणे हे त्यांचे स्मरण करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे असे वाटते. त्यांच्या कामाला आपल्या काळाचादेखील एक अत्यंत महत्त्वाचा संदर्भ आहे. एवढ्या तेवढ्या कारणांवरून भावना दुखावल्या जाणाऱ्या कालखंडात आपण सगळे जगात आहोत! केवळ त्या भावना स्वत: दुखावून घेऊन आपण थांबत नाही तर सगळ्या समाजाला आपल्या दुखण्यासाठी वेठीस धरण्याची एक पद्धत आपल्याकडे रूढ झाली आहे. अशा कालखंडात तर, ‘भावना दुखावण्याच्या आजारावर औषध शोधणाऱ्या’ डॉ. आरॉन बेक यांचे विचार खूपच अधिक महत्त्वाचे ठरतात. 


भावना दुखावण्याचे दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंग आपण सहज आठवू शकतो. कामाच्या ठिकाणी बॉस घालून-पडून बोलतो म्हणून अस्वस्थ होणे, परीक्षेत अपेक्षेइतके गुण मिळाले नाहीत म्हणून येणारे वैफल्य, प्रेमाच्या नात्यात किंवा लग्नात अपयश आल्याने झालेले अतीव दु:ख अशा अनेक गोष्टी आपण आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या स्वत:च्या आयुष्यात अनुभवत असतो. यामधून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या भावना दुखावण्याच्या कारणांचा आपण जर लसावि काढला तर तो, ‘परिस्थिती अशी निर्माण झाली म्हणून माझ्या भावना दुखावल्या’ किंवा ‘दुसऱ्याने मुद्दामच माझ्या भावना दुखावल्या’ हा निघतो. थोडक्यात, आपल्या अस्वस्थतेसाठी दुसऱ्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला दोष देणे सुरू होते. याची पुढची पायरी म्हणजे, ‘समोरची व्यक्ती किंवा परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत माझे भावनिक दुखणे दुरुस्त होणार नाही,’ अशी धारणा करून घेतली जाते. यातूनच  परिस्थिती शरणता आणि परिस्थिती बदलावी म्हणून कर्मकांडे, त्यामधून येणारी फसवणूक, हे सारे सुरू होते. डॉ. बेक यांनी हा भावना दुखावल्या जाण्याचा जो आजार आहे, त्याविषयी नवीन- कोरी करकरीत- मांडणी केली. अगदी मुळावरच घाव घातला म्हटले तरी चालेल.


त्या मांडणीनुसार, ‘कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला होणारा भावनिक त्रास हा प्रत्यक्षातील घटनेचा नसून त्या घटनेचा आपण जो अर्थ लावतो त्याचा असतो!!’ एक छोटे उदाहरण घेऊ. दरवर्षी हजारो मुले परीक्षेत नापास होतात. पण त्यामधली फारच थोडी नापास झालो म्हणून आत्महत्येचा प्रयत्न करतात. आता याचा अर्थ सरळ आहे की, आत्महत्येचे विचार हे परीक्षा नापास होण्याच्या घटनेशी थेट संबंधित नाहीत. तसे असते तर प्रत्येक नापास मुलाने आत्महत्येचा विचार केला असता. प्रत्यक्षात असे होताना आपल्याला दिसत नाही. मग काय घडते तर ज्या मुलांचे मन असा विचार करते की, ‘आपण परीक्षेत नापास झालो म्हणजे आपण जगण्यास लायक नाही’ तीच मुले आत्महत्येचा विचार करतात. जी मुले, ‘आता नाही तर पुढच्या वेळी पास होऊ!’ असा विचार करतात; ती आत्महत्येच्या वाटेला जात नाहीत. याचाच अर्थ असा की, आपल्याला होणारा भावनिक त्रास हा त्या नापास होण्याच्या घटनेमुळे नसून त्या घटनेचा आपण जो अर्थ लावतो त्याच्याशी संबंधित आहे! म्हणजे हा ‘भावना दुखावण्याचा आजार’ नसून ‘भावना दुखावून घेण्याचा आजार’ आहे. डॉ. बेक यांच्या मांडणीतून हे सत्य पुढे आले. तेवढेच महत्त्वाचे दुसरे सत्य असे की, एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखे हे विचार आपल्या मनाच्या पटलावर उमटत असतात. त्यांच्या या स्परूपामुळे आपण असे धरून चालतो की ते विचार योग्यच आहेत. प्रत्यक्षात मात्र परिस्थितीच्या पलीकडे जाऊन, स्वत: निर्णय घेऊन आपण कुठल्याही परिस्थितीला दिलेला स्वत:चा प्रतिसाद बदलू शकतो; अधिक विवेकी आणि विधायक करू शकतो, असा त्या उपचार पद्धतीचा गाभा आहे. एकदा का आपण अशा प्रकारे ‘स्वत:चे विचार तपासायची आणि बदलायची सवय’ स्वत:ला लावली की आपल्याला परिस्थितीमधून येणारी भावनिक हतबलतासुद्धा बदलता येते. आपल्या मनावर आपला ताबा मिळवण्याच्या दृष्टीने आपले एक महत्त्वाचे पाऊल पडते. 


साधारण १९६० ते ७० च्या दशकाच्या दरम्यान ही मांडणी जेव्हा डॉ. बेक यांनी केली, तेव्हा ‘मानवी वर्तनाला त्याच्या अव्यक्त मनातील आणि बालपणातील अनेक घटनांशी संबंधित कारणे असतात,’ या स्वरूपाची सिग्मंड फ्रॉइड यांची मांडणी प्रबळ होती. मानवी मनाच्या अभ्यासात तिचे म्हणून एक स्वतंत्र महत्त्व आहे. त्या अभ्यासावर मानवी अंतर्मन आणि अव्यक्त भावना यांचा खूप मोठा प्रभाव आहे. आपल्या सर्व भावभावना या अंतर्मनाच्या गुलाम आहेत आणि अंतर्मनाचा गुंता सुटल्याशिवाय आपण आपली वर्तणूक बदलू शकत नाही, अशी एक हतबलता आणि परिस्थिती शरणता त्यामध्ये आहे. डॉ. बेक यांनीदेखील या ‘सायकोअ‍ॅनालिसिस’ (मनोविश्लेषण) म्हटले जाणाऱ्या पद्धतीचा अभ्यास केला होता. मात्र ‘सायकोअ‍ॅनालिसिस’च्या मर्यादाही लक्षात आल्यामुळे त्यांनी ही मानवी विचारांना केंद्रस्थानी ठेवणारी आणि प्रत्येक माणसाला- परिस्थिती कशीही असली तरी- आपल्या भावनांचा लगाम आपल्या हातात घेता येऊ शकेल अशी विचारनिष्ठ उपचार पद्धती शोधून काढली.


याच स्वरूपाची मांडणी आणि काम करणारे डॉ. अल्बर्ट एलीस आणि डॉ. आरॉन बेक हे दोघेही साधारणत: समकालीन होते. डॉ. एलीस यांनी ही विचार आणि उपचार पद्धती सामान्य लोकांपर्यंत नेण्यासाठी त्यांची हयात खर्च केली; तर डॉ. बेक यांनी त्याचा शास्त्रीय अभ्यास, संशोधन आणि त्याविषयी प्रशिक्षण देणे यांवर आयुष्यभर जोर दिला. 


जगप्रसिद्ध जर्नल्समध्ये साधारण ६०० शोधनिबंध आणि दोन डझन पुस्तके ह्यांच्या माध्यमातून त्यांनी आपले विचार आणि संशोधन मांडून ठेवले आहे. आजअखेर लाखो लोकांनी मानसिक अस्वस्थतेच्या वेळी त्यांनी शोधलेल्या उपचार पद्धतीचा वापर करून स्वत:ला सावरले आहे आणि येत्या कालखंडात ही संख्या वाढतच जाणार आहे.


डिप्रेशनच्या आजाराच्या सौम्य टप्प्यावर ही उपचार पद्धती औषधांच्या इतकीच प्रभावी ठरते, असे संशोधन आता जगभर मान्य आहे. केवळ डिप्रेशन नव्हे, तर व्यक्तिमत्त्व दोष, व्यसनाधीनता यांच्यापासून ते तीव्र मानसिक आजारापर्यंत अनेक आजारांमध्ये या विचारकेंद्री उपचार पद्धतीचा वापर केला जातो.


नातेसंबंध टिकावे आणि बहरावे यासाठी त्यांनी ‘लव्ह इज नॉट इनफ!’ (केवळ प्रेम पुरेसे नाही..) अशा गंमतशीर नावाचे पुस्तक लिहिले आहे. चांगल्या आणि अर्थपूर्ण नात्यासाठी केवळ प्रेम पुरेसे नसते. त्याबरोबर मनाची संवेदनशीलता, उदारता, जबाबदारीचे भान, निष्ठावानपणा असे अनेक महत्त्वाचे गुण असतात हे डॉ. बेक यांनी आपल्या लक्षात आणून दिले आहे. एकमेकांच्यावर अतीव प्रेम करणारी अनेक नाती दीर्घकाळ का टिकू शकत नाहीत आणि फारसे प्रेम नसलेली नातीदेखील अनेक वेळा कशी दीर्घकाळ टिकतात याचे उत्तर हे पुस्तक वाचताना मिळू शकते.


डॉ. बेक यांनी दोन वेळा-  २००२ आणि २०१५ मध्ये – दलाई लामा यांच्याशी संवादाचा कार्यक्रम केला. ही विचारकेंद्री उपचार पद्धती आणि बुद्धविचार यांमध्ये मोठे साम्य असल्याचे निरीक्षण डॉ. बेक यांनी नोंदवून ठेवले आहे. विविध धर्मांमधील पुनर्जन्म, ‘मागच्या जन्मीचे पाप’, स्वर्ग-नरक या संकल्पनांच्या पलीकडे जाऊन आपल्या जीवनातील दु:खाचे ‘स्वत:च्या आत असलेले कारण’ शोधणाऱ्या ज्या परंपरा आहेत त्यांनादेखील पुढे नेणारा हा विवेकवादी विचार आहे. केवळ वैयक्तिक दु:ख आणि भावनांचे दुखावणे नाही; तर समाजपातळीवरदेखील हे विचार खूप महत्त्वाचे आहेत. ‘शत्रूकेंद्री जगणे’ आणि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्या कोणाला तरी जबाबदार धरण्याची जणू एक पद्धत आपल्याकडे निर्माण झाली आहे. या शत्रूकेंद्री आणि भूतकाळवादी विचारधारेला एक सशक्त पर्याय देण्याचे सामथ्र्य या ‘स्व’लक्ष्यी, विचारनिष्ठ आणि वर्तमानाला महत्त्व देणाऱ्या पद्धतीमध्ये आहे.


शेवटपर्यंत कार्यरत राहिलेल्या डॉ. बेक यांचे काम हे आता बेक इन्स्टिट्यूटच्या (स्थापना : १९९४) माध्यमातून पुढे जात राहील. ‘मनाच्या पृष्ठभागावरदेखील खूप काही असते- आपण केवळ डोळे उघडून बघायला हवे,’ हा डॉ. बेक यांचा संदेश आपण ध्यानात घेतला पाहिजे. आपले स्वत:चे, आपल्या कुटुंबाचे आणि एकुणात समाजाचे खूप भले करण्याची ताकद या विचारात आहे!


संदर्भ : दै. लोकसत्ता

Saturday, 9 October 2021

संतुलित मन, समाधानी जीवन

आपल्या मनाला कसं सांभाळावं


जसं एखादं वाद्य वाजवण्यासाठी त्यामध्ये संतुलन जसं गरजेचं असतं. तंबोऱ्याच्या तारा कसल्या तर त्या तुटून जातील आणि त्या जर ढिल्या सोडल्या तर त्यामध्ये नाद निर्मिती होणार नाही. म्हणजेच त्याच्यामध्ये योग्य संतुलन असणं गरजेचं आहे. तसंच आपलं देखील आहे. आपलं शरीर हे यंत्र आहे. शरीर-मन-मेंदू यामध्ये देखील योग्य संतूलन असणं गरजेचं आहे. शरीराचं यंत्र हे मनावर अवलंबून आहे. यासाठी आपलं मन सतत सकारात्मक विचारांमध्ये गुंतवूण ठेवणं गरजेचं आहे. थोडासाही ताण जाणवला तर त्यावर वेळीच उपचार करणं महत्त्वाचं आहे. जसं आपण पाय दुखतोय, गुडघा दुखतोय म्हणून डॉक्टरकडे जातो तसंच जरासंही मन दुखलं तरी डॉक्टरकडे जाणे गरजेचे आहे. मन आनंदी नसेल तर आपण समाधानी राहू शकत नाहीत.


ताण - तणाव घालवण्यासाठी सोपे उपाय


सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपल्या आवडीचा छंद जोपासणं गरजेचं आहे. सर्वांनी खेळायला पाहिजे कारण खेळ आपल्याला चांगल्या पद्धतीनं जगण्याचं शिकवत असतं. खेळामुळे आपण खूप आनंदी राहत असतो. वर्तमानात कसं आनंदी रहावं हे आपण खेळातून शिकतो. जसं की एखाद्या खेळाडून गोल केला तर तो आनंद साजरा करतो त्याला याची चिंता नसते की आपण उद्याचा सामना जिंकणार की हारणार. तो फक्त आजचा क्षण आनंदानं साजरा करत असतो. त्यामुळे सर्वांनी खेळणं खूप गरजेचं आहे. शिवाय आपल्याला ज्या गोष्टीमध्ये वेळ घालवणं गरजेचं आहे. ध्यानधारणा, सूर्य नमस्कार, योगा यामुळे देखील ताण तणाव खूप प्रमाणात कमी होतील. तसेच आपल्याला खूपच ताण जाणवत असेल तर मानसोपचार तज्ज्ञाचा किंवा समुपदेशकाचा सल्ला घेणं कधीही आवश्यक आहे.


मानसिक आरोग्य बिघडण्याचं कारणं


मानसिक आरोग्य बिघडण्याचं मुख्य कारण म्हणजे आजची जीवनशैली होय. आजच्या स्पर्धेच्या युगात मनात आलेली आणि हवी असलेली गोष्ट लगेच हवी आहे. कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी जो संयम लागतो तो आजच्या पिढीमध्ये दिसून येत नाही. महत्त्वाकांक्षा असणं वेगळं आणि अतिमहत्त्वाकांक्षा असणं हे वेगळं. या अतिमहत्त्वाकांक्षेपायी आजचा तरूण तणाखाली येत आहे.


गंभीर मानसिक आजाराचं प्रमाण


साधारणपणे गंभीर मानसिक आजाराचं प्रमाण ३० टक्के आहे. तसं पाहिलं तर आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता ताण असतोच. अनेक जण आपण केलेल्या कामाबद्दल समाधानी नसतात, ८ ते १० तास काम करुनही काम केल्याचं समाधान मिळत नाही. अशावेळी आपण आपल्या जीवनशैलीकडे बारकाईने पाहणं गरजेचं असतं. आपला जास्तीत जास्त वेळ कशात जात आहे, आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे आपण पाहणं गरजेचं आहे. याकडे दुर्लक्ष केलं तर आपला प्रवास गंभीर मानसिक आजाराकडे होऊ शकतो.


मानसिक रुग्णांबद्दल महत्त्वाची बाब


ही महत्त्वाची बाब आहे. कारण रुग्ण तर सोडाच पण कुटूंबिय देखील हे मान्य करत नाहीत की आमच्या कुटूंबात कोणी मानसिक रुग्ण आहे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारे रुग्णांना डॉक्टरपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. जसे की त्याला डॉक्टरकडे जायचे आहे असं न सांगता आपल्याला एका मॅडमला भेटायला जायचे आहे असे सांगावे लागते. त्याला आवडणाऱ्या गोष्टींवर पहिल्यांदा चर्चा केली जाते. एकदा त्याचा विश्वास संपादन केला की, मग उपचाराला सुरूवात केली जाते.


मानसिक आजारामध्ये अनुवांशिकता आणि परिस्थितीजन्य प्रकार


तसं पाहिलं तर अनुवांशिकता खूप महत्त्वाची आहे. आपल्या आजोबा, वडील यांना जर एखादा मानसिक आजार असेल तर शक्यता असते की पुढल्या पिढीला याचा धोका असतो. तसंच परिस्थितीजन्य प्रकारात कुटूंब देखील महत्त्वाचा भाग असतो. आपण एका कुटूंबाचे घटक असतो. आपण कोणत्या कुटूंबातून आलोत, कुठल्या वातावरणात वाढलो आहोत, शिक्षण कोणत्या क्षेत्रात घेतलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. यातून देखील ते तणावाखालून जातात. तरूण पिढीमध्ये तर तणावाचं कारण खूप वेगवेगळे असल्याचं दिसून येत आहे कारण बरेच तरूण फेसबुकवर मला खूप लाईक्स मिळाले, मला गर्लफ्रेंड नाही, मला बॉयफ्रेंड नाही अशा गोष्टींवरून देखील तणावाखाली जाताना पहायला मिळतात.


मानसिक रुग्णाच्या प्रमाणात उपलब्ध मानसोपचार तज्ज्ञ किंवा समुपदेशक


तसं पाहिलं तर मानसिक रुग्णाच्या प्रमाणात खूपच कमी मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक उपलब्ध आहेत. समाजातील संतुलन योग्य ठेवण्यासाठी तरूणांनी या क्षेत्राकडे वळणे गरजेचे आहे. करिअरसाठी हे क्षेत्र चांगलं आहे.ज्यांना समाजासाठी काहितरी करायचं आहे त्यांनी निश्चितच याकडे वळणं योग्य राहिल. मानसशास्त्र किंवा समाजशास्त्र या विषयात पदवी अथवा पदविका प्राप्त करुन समुपदेशानाचे कार्य करता येते. महत्त्वाचे म्हणजे समुपदेशकामध्ये संयम खूप महत्त्वाचा असतो. कारण मानसिक रुग्ण हा पूर्णपणे खचलेला असतो अशा वेळी समुपदेशकाने त्यामध्ये सामावून जाता तटस्थ राहून त्याच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे. कंटाळून न जाता त्याला वारंवार मार्गदर्शन करणं गरजेच आहे.



संदर्भ : आरोग्यविद्या डॉट कॉम

Thursday, 7 October 2021

मानसिक स्वास्थ्य संवर्धन

 

     सध्याच्या धकाधकीच्या, गतिमान व स्पर्धात्मक जीवनात ताणतणावाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. कोविड १९ सारख्या महामारीने त्यामध्ये आणखी भर घातली आहे. अशा तणावजन्य परिस्थितीत सक्षमपणे उभे राहण्यासाठी आणि कार्यक्षम आयुष्य जगण्यासाठी शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्य संवर्धनाची गरज आहे. जीवनातील संघर्ष, अपयश, नैराश्य, आघातजन्य , कौटुंबिक वंचितता यामुळे मानसिक स्वास्थ्य धोक्यात येते. अती मानसिक ताणामुळे व्यक्तीची मनःशांती कमी होते. अशा प्रसंगी मग व्यक्तीने नित्य जीवनाची पुनर्रचना करण्याची गरज निर्माण होते. मानसिक आरोग्याची जोपासना ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येकाने स्वतःच्या दिनचर्येत आणि मनोवृत्तीत काही विधायक बदल करणे आवश्यक असते. सुखी व समाधानी जीवनाचे गुपित ग्रीकांनी फार पूर्वीच सांगितले आहे. आपले काम व आवडते कृत्य यांचा रोजच्या कार्यात समतोल राखला तर जगण्याचा उत्साह वाढतो. मानसिक स्वास्थ्य संवर्धनासाठी नित्य जीवनाची पुनर्रचना करताना खालील बाबी आचरणात आणता येतील. 


१. कामाचे नियोजन करा

    आपल्या दैनंदिन कामात शिस्त राखणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीवर काही विशिष्ट कामांची जबाबदारी असते. व्यक्तीने आपले काम आवडीने व पूर्ण क्षमतेने करावे. तसेच कामातील जबाबदारी स्वीकारावी. कामाचे नीट नियोजन करावे. कामाचे नियोजन करताना कोणते काम जास्त महत्वाचे त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवावा. असे केल्याने काम वेळेत पूर्ण व पद्धतशीरपणे करायची सवय लागते. काम वेळेत पूर्ण झाले तर इतर छंद जोपासण्यासाठी, करमणुकीसाठी व समाजकार्यासाठी वेळ मिळतो. 


२. फावल्या वेळाचे नियोजन

    व्यक्तीला फावल्या वेळाचा उपयोग आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी होतो. फावल्या वेळेत स्वतःचे कलागुण विकसित करण्यासाठी गाणे, नाच, चित्रकला, भरतकला, विणकाम, वाद्य वाजविणे अशा कला शिकता येतात. हे छंद पुढे कामाचा ताण घालविण्यासाठी, रिलॅक्स होण्यासाठी, करमणुकीसाठी उपयुक्त  असतात. 


३. नियमित आहार

    शरीर स्वस्थ तर मन स्वस्थ, त्यामुळे योग्य वेळी नियमित आहार घेतला पाहिजे. शरीराला आवश्यक असणारी कार्यशक्ती पोषक आहार घेतल्याने मिळते. खाल्लेल्या अन्नातून पोषण मूल्ये शरीराला मिळावी यासाठी जेवताना व्यक्तीने प्रसन्न राहावे. वाचत किंवा टी. व्ही. पाहत जेवू नये. जेवताना गप्पा असाव्यात परंतु त्या गप्पा भांडण वाढवणाऱ्या, एकमेकांवर दोषारोप करणाऱ्या नसाव्यात. 


४. व्यायाम

    निरोगी आरोग्यासाठी व्यायामाची आवश्यकता असते. सध्या लोकांचे बैठे काम वाढले आहे. बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी यामुळे लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. व्यायाम केल्याने मन प्रसन्न राहते, कामात उत्साह वाढतो. शरीराप्रमाणे मनही लवचिक असणे गरजेचे असते. निराशाजनक, भीतीदायक विचारांना थांबवून मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी मनाचे व्यायाम आवश्यक असतात. 


५. सुसंवाद साधणे

    हल्लीच्या विभक्त कुटुंब पद्धतीत घरामध्ये परस्पर सुसंवाद कमी होत चालला आहे. घरातील व्यक्तींमध्ये परस्पर संभाषण होणे आवश्यक असते. अशा संभाषणातून एकमेकांच्या गरजा, अपेक्षा, विचार, भावना जाणून घेता येतात. एकमेकांशी बोलल्याने तसेच घरातील वातावरण मोकळे राहते. परस्परांच्या सुख-दुःखात सहभागी होता येते. 


६. झोप व विश्रांती

    सकस आहार, व्यायाम यासोबत शांत झोप व विश्रांती देखील मानसिक शांतीसाठी महत्वाची आहे. शांत झोप लागणे हे निरोगी आरोग्याचे लक्षण आहे. 


७. भावना व्यक्त करणे

     मानसिक स्वास्थ्यासाठी स्वतःच्या भावना स्वीकारा. राग, भीती, दुःख, आक्रमकता, हेवा, तिरस्कार या भावना सुद्धा मान्य करा. भावना टाळण्याचा किंवा दडपण्याचा प्रयत्न करू नका. भावना व्यक्त केल्याने मन हलके होते. मानसिक स्वास्थ्यासाठी प्रत्येक दिवशी थोडेतरी मनमोकळे हसले पाहिजे. हसण्यामुळे चेहऱ्याचे स्नायू, श्वसन संस्था व पचनसंस्था यांना चांगला व्यायाम मिळतो. आनंद व समाधान हे मानसिक स्वास्थ्याचा प्राणवायू आहेत. त्यामुळे व्यक्त व्हायला शिका. 


८. व्यसने टाळा

    दुःख कमी करण्यासाठी काही व्यक्ती तंबाखू, दारू, मादकद्रव्य सेवनाच्या आहारी जातात. ही व्यसने ताण कमी करणारी नसून स्वास्थ्य बिघडवणारी असतात. त्यामुळे व्यसनांपासून दूर रहा. 


९. आत्मविश्लेषण करा

     स्वतःच्या वर्तनाचे, कृतीच्या परिणामांचे, विचारांचे वस्तुनिष्ठ परीक्षण करा. त्यातून स्वतःच्या क्षमतांची, मर्यादांची जाणीव होईल. त्यातून आपल्या वर्तनात सुधारणा करता येते. स्वतःचे विश्लेषण करताना न्यूनगंड मात्र निर्माण होऊ देऊ नका. 


१०. जगण्यावर प्रेम करा

    आयुष्यात धनात्मक आणि ऋणात्मक असे दोन्ही प्रकारचे अनुभव येतात. सभोवतालच्या सुखद-दुःखद, चांगल्या-वाईट घटनांपैकी तुम्ही काय पहायचे हे तुमच्यावर अवलंबून असते. आयुष्यातील आव्हाने स्वीकारणे हे जगण्याचे सूत्र आहे. व्यक्तीने आशावादी वृत्ती जपली पाहिजे. आयुष्य अनिर्बंधपणे उधळून टाकू नये. होकारात्मक विचारांचा व कृतींचा व्यक्तीने निश्चय केला, तर व्यक्तीला स्वास्थ्य संपन्न, आनंदी, निरामय जीवन जगता येईल. 



 

Wednesday, 6 October 2021

समायोजन - यशस्वी जीवनाचा मूलमंत्र

  


         समायोजन ही मानवी जीवनातील एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्याला इंग्रजीत Adjustment असे म्हटले जाते. व्यावहारिक भाषेत परिस्थितीशी, बदलाशी जुळवून घेणे तसेच जीवनात अंतर्गत सुसंगती टिकवणे याला समायोजन म्हणता येईल. मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने समायोजन ही रोजच्या जीवनात अतिशय महत्त्वाची व आवश्यक बाब आहे. आपण जन्मापासून मरेपर्यंत आपल्या सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला अनेक शारीरिक, मानसिक, सामाजिक गरजा असतात. या सर्वच गरजांची पूर्तता होतेच असे नाही. बऱ्याचदा आपल्या ईच्छा, आकांक्षा, आवडी-निवडींना मुरड घालावी लागते तसेच आपल्या भावनांना आवर घालावा लागतो आणि समाजमान्य पद्धतीने प्रतिक्रिया द्यावी लागते. यालाच समायोजन म्हणतात. 

      जीवनात आपणास अनेक समस्यांना किंवा संघर्षाला सामोरे जावे लागते. या समस्या सोडविण्यासाठी विविध मार्ग वापरावे लागतात, स्वतःच्या क्षमतांचा कौशल्यपूर्ण पद्धतीने वापर करावा लागतो. समस्यात्मक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी स्वतःमध्ये व परिस्थितीमध्ये योग्य ते बदल घडवून आणण्याची प्रक्रिया म्हणजे समायोजन होय. समायोजन म्हणजे योग्य मार्गाने केलेली तडजोड होय. ती निरतंर चालणारी प्रक्रिया आहे. आपल्या जीवनातील आनंदाचा उपभोग, जीवन समाधान, प्रगती ही बहुतांशी समायोजनावर अवलंबून असते. समाज, संस्कृती, नीतिनियम, सभोवतालचे वातावरण, अपेक्षा याचे भान ठेवून केलेले समायोजन आपणास मानसिक स्वास्थ्य टिकविण्यास मदत करते. 

       जरी अनेक ठिकाणी आपल्याला समायोजन करावे लागत असले तरी प्रामुख्याने तीन क्षेत्रातील समायोजनाचा आपण या ठिकाणी विचार करूया. 

१) वैयक्तिक समायोजन

      व्यक्तिगत समायोजन ही मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असणारी सर्वांत महत्त्वाची पायरी म्हणता येईल. कारण हे समायोजन आपणच आपल्याबाबत करायचे असते. वैयक्तिक समायोजन करण्यासाठी स्वतःच्या क्षमता, मर्यादा, भोवतालची परिस्थिती, मिळणारी संधी याची योग्य जाणीव प्रत्येकाने करून घ्यावी. आपली ध्येये, उद्धिष्टये, जीवनाकडे पाहण्याचा 

दृष्टीकोन जितका वास्तव व सकारात्मक असेल तितके व्यक्तिगत समायोजन परिणामकारक होते. आपले वैयक्तिक समायोजन जितके चांगले असेल तितके संघर्ष, ताणतणाव, अपयश, नैराश्य आपण कौशल्यपूर्ण रीतीने हाताळू शकतो.


२) सामाजिक समायोजन

      वैयक्तिक समायोजनाइतकेच सामाजिक समायोजनास देखील महत्व आहे. आपण जर वैयक्तिक समायोजनात यशस्वी झालो तर सामाजिक समायोजन करणे सुलभ जाते. सामाजिक समायोजनात समाजमान्य वर्तन  करायला शिकणे, समाजाच्या अपेक्षा जाणून घेणे, समाजाच्या नितिनियमांचे पालन करणे, समाजाने मान्य केलेली भूमिका व दिलेले स्थान यास अनुसरून वर्तन करणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो याची जाणीव आपणास असायला हवी. समाजाप्रती प्रेम, आदर, आत्मीयता वाटायला हवी. बऱ्याचदा काही रूढी मान्य नसतात अशावेळी त्या बदलण्यासाठी त्यांना शरण न जाता समाजाची घडी बदलणारी कृती करायला हवी, परंतु ती करताना देखील बराच विरोध सहन करण्याची तयारी असावी लागते. हे ही एक प्रकारचे सामाजिक समायोजनच होय.  मानसिक स्वस्थतेसाठी सामाजिक समायोजन साधण्याचे उत्तम कौशल्य प्रत्येकाने विकसित करायला हवे. 


३) व्यावसायिक समायोजन

     नोकरी, व्यवसाय हे व्यक्तीच्या उपजीविकेचे साधन आहे. आपल्या व्यवसायावर, नोकरीवर  आर्थिक-सामाजिक दर्जा, समाजाकडून मिळणारी किंमत अवलंबून असते. आपला व्यवसाय आपल्याला मानमरातब, आत्मप्रतिष्ठा मिळवून देत असतो. व्यवसायाची योग्य निवड, त्यासाठी योग्य प्रशिक्षण, व्यवसायातील सुरक्षितता, प्रगतीची संधी, आर्थिक मोबदला, कामाचे स्वरूप, कर्तव्ये व जबाबदाऱ्या, व्यावसायिक समाधान, सहकारी वर्गाशी सुसंबंध या गोष्टी व्यवस्थित हाताळता येणे म्हणजे परिणामकारक व्यावसायिक समायोजन होय. 


      वरील तिन्ही प्रकारच्या समायोजनाशिवाय भावनिक समायोजन, शालेय समायोजन, वैवाहिक समायोजन या प्रकारचे देखील समायोजन आपणास करावे लागते. जेंव्हा आपण विविध प्रकारचे समायोजन साधण्यात यशस्वी होऊ तेंव्हा आपण मानसिक दृष्टया शांत, स्थिर राहू शकतो. त्यासाठी आपल्याला अपयशातून ज्ञान घेत जीवन जगण्याची कौशल्ये विकसित करावी लागतील. शेवटी काय तर, यशस्वी समायोजन हाच सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे हे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही. 




संदर्भ : य.च.म.मु.वि. मानसिक स्वास्थ्य




Tuesday, 5 October 2021

मन:स्वास्थ्य म्हणजे काय ?

       मन व शरीर एकमेकांना पूरक आहेत. मन स्वस्थ असेल तर व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीवरही मात करू शकते. परंतु सध्याच्या स्पर्धात्मक, धकाधकीच्या जीवनात मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष झाल्याने वेगवेगळे मानसिक आजार बळावत आहेत. शिवाय समाज मनोरुग्णांकडे आणि मानसिक आजारांकडे कलंकित नजरेने पाहतो. हा कलंक पुसून काढण्यासाठी दरवर्षी 10 ऑक्‍टोबर हा दिवस "जागतिक मानसिक आरोग्य दिन' तसेच 4 ऑक्‍टोबर ते 10 ऑक्‍टोबर "जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह' म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने जाणून घेऊयात मन:स्वास्थ्याविषयी थोडेसे....

       शारीरिक आरोग्याबाबत आपण नेहमीच जागरूक असतो. शासन स्तरावरदेखील शरीर स्वास्थ्यविषयक प्रश्नांना जास्त महत्व दिले जाते. मानसिक स्वास्थ्याबाबत मात्र इतकी जाणीव समाजमनापर्यंत असलेली आढळत नाही. उच्च शिक्षित लोकांमध्येही ही जाणीव फार कमी प्रमाणात असल्याचे दिसून येते. जाणीव असली तरी मानसिक स्वास्थ्याबाबत अनेक गैरसमज आढळतात. शारीरिक स्वास्थ्य बिघडले तर ते ग्राह्य आहे. परंतु एखादी व्यक्ती तऱ्हेवाईक किंवा अपेक्षित वर्तनापेक्षा/नेहमीपेक्षा वेगळी वागत असेल तर त्याला लगेच मनोरुग्ण, वेडा असे शब्दप्रयोग वापरले जातात. खरं तर ही समजूत कितपत बरोबर आहे? मानसिक स्वास्थ्य बिघडणे म्हणजे त्याला मानसिक आजार/विकृती आहे असे मानता येणार नाही. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आढळतात की, जे क्षुल्लक गोष्टीवरून लक्षणीय चिडतात, कारणे सांगून जबाबदारी टाळणारे असतात, इतरांच्या कामात चुका दाखवणाऱ्या, आपल्या मागण्यांसाठी हट्ट धरून बसतात. मग या सर्वांनाच मनोविकृती किंवा सर्वांचेच मानसिक स्वास्थ्य हरवले आहे असे म्हणता येणार नाही. कारण स्वस्थ मन आणि अस्वस्थ मन यातील सीमारेषा स्पष्ट करता येत नाही. 

        फक्त शरीराचे आरोग्य चांगले असणे आणि शारीरिक रोगापासून वंचित असणे म्हणजे आरोग्य नव्हे. आरोग्य किंवा रोगाचा अभाव या संकल्पनेमध्ये शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक पैलूंचा समावेश होतो. जी व्यक्ती या सर्व पैलूंनी संपन्न आहे, तिला स्वस्थ व्यक्तीमत्वाची व्यक्ती असे म्हणता येईल. स्वस्थ व्यक्तीमत्वाद्वारे  सर्वांगीण विकास साधण्यासाठी मानसिक दृष्टया स्वस्थ असणे आवश्यक आहे. मन आणि शरीर या दोन घटकांची यात महत्वाची भूमिका आहे. मन आणि शरीर या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोन्ही परस्पर पूरक आहेत. या दोहोंमधील क्रिया जोपर्यंत परस्परपूरक असतात तोपर्यंत व्यक्ती स्वस्थ असते. या दोन्हीत असंतुलन निर्माण झाला की अस्वस्थ मन निरोगी शरीरालादेखील रोगट करून टाकते. त्यामुळे मन जर स्वस्थ असेल तर शरीरदेखील तंदुरुस्त राहते. 

       या वरील विवेचनावरून आता मन:स्वाथ्य म्हणजे नेमके काय ते जाणून घेऊयात. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केलेल्या व्याख्येनुसार, "मानसिक अनारोग्याचा अभाव, उत्पादकता, धनात्मक अभिवृत्ती आणि समायोजनाची तयारी या गुणांनी युक्त असे वर्तन म्हणजे मानसिक स्वास्थ्य होय." वरील व्याख्येचा विचार केल्यास स्वास्थ्य म्हणजे केवळ रोगाचा अभाव नसून शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टया स्वस्थ असणारी अवस्था. मानसिक स्वास्थ्य संपन्न असणाऱ्या व्यक्तीची काही वैशिष्टये. 

१. स्वतःला समाधानी ठेवू शकणे.

२. स्वतःच्या मर्यादा व उणीवा जाणणे. 

३. अपेक्षित यश मिळवू शकणे.

४. ज्ञान मिळवु शकणे. 

५. सामाजिक संबंधाची योग्य जाण असणे. 

६. सामाजिक समायोजन साधता येणे. 

७. मन:शांतीचा आंतरिक आनंद मिळवू शकणे. 

८. निवडलेल्या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करत राहणे. 

९. मानसिक तोल ढासळू न देता वास्तवता स्वीकारून परिस्थितीला तोंड देणे.

१०. व्यक्तिगत, कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी पार पाडणे. 

      आपल्या व्यक्तिमत्वाच्या अनेक बाजू एकत्र करून एकमेकांशी गुंफण घालतो तेंव्हाच आयुष्यातले यश, अपयश, ताणतणाव, आनंद, दुःख, निराशा इत्यादी सर्व चढउतार आपण यशस्वीरीत्या, तार्किकरित्या पार पाडू शकतो. मनाची बौद्धिक व भावनिक बाजू, त्याचे हित व कल्याण ही मानसिक स्वास्थ्याची महत्वाची बाजू आहे. आजच्या या स्पर्धेच्या युगात चिंता, ताणतणाव, संघर्ष यामुळे मानसिक व्याधींचे प्रमाण वाढत आहे. कोविड सारख्या महामारीच्या काळात शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य जपण्याचे आव्हान आपल्या सर्वांसमोर उभे आहे. एकंदरीत आयुष्यातील संघर्षांवर व समस्यांवर यशस्वीपणे मात करून तसेच प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील आयुष्याची प्रगती कायम राखून सुखासमाधानाने जगणे म्हणजे मानसिक स्वास्थ्य होय. 


संदर्भ : य.च.म.मु.वि. मानसिक स्वास्थ्य

Monday, 20 September 2021

जागतिक अल्झायमर दिन विशेष

 


अल्झायमर या आजाराविषयी भारतीय समाजात एक प्रकारचा टॅबू आहे. लोक गैरसमज करून घेतील, या भीतीने आपल्याला किंवा आपल्या कुटुंबापैकी कुणाला हा आजार आहे, हे सहसा कुणी सांगत नाही. अशा लपवून ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे आपलंचं मोठं नुकसान होतं.

       हा वृद्धांना होणारा आजार आहे. या आजारावर खुलेपणाने बोलल्यास त्याविषयीची जागृती निर्माण होऊन त्या दिशेने पावलं उचलली जातील, असं प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि ज्येष्ठ तसंच डिमेंशिया रुग्णांसाठी सिल्व्हर इनिंग नावाच्या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक डॉ. शैलेश मिश्रा यांचं म्हणणं आहे.

डॉ. शैलेश मिश्रा म्हणतात, "संपूर्ण जगातच उपचाराची योग्य पद्धत काय आहे तर सुरुवातीच्या टप्प्यातच आजाराचं निदान करावं. पण आपल्याकडे काय होतं, या आजाराला एक स्टिग्मा आहे. लोक वेडे म्हणतील, म्हणून ती व्यक्ती किंवा तिचे कुटुंबीय कुणालाही याबद्दल सांगत नाहीत आणि डॉक्टरांकडेही जात नाहीत."

ते पुढे म्हणतात, "अटल बिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस, तेजी बच्चन यांसारख्या अनेकांना अल्झायमर होता. मात्र, इतरही अनेक जणांना हा आजार असूनही ते सार्वजनिक पातळीवर मान्य केलं जात नाही किंवा त्याबद्दल सांगितलं जात नाही. "

अल्झायमर म्हणजे काय?

या आजाराविषयी थोडं जाणून घेऊया. अल्झायमर हा मेंदूशी संबंधित आजार आहे. साठ वर्षांपेक्षा मोठ्या व्यक्तींना अल्झायमर होतो. अल्झायमर हा डिमेंशिया या सिंड्रोमचा एक प्रकार आहे. डिमेंशियाचे वेगवेगळे प्रकार आहेत. मात्र, या सगळ्या प्रकारांमध्ये व्यक्तीच्या स्मृतीवर (Memory) परिणाम होतो. मराठीतत याला स्मृतीभ्रंश म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचं तर विसरभोळेपणा.

1906 साली डॉक्टर अल्झायमर यांनी सर्वात आधी या आजाराविषयी सांगितलं. त्यामुळे याला अल्झायमर असं नाव देण्यात आलं.

बोलणे, ऐकणे, वास घेणे, हात हलवणे, चालणे, जेवण करणे, स्वच्छेतेच्या क्रिया हे सगळं मेंदुतल्या काही पॉईंट्समधून नियंत्रित होत असतं. अशा वेगवेगळ्या पॉईंट्सना जेव्हा इजा होते तेव्हा शरीरातल्या संबंधित अवयवापर्यंत सूचना पोहोचत नाही आणि ती क्रिया बंद पडते किंवा ती क्रिया आपण विसरतो.

उदाहरणार्थ अल्झायमरचा रुग्ण ब्रश करणे, स्वच्छतेच्या क्रिया करणे, हेसुद्धा विसरतो. इतकंच नाहीतर तोंडात घास टाकल्यावर तो गिळायलाही विसरतो. 80 वर्षांपेक्षा मोठ्या असलेल्या 50 टक्के व्यक्तींना डिमेंशिया होण्याची शक्यता असते. सध्या भारतात 43-50 लाख डिमेंशियाचे रुग्‌ण आहेत. सामाजिक, आर्थिक, धार्मिक सांस्कृतिक असं कुठलंही बंधन या आजाराला नाही. गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित अशा कुणालाही हा आजार होऊ शकतो.

मानसोपचारतज्ज्ञ आणि न्यूरोलॉजिस्ट या रोगाचं निदान करतात. आजाराचं निदान करण्यासाठी एक प्रश्नावली असते. त्या प्रश्नाची उत्तरं घेतली जातात. त्यावरून एखाद्याला डिमेंशिया आहे का, हे शोधता येतं. याशिवया, MRI करूनही या आजाराचं निदान करतात.


का होतो अल्झायमर ?

अल्झायमरची अनेक कारणं आहे. कुठल्याही एका कारणामुळेच तो होतो, असं नाही. काही कारणं खालीलप्रमाणे आहेत.

वय : 60 वर्षांपेक्षा जास्त वय, हे डिमेंशियाचं कारण असू शकतं.

समाजापासून दुरावणे : लोकांमधली उठबस, संवाद कमी होणे किंवा इतर निवृत्ती, शहर किंवा देश बदलणे, यासारख्या कारणांमुळे आलेला एकटेपणा यामुळेही अल्झायमर होऊ शकतो.

हृदयाशीसंबंधित आजार : मधुमेह, रक्तदाब यासारख्या हृदयाशी संबंधित आजार असणाऱ्या व्यक्तींना हा आजार होऊ शकतो.

ब-जीवनसत्त्वाची कमतरता : डॉक्टर सांगतात भारतात बहुतांश शाकाहारी खाद्यसंस्कृती आहे. त्यामुळे आपल्या जेवणात ब जीवनसत्त्वाची कमतरता असते. विशेषत महिलांमध्ये आणि अल्झायमर होण्याचं हेदेखील एक कारण आहे.


अल्झायमर चे टप्पे

अल्झायमर हा आजार पूर्णपणे बरा होत नाही. पण, काही औषधं आणि उपचारांच्या माध्यमातून आजार स्थिर ठेवता येतो. म्हणजे तो वाढत नाही. त्यामुळे सुरुवातीच्या स्टेजमध्येच रुग्णाला योग्य उपचार मिळाले तर रुग्णाला 10-15 वर्ष किंवा त्याहूनही जास्त काळ सामान्य आयुष्य घालवता येतं.

या आजाराविषयी सांगताना डॉक्टर सागर मुंदडा सांगतात, "अल्झायमरमध्ये जसजसं वय वाढतं तसा मेंदूचा आकार लहान होत जातो. मेंदुतल्या वळ्या कमी होत जातात. यामुळे विसरभोळेपणा येतो. अल्झायमर झालेल्या व्यक्तींना काही तासांपूर्वी घडलेल्या गोष्टींचा विसर पडतो."

या आजाराच्याही काही स्टेजेस असतात. या स्टेजसविषयी अधिक माहिती देताना डॉ. सागर सांगतात, "आजाराच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये रुग्णाला नुकत्याच घडून गेलेल्या गोष्टी आठवायला त्रास होतो. उदाहरणार्थ सकाळी काय खाल्लं हे दुपारी आठवत नाही. ही सुरुवातीची स्टेज मानली जाते."

मात्र, काही रुग्णांमध्ये याआधीही काही लक्षणं दिसतात. विनाकारण चिडचिडण होणे, गाढ आणि शांत झोप न लागणे, कुठल्याच गोष्टीत आनंद न वाटणे, नैराश्य येणे, अतीविचार करणे हीदेखील अल्झायमर किंवा डिमेंशियाची अतिशय सुरुवातीची लक्षणं असू शकतात. मात्र, ही प्रत्येकच रुग्णामध्ये दिसतीलच असं नाही.

यापुढच्या स्टेजेसविषयी डॉ. सागर सांगतात, "आजाराची पुढची स्टेज असते ज्यात क्रमाने कराव्या लागणाऱ्या गोष्टी करण्यात रुग्णाला अडचणी येतात. उदाहरणार्थ भाजी करायची असेल. तर ती कुठल्या क्रमाने करायची, हे रुग्णाला आठवत नाही.

गाडी चालवणे, कपडे घालणे यासारख्या गोष्टी ज्यात एकानंतर दुसरी क्रिया एका विशिष्ट क्रमाने कराव्या लागतात, त्या त्यांना जमत नाही. या पुढचा टप्पा म्हणजे रुग्ण घराच्याच व्यक्तींना ओळखत नाही किंवा ओळखलं तर दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने ओळखतात. चेहरा बघून आपण या व्यक्तीला ओळखतो असं त्यांना वाटतं. पण नाव आठवत नाही. घरचा पत्ता आठवत नाही. पाठ असलेले मोबाईल नंबर आठवत नाही. या स्टेजपर्यंत उपचार मिळाले नाही तर रुग्णांना दिवस आहे की रात्र, तारीख, महिना, वर्ष हेसुद्धा लक्षात राहत नाही."

डिमेंशियाच्या दुसऱ्या टप्प्यात रुग्णाची चिडचिड वाढते, तो कपडे घालायला विसरतो आणि तिसऱ्या स्टेजमध्ये तो पूर्णपणे इतरांवर अवलंबून राहतो. म्हणजे घरचा पत्ता आठवत नाही, त्यामुळे एकट्याने घराबाहेर पडता येत नाही. आंघोळ कशी करायची, आधी साबण लावायचा की पाणी हेही विसरतो. त्यामुळे आंघोळ घालावी लागते. आता टॉयलेटला जायचं आहे, याची सूचना मेंदूकडून मिळत नाही. त्यामुळे कुठेही सू-शी होते. अशावेळी डायपर वापरावे लागतात.

स्मृतीभ्रंशाच्या या स्टेजेस असल्या तरी याच क्रमाने प्रत्येक रुग्णाला त्रास होतो, असं नाही. अनेक रुग्ण कित्येक वर्ष पहिल्या स्टेजमध्येच असतात. तर काही रुग्णांमध्ये चार महिन्यातच त्रास वाढतो.


डॉक्टरांकडे कधी जायचं ?

याआधी सांगितल्याप्रमाणे हा ज्येष्ठ नागरिकांना होणारा आजार आहे. तेव्हा डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वयाच्या पन्नाशीनंतर प्रत्येकाना दर सहा महिन्यांनी ब्लड टेस्ट करायला हवी. रुटीन चेकअप करायला हवं. यात लिव्हर प्रोफाईल, किडनी प्रोफाईल, व्हिटॅमिन बी-12, व्हिटॅमिन डी यांची टेस्ट करायला हवी. मात्र, काही गोष्टी अशा आहेत की ज्या जाणवल्यावर डॉक्टरांचा सल्ला नक्की घेतला पाहिजे.

लहान-लहान गोष्टींचा विसर पडत असेल. उदाहरणार्थ 1000 लिहिताना एकावर किती शून्य लिहायचे ते विसरणे. लोकांची नावं विसरणे. कुलुपाची नेमकी किल्ली कोणती, ते विसरणे, गाडीची चाबी फ्रिजमध्ये ठेवणे.

कारण नसताना सारखी चिडचिड होत असेल.

कुठल्याच गोष्टीत आनंद न वाटता नैराश्य येत असेल. कुठल्याही कामात सहभागी होण्याची इच्छा होत नसेल.

अशी काही लक्षणं असल्यावर डॉक्टरांची मदत नक्की घ्यावी. यापैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त लक्षणं असल्यावर तो डिमेंशिया किंवा अल्झायमर असेलच असं नाही.

कदाचित काही मानसिक ताण किंवा इतरही आजार असू शकतात. मात्र, त्याच योग्य निदान डॉक्टरांकडे गेल्यावरच होऊ शकतं. त्यामुळे एखादी गोष्ट क्षुल्लक आहे, असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही.


अल्झायमर रुग्णांची काळजी कशी घ्यावी

अल्झायमर झालेला रुग्ण गोष्टी विसरतो. त्यामुळे त्याला वारंवार गोष्टी लक्षात आणून द्याव्या लागतात. हे करताना सर्वात महत्त्वाचा ठरतो तो संयम. अल्झायमर रुग्णाला प्रेमाची आणि आपुलकीची गरज असते.

व्यक्ती जेव्हा लहान-लहान गोष्टी विसरायला लागतो त्यावेळी कुटुंबीयांना त्याचा खूप त्रास होतो आणि रुग्णाबरोबरच त्याच्या कुटुंबीयांचीही चिडचिड वाढते. त्यामुळे अल्झायमरचा रुग्ण म्हणजे लहान बाळ हे कायम लक्षात ठेवून शांतपणे प्रत्येक गोष्ट सांगणं गरजेचं असतं.

तुम्ही आता काही कामाचे नाहीत, एकच गोष्ट कशी वारंवार सांगावी लागते, असं म्हटल्याने रुग्णाचं मानसिक खच्चीकरण होत असतं. अशा रुग्णांचा तिरस्कार करणे, थट्टा-मस्करी करणे योग्य नाही. त्यांना कुटुंबाच्या आणि एकूणच समाजाच्या पाठिंब्याची गरज असते.


अल्झायमर ग्रस्त रुग्ण आणि कुटुंब

आजारपण म्हटलं की रुग्णाबरोबरच त्याच्या कुटुंबालाही त्याचा त्रास होतो. मात्र, अल्झायमर या आजारात रुग्णापेक्षा कुटुंबीयांना जास्त त्रास होतो. अल्झायमर झालेला रुग्ण गोष्टी विसरतो. पण, कपडे घालायला विसरणे, कुठेही नैसर्गिक विधी करणे, वस्तू जागेवर न ठेवणे या सगळ्या गोष्टींचा त्याच्या कुटुंबीयांना अतिशय त्रास होत असतो. रुग्णाची चिडचिड वाढते. अशावेळी कुटुंबीयांचा संयम संपतो.

डॉ. मिश्रा म्हणतात, "पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत घरी कुणीतरी सतत असायचं. त्यामुळे म्हाताऱ्या माणसांची, रुग्णांची काळजी घेतली जायची. मात्र, आज परिस्थिती बदलली आहे. विभक्त कुटुंब झालेली आहेत. स्त्रियासुद्धा घराबाहेर पडल्या आहेत. शहरातली घरं छोटी झाली आहेत. अशावेळी घरात एखादा अल्झायमर झालेली व्यक्ती असेल तर तिचा सांभाळ करणं फार अवघड होतं."

दुसरं म्हणजे हा खूप खर्चिक आजार आहे. डिमेंशियाच्या रुग्णांना सारखे डायपर वापरावे लागतात. वृद्धांचे डायपर महाग असतात. शिवाय, घरात सगळे कामावर जाणारे लोक असतील तर रुग्णासाठी केअर टेकर ठेवावा लागतो, त्याला 8 तासांचे 700 ते 800 रुपये मोजावे लागतात. म्हणजे अशा रुग्णांसाठी महिन्याला 30 ते 40 हजार रुपयांचा खर्च येतो.

शिवाय, डिमेंशियाच्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करता येत नाही. कारण विसरभोळेपणाव्यतिरिक्त इतर कुठलाही शारीरिक त्रास त्यांना नसतो. त्यामुळे ते घरीच असतात. ही सगळी परिस्थिती कुठल्याही कुटुंबासाठी कष्टप्रद असते.


रुग्णाची काळजी

डिमेंशिया किंवा अल्झायमरच्या रुग्णांना प्रेम आणि जिव्हाळा अत्यंत महत्त्‌वाचा असतो. याशिवाय संगीत, नृत्य, चेअर योगा, छंद अशा वेगवेगळ्या मिनिंगफुल अॅक्टिव्हिटीज फार महत्त्वाच्या असतात.

डिमेंशिया रुग्णांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत त्यासाठीचं काम झालेलं नाही, अशी खंत डॉ. मिश्रा व्यक्त करतात. ते म्हणतात, "या आजारासाठी सरकारी पातळीवर म्हणावे तितके प्रयत्न झालेले नाही. महाराष्ट्रात सरकार मेमरी क्लिनिक सुरू करणार होते. पण ते काम कितपत झालं, याची काहीही माहिती नाही. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये मेमरी क्लिनिक हवं. आरोग्य सेवकांना विशेष प्रशिक्षण हवं."

डॉ. मिश्रा म्हणतात, "डिमेंशियाच्या रुग्णांची संख्या बघता राष्ट्रीय डिमेंशिया धोरणाची गरज आहे. याअंतर्गत प्रत्येक वॉर्डात डिमेंशिया डे-केअर असायला हवं. लहान मुलांना जसं आई-वडील दिवसभर डे-केअरमध्ये ठेवून आपापल्या कामावर जातात. तसेच सेंटर्स डिमेंशिया रुग्णांसाठी हवे.

दुसऱ्या आणि त्यापुढच्या टप्प्यातल्या रुग्णांसाठी असिस्टेड लिव्हिंग केअर होम्स हवेत. जिथे रुग्णांची 24 तास काळजी घेतली जाईल. त्यानंतर होम केअर सर्व्हिस हवी. यात डिमेंशिया आजाराच्या दृष्टीने प्रशिक्षित आरोग्य सेवक हवे त्या वेळेला घरी येऊन रुग्णांची तपासणी करू शकतात."

भारतात आज घडीला केवळ दहा डिमेंशिया केअर होम्स आहेत.

याशिवाय केअर गिव्हरना प्रशिक्षण देण्यासाठी एक दीर्घकालीन योजना सरकारने आखायला हवी. इतकंच नाही तर मेडिकल कॉलेजसमध्ये डॉक्टर आणि नर्सेसना डिमेंशिया उपचारासंबंधीचं प्रशिक्षण देणंही गरजेचं असल्याचं डॉ. मिश्रा यांचं म्हणणं आहे.

ते म्हणतात, "भारतात डिमेंशिया एमडी डॉक्टर नाहीत. म्हणजेच भारतात डिमेंशिया स्पेशलिस्ट नाहीत. एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात डिमेंशिया आजार हा अभ्यासक्रमाचा खूप छोटा भाग आहे. मानसोपचारामध्ये एमडी करणाऱ्या डॉक्टरांनाच या विषयाची सविस्तर माहिती अभ्यासक्रमात असते. या सगळ्यामधून एक चांगलं वातावरण तयार होईल."


प्रतिबंधात्मक उपाय

डिमेंशिया कधीही होऊ नये, यासाठी खात्रीशीर उपाय नाही. मात्र, जीवनशैलीमध्ये काही बदल करून हा आजार दूर ठेवता येतो.

हृदय निरोगी ठेवा

चांगली झोप घ्या

जीवनशैली उत्तम ठेवा

रोज किमान 30 मिनिटं योगा, व्यायाम, सायकलिंग, रनिंग असा एकतरी व्यायाम प्रकार करा

दारू, सिगारेट, तंबाखू, अशी व्यसनं टाळा

मिनिंगफुल अॅक्टिव्हिटीजमध्ये स्वतःला गुंतवा.

सकस आणि ताजं अन्न खा. साखर, मीठ यांचा आहारात कमी प्रमाणात समावेश करा.

डॉ. मिश्रा सांगतात, "एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा म्हातारपणात होणारा आजार असला तरी त्याची सुरुवात 40 ते 50 व्या वर्षापासून होते. माझं वय 40 ते 50 च्या घरात असेल आणि मी खूप व्यसनं करत असेन, सतत पिझ्झा, बर्गर खात असेन, पुरेशी झोप घेत नसेन किंवा दिवसातला रिकामा वेळ मिनिंगफुल अॅक्टिव्हिटीमध्ये न घालवता तासनतास टिव्ही किंवा मोबाईलसमोर बसत असेन तर अशा प्रकारचे त्रास होणार, हे निश्चित."

पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये तर 40-50 वर्षांच्या लोकांमध्येही हे आजार दिसू लागले आहेत. त्यामुळे आपणही यातून शिकवण घेऊन घरात कुणाला विसरभोळेपणा आहे, याची लाज वाटून न घेता त्यावर उपचार घेतले पाहिजे.


डिमेंशिया किंवा अल्झायमर झालेली व्यक्ती स्वतः सगळं विसरत असते. त्यामुळे तिच्या काहीच लक्षात राहत नाही. अशावेळी तुम्ही तिच्यावर योग्य उपचार केले नाही तर तो आपल्या प्रिय व्यक्तीवर अत्याचार ठऱत असतो.


- नूतन कुलकर्णी
बीबीसी मराठी
bbc.com

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

        आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्...