Welcome to the Blog of Department of Psychology at Kanya Mahavidyalaya, Miraj

Thursday, 17 June 2021

आरोग्य

        सध्या सगळ्यात जास्त महत्त्वाचे काय आहे अस जर कोणाला विचारल तर 80% लोक हेच सांगितलं की आपल आरोग्य सगळ्यात महत्त्वाचे आहे. कोरोनानी आपल्याला दिलेल्या शिकवणीत महत्त्वाची ही शिकवण आहे आणि नक्की ते सर्वांना पटले असावे, असे मला वाटते. खर तर आपल्या पूर्वजांनी पूर्वीच आपल्याला शिकवल आहे आरोग्यंम धनसंपदा. आपण मात्र ते आरोग्य आणि धनसःपदा अस वेगवेगळे केले आणि त्यातली संपदा महत्त्वाची मानली. 

   त्यात आपण हेही विसरलो हे आपल शरीर आहे ते मशिनसारख काम करत असेल तर ते मशिन कधीकधी सव्हिंसिंग मागत. त्याची एक सिस्टीम आहे, त्यात बिघाड होऊ  शकतो , तीपण दुरूस्त करायला लागते .  

  लोक सांगतात अहो माणूस काल पर्यत चांगला होता अचानक त्याला हार्टॲंटॕक आला. पण मला सांगा शरीर खरच काहीच इशारा देत नाही का? 

   स्त्रियांचे असे काॕमन आजार आहेत जे १०० पैकी ८० स्त्रीयांना होतात . ज्यातला एक आजार म्हणजे गर्भाशयाचा आजार . पण किती स्त्रीया याची काळजी घेतात. यावर एक साधा उपाय आहे तो म्हणजे स्त्रीयांची मासिक पाळी बंद झाली की एकदा डाॕक्टर कडे जाऊन तपासणी करून घ्यायची असते, पण आज कमवत्या अगदी ऊच्च शिक्षित महिला सुध्दा हे करताना दिसत नाहीत. ब्यूटीपार्लर मध्ये चार तास घालवणार्या बायकांकडे डाॕक्टर कडे जाण्यासाठी वेळच नसतो.

साध डोक तर दुखतय त्या साठी कशाला डाॕक्टर कडे जायच ? मान्य , पण हे जर वारंवार होत आहे तर प्रत्येक वेळी पेनकिलर घेऊन काम चालवण किती योग्य आहे ? 

  मागच्या आठवड्यात मला पण असच झाल होत मी हाहा उपाय केला आजपर्यंत त्रास नाही .तू पण हे करुन बघ. कशाला डाॕक्टर हवा.  पण एखाद्याला निळा रंग आवडतो तर एखाद्याला नाही आवडत,, एवढा बाह्य बदल आपल्याला मान्य आहे, मग तुमच शरीर आतून एकच असेल ? कस काय शक्य  आहे? 

    आता वेळ आली आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा. आतातरी आपण जर विचार नाही केला तर आपल्या हातात काहीही राहणार नाही . आपणही ह्या निसर्गाचा अविभाज्य भाग आहोत, त्याने मोठ्या मेहनतीने कदाचित हा मानव बनवला असेल जो सगळ्याच संवर्धन करण्यासाठी त्याने बनवला आहे .त्यासाठीच त्याला सगळ्यात मोठी ताकद दिली आहे ती म्हणजे बुद्धी . तिचा वापर करा आणि विचार करा .


  - समूदेशक सुजाता डोंगरे 

   

No comments:

Post a Comment

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

        आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्...