Welcome to the Blog of Department of Psychology at Kanya Mahavidyalaya, Miraj

Tuesday, 12 April 2022

स्त्री सुलभ मन गेलं कुठे?

 

माझ्या देशातील भगिनींनो, आपण महिला, क्लारा झेटकीन याना, त्यांनी महिलांसाठी केलेल्या चळवळीसाठी मनापासून  धन्यवाद देत आलोय,देतोय. त्यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय महिला दिन सुरू झाला. स्त्रीला स्वतःचा हक्क मिळाला. ती आपली मतं मांडू शकली. 

  पण, सख्यानो, तुम्हाला माहिती आहे का?स्वतःची मत मांडणं, हक्कासाठी झगडणं, न्यायासाठी पुढे येणं ह्या गोष्टी सुरू असताना, त्या हक्कांचा काही वेळेस गैरवापर होतोय का? हे सुद्धा समाजात, महिलांनी पाहिलं पाहिजे ना?

  महिलांना, योग्य वेळी,योग्य त्या कारणासाठी झगडताना,लढताना पाहिलं की अभिमान वाटतो. आम्हीही आहोत त्यांच्यासोबत!  समाजातील स्त्री वर मानसिक ,शारीरिक अत्याचार,स्त्री भ्रुण हत्या, बलात्कार, शोषण कितीतरी क्लेशदायक गोष्टी पूर्वीपासून आणि अजूनही सुरू आहेत...ह्या घटना एकीकडे हृदय पिळवटून टाकतात. मग, त्यांच्यासाठी आपल्याकडून खारीचा वाटा मदत करताना, शब्दांनी त्यांची पाठ थोपटावी, आधार द्यावा,त्यांना वर उचलून घ्यावं ,त्यांना नवीन जीवन जगण्यास प्रेरणा द्यावी  आणि त्याच शब्दांनी समाजात कस पेटून उठावं? हे ही शिकवलं जातं. आणि त्या महिलांनाही आपला हक्क काय हे समजावं  हे साधे सहज कार्य हे  सुरू असत. पण दुसरीकडे चित्र दिसतंय ते खूपच भयंकर!

     सखी, आपल्यातल्याच काहीजणी आपल्या देशाची संस्कृती , धर्माचे संस्कार पायदळी तुडवत आहेत. विसरत चाललीय का संस्कृती? की साता समुद्रापलीकडच्या मॉड संस्कृतीच आकर्षण वाटून आपल्या संस्कारांचा अवलंब मुद्दाम केला जात नाहीए? तुम्हाला आपले संस्कार 'चीप' वाटू लागलेत? 

   ...हो आता तुम्हाला कसलंही बंधन नको असत. बरोबर ना? तुम्ही लग्नासारख्या पवित्र संस्काराला लाथाडून 'सिंगल' राहण पसंत करत आहात. कारण चतुर्भुज होण्यातली जबाबदारी आता नकोय तुम्हाला.  हवं तेव्हा गरजेपुरत डबल होणं...हे स्वीकारता तुम्ही. कारण त्यात भावनिक गुंतवणूक नसते. तुमच्या अपेक्षा वाढल्यात.. कारण तुमचं पॅकेज वाढलंय! अशा वेळी तुमच्या वयाचा विचार करता? हल्लीची आई सुद्धा मुलीला काय शिकवण देते कुणास ठाऊक? ...मुलीच लग्नाचं वय, मानसिक,शारीरिक बदल ,त्या त्या वयातील गरजा ,गरोदरपण, बाळंतपण , मुलांची वाढ ह्या सर्व गोष्टींचा सारासार विचार आज करण्यात येतो का? कितीतरी मुली फॅशन म्हणून गर्भाशयाच काढून टाकत आहेत. मग गरोदरपण , बाळंतपण काय? हाताचा झुला काय? नी अमृताचा पान्हा काय?  महिलांचं स्त्री सुलभ मन कुठे गेल? त्यांच्या ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक मार्ग मूलं आणि मुलीही शोधतात. अनेक ऑफिस मध्ये, कॉर्पोरेट मध्ये,  अनेक...अनेक... ठिकाणी आज जे चित्र दिसत, ऐकिवात येत,ते भयंकर आहे. विचित्र आहे.

   काही ठिकाणी महिला पुरुषांचं आणि महिलांचंही मानसिक आणि शारीरिक शोषण करत आहेत. मग स्वतः लग्न केलेलं असो वा नसो, बेताल वागणे, कोणतीही मर्यादा नसणे, स्वतःसोबत दुसऱ्याच चारित्र्य ही नष्ट करणे. क्षणभंगुर सुखासाठी दुसऱ्याच्या वैवाहिक जीवनात महिला लुडबुड करताना, व्यभिचार करताना दिसत आहेत.

    हक्क,स्वातंत्र्य याचा योग्य अर्थ न समजून घेता... चक्क अनेक ठिकाणी स्वैराचार करत आहेत. अशा महिलांना सखी म्हणण्याचीही लाज वाटते.

    आणखी एक गोष्ट विचारविशी वाटते,किती स्त्रिया एकमेकींना समजून घेतात? की जगासमोर आम्ही समजून घेतो असा आव आणतात? सासू,सून,नणंद,बहीण,आई, वहिनी,मैत्रीण, शेजारीण? कितीतरी स्त्री नाती... असूया,मत्सर असा काही तुडुंब भरलेला असतो की जर कुणी आपल्या पुढे जाते म्हटलं की एकमेकांचे पाय ओढणे, गॉसीपिंग करणं सुरू होत. आज आपल्याला 'टिपिकल स्त्री' म्हणून जगत, मिळालेल्या संधी वाया घालवायच्या आहेत? की काहीतरी वेगळं करायचंय?  आपला आदर्श ठेवायचा आहे? आपण पुढे जात असताना, 'ती' आणि 'त्या' सोबत येत असतील तर त्यांचा हात धरावा की मागे ढकलाव? काही वेळेस तर स्त्री कडून स्त्रीलाच माणूस म्हणूनही वागणूक मिळत नाही. मग समाज, पुरुष आणि जगाच काय घेऊन बसलात? 

    सर्वतोपरी  विकास साधायचा असेल तर उच्च ध्येयासोबत, निरामय पारदर्शकता , सहिष्णुता, मैत्रीपूर्ण संबंध, सहनशीलता, चिकाटी  या गोष्टी अतिशय गरजेच्या असतात. 

   आपला, आपल्या कुटुंबाचा, राज्याचा,देशाचा विकास आपण स्त्री म्हणून करू शकतो. तेवढं सामर्थ्य आपल्यात आहे. पण प्रत्येक स्त्री ने आज, मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर आपल्या वागणुकीचा स्वतः विचार करावा.  आपण कुठे योग्य ,अयोग्य वागत आहोत का? आपली विचारसारणी आपलं वर्तन आणि त्यानुसार भोवतालच वलय तयार करत असते. मग त्या वलयातील आजची झाशी, जिजाबाई, सावित्रीबाई ,रमाबाई व्हायचं की अनेकांचे संसार उध्वस्त करण्यास कारणीभूत ठरायच याचा विचार तीनच केला पाहिजे.


*©® सौ अश्विनी कुलकर्णी*

*सांगली*

Friday, 1 April 2022

जागतिक स्वमग्नता दिन विशेष

 आज 2 एप्रिल, जागतिक स्वमग्नता जनजागृती दिवस. या दिनानिमित्ताने जाणून घेऊयात स्वमग्नतेविषयी....











संदर्भ : vachanmitra. com

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

        आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्...