Pages

Wednesday, 31 March 2021

आनंदी क्षणाच्या आठवणी

तरुण संजय अचानक वारला. त्याचे आई वडील, पत्नी व नऊ वर्षाचा मुलगा त्याच्या शवाजवळ  रडत बसले.

ते सर्वजण एका साधुला खूप मानत होते.


 त्या  साधुनांं  संजयची दुखःद बातमी कळताच ते संजयच्या कुटुंबियाना भेटायला आले.


घरात प्रवेश करताच संजयचे पूर्ण कुटूंब रडत असल्याचे पाहिले. साधुनां  पहाताच संजयची बायको अजून जोरात रडू लागली.

दुखाःने म्हणाली, " महाराज, हे तरुण वयात आम्हाला सोडून गेले आता माझ्या मुलाच कसे होईल...?😭

याना परत आणा.

 त्याना परत आणण्यासाठी मी काही क़रायला तयार आहे." साधुमहाराजानी पत्नी व वृध्द आई वडिलांचे सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला पण संजयच्या अकाली मृत्यूचा आघात पचविणे त्याना जड जात होते.


शेवटी साधुमहाराज  म्हणाले, " ठिक आहे, मला पंचपात्रभर पाणी द्या." ते शवाजवळ पंचपात्र घेवून बसले

व म्हणाले, "ज्याला कोणाला संजय जिवंत व्हावा असं वाटते त्याने पंचपात्रातील पाणी प्यावे. संजय जिवंत होईल पण पाणी पिणारा मरण पावेल"


स्मशान शांतता.!🤕


"चला, तुम्हीच म्हणाला होता ना की, संजय कुटुंबातील एकुलता एक कमविता आहे? त्याच्या ऐवजी कोण मरायला तयार आहे? ही एक आदलाबदलीची चांगली संधी आहे,


 हो ना?"


संजयची बायको व वृध्द आई एकामेकीच्याकडे पाहू लागल्या. वृध्द वडिल संजयच्या मुलाकडे पाहू लागले. पण कोणी पुढे येईना 

साधु वडिलांना  म्हणाले, " बाबूजी, तुम्ही तुमचे आयुष्य तुमच्या मुलासाठी देत नाही का?"

बाबूजी म्हणाले, "माझ्या पत्नीची

जबाबदारी माझ्यावर आहे. मी मेलो तर तिच्याकडे कोण पाहिल? मी नाही आयुष्य देवू शकत."


महाराजांनी  प्रश्नार्थक मुद्रेने वृध्द आईकडे पहात विचारले, " आई..तुम्ही ?"

आई म्हणाली, "माझ्या मुलीचे पहिले बाळंतपण आहे. ती आता येणार आहे. मी मेले तर मुलगी व होणार्‍या बाळाला कोण पाहिल? तुम्ही संजयच्या बायकोला का विचारीत नाही?”

साधु महाराजांनी हसून संजयच्या तरुण पत्नीकडे पाहिले. ती अश्रूने भरलेले डोळे विस्फारुन म्हणाली, "महाराज, मला माझ्या मुलासाठी जगले पाहिजे. मी मेले तर त्याला कोण? कृपा करुन मला हा त्याग करायला सांगू नका..”साधुनी संजयच्या मुलाला विचारले, "बाळा! तू तुझे आयुष्य वडिलाना देण्यास तयार आहे?"


मुलगा काही बोलायच्या आत त्याच्या आईने मुलाला ओढून छातीजवळ धरून म्हणाली,

"साधु महाराज, 

तुम्हाला वेड लागलय "?

माझा पोरगा फक्त नऊ वर्षाचा आहे. त्याने अजून पुरेसं जग पण पाहिलं नाही. तुम्ही त्याचा कसा विचार करु शकतो.

साधुमहाराज म्हणाले, "बहुतेक याचा अर्थ तुम्हा सर्वांची या जगात काही ना काही कारणासाठी जरुरी आहे. संजयचं एकटा बिन कामाचा होता म्हणून तो गेला. तरी आता त्याचे अंतिम संस्कार करायला सुरवात करायची का? आधीच ऊशीर झाला आहे”


एवढे बोलून साधु निघून गेले. 

तात्पर्य :---

जोपर्यत जीवंत आहात प्रेम तोपर्यंतच.

त्यानंतर फक्त आनंदी क्षणाच्या आठवणी..!


संकट समयी प्रामाणिक व श्रीमंतीत साधे रहा.

अधिकार असताना समंजस व रागावलेला असताना शांत रहा. .....


म्हणुनच कवी भा. रा. तांबे 

म्हणतात......जन पळभर म्हणतील हाय हाय ............

              🙏🙏🙏🙏


संदर्भ: मनसंवाद

No comments:

Post a Comment