Welcome to the Blog of Department of Psychology at Kanya Mahavidyalaya, Miraj

Monday, 20 September 2021

जागतिक अल्झायमर दिन विशेष

 


अल्झायमर या आजाराविषयी भारतीय समाजात एक प्रकारचा टॅबू आहे. लोक गैरसमज करून घेतील, या भीतीने आपल्याला किंवा आपल्या कुटुंबापैकी कुणाला हा आजार आहे, हे सहसा कुणी सांगत नाही. अशा लपवून ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे आपलंचं मोठं नुकसान होतं.

       हा वृद्धांना होणारा आजार आहे. या आजारावर खुलेपणाने बोलल्यास त्याविषयीची जागृती निर्माण होऊन त्या दिशेने पावलं उचलली जातील, असं प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि ज्येष्ठ तसंच डिमेंशिया रुग्णांसाठी सिल्व्हर इनिंग नावाच्या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक डॉ. शैलेश मिश्रा यांचं म्हणणं आहे.

डॉ. शैलेश मिश्रा म्हणतात, "संपूर्ण जगातच उपचाराची योग्य पद्धत काय आहे तर सुरुवातीच्या टप्प्यातच आजाराचं निदान करावं. पण आपल्याकडे काय होतं, या आजाराला एक स्टिग्मा आहे. लोक वेडे म्हणतील, म्हणून ती व्यक्ती किंवा तिचे कुटुंबीय कुणालाही याबद्दल सांगत नाहीत आणि डॉक्टरांकडेही जात नाहीत."

ते पुढे म्हणतात, "अटल बिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस, तेजी बच्चन यांसारख्या अनेकांना अल्झायमर होता. मात्र, इतरही अनेक जणांना हा आजार असूनही ते सार्वजनिक पातळीवर मान्य केलं जात नाही किंवा त्याबद्दल सांगितलं जात नाही. "

अल्झायमर म्हणजे काय?

या आजाराविषयी थोडं जाणून घेऊया. अल्झायमर हा मेंदूशी संबंधित आजार आहे. साठ वर्षांपेक्षा मोठ्या व्यक्तींना अल्झायमर होतो. अल्झायमर हा डिमेंशिया या सिंड्रोमचा एक प्रकार आहे. डिमेंशियाचे वेगवेगळे प्रकार आहेत. मात्र, या सगळ्या प्रकारांमध्ये व्यक्तीच्या स्मृतीवर (Memory) परिणाम होतो. मराठीतत याला स्मृतीभ्रंश म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचं तर विसरभोळेपणा.

1906 साली डॉक्टर अल्झायमर यांनी सर्वात आधी या आजाराविषयी सांगितलं. त्यामुळे याला अल्झायमर असं नाव देण्यात आलं.

बोलणे, ऐकणे, वास घेणे, हात हलवणे, चालणे, जेवण करणे, स्वच्छेतेच्या क्रिया हे सगळं मेंदुतल्या काही पॉईंट्समधून नियंत्रित होत असतं. अशा वेगवेगळ्या पॉईंट्सना जेव्हा इजा होते तेव्हा शरीरातल्या संबंधित अवयवापर्यंत सूचना पोहोचत नाही आणि ती क्रिया बंद पडते किंवा ती क्रिया आपण विसरतो.

उदाहरणार्थ अल्झायमरचा रुग्ण ब्रश करणे, स्वच्छतेच्या क्रिया करणे, हेसुद्धा विसरतो. इतकंच नाहीतर तोंडात घास टाकल्यावर तो गिळायलाही विसरतो. 80 वर्षांपेक्षा मोठ्या असलेल्या 50 टक्के व्यक्तींना डिमेंशिया होण्याची शक्यता असते. सध्या भारतात 43-50 लाख डिमेंशियाचे रुग्‌ण आहेत. सामाजिक, आर्थिक, धार्मिक सांस्कृतिक असं कुठलंही बंधन या आजाराला नाही. गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित अशा कुणालाही हा आजार होऊ शकतो.

मानसोपचारतज्ज्ञ आणि न्यूरोलॉजिस्ट या रोगाचं निदान करतात. आजाराचं निदान करण्यासाठी एक प्रश्नावली असते. त्या प्रश्नाची उत्तरं घेतली जातात. त्यावरून एखाद्याला डिमेंशिया आहे का, हे शोधता येतं. याशिवया, MRI करूनही या आजाराचं निदान करतात.


का होतो अल्झायमर ?

अल्झायमरची अनेक कारणं आहे. कुठल्याही एका कारणामुळेच तो होतो, असं नाही. काही कारणं खालीलप्रमाणे आहेत.

वय : 60 वर्षांपेक्षा जास्त वय, हे डिमेंशियाचं कारण असू शकतं.

समाजापासून दुरावणे : लोकांमधली उठबस, संवाद कमी होणे किंवा इतर निवृत्ती, शहर किंवा देश बदलणे, यासारख्या कारणांमुळे आलेला एकटेपणा यामुळेही अल्झायमर होऊ शकतो.

हृदयाशीसंबंधित आजार : मधुमेह, रक्तदाब यासारख्या हृदयाशी संबंधित आजार असणाऱ्या व्यक्तींना हा आजार होऊ शकतो.

ब-जीवनसत्त्वाची कमतरता : डॉक्टर सांगतात भारतात बहुतांश शाकाहारी खाद्यसंस्कृती आहे. त्यामुळे आपल्या जेवणात ब जीवनसत्त्वाची कमतरता असते. विशेषत महिलांमध्ये आणि अल्झायमर होण्याचं हेदेखील एक कारण आहे.


अल्झायमर चे टप्पे

अल्झायमर हा आजार पूर्णपणे बरा होत नाही. पण, काही औषधं आणि उपचारांच्या माध्यमातून आजार स्थिर ठेवता येतो. म्हणजे तो वाढत नाही. त्यामुळे सुरुवातीच्या स्टेजमध्येच रुग्णाला योग्य उपचार मिळाले तर रुग्णाला 10-15 वर्ष किंवा त्याहूनही जास्त काळ सामान्य आयुष्य घालवता येतं.

या आजाराविषयी सांगताना डॉक्टर सागर मुंदडा सांगतात, "अल्झायमरमध्ये जसजसं वय वाढतं तसा मेंदूचा आकार लहान होत जातो. मेंदुतल्या वळ्या कमी होत जातात. यामुळे विसरभोळेपणा येतो. अल्झायमर झालेल्या व्यक्तींना काही तासांपूर्वी घडलेल्या गोष्टींचा विसर पडतो."

या आजाराच्याही काही स्टेजेस असतात. या स्टेजसविषयी अधिक माहिती देताना डॉ. सागर सांगतात, "आजाराच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये रुग्णाला नुकत्याच घडून गेलेल्या गोष्टी आठवायला त्रास होतो. उदाहरणार्थ सकाळी काय खाल्लं हे दुपारी आठवत नाही. ही सुरुवातीची स्टेज मानली जाते."

मात्र, काही रुग्णांमध्ये याआधीही काही लक्षणं दिसतात. विनाकारण चिडचिडण होणे, गाढ आणि शांत झोप न लागणे, कुठल्याच गोष्टीत आनंद न वाटणे, नैराश्य येणे, अतीविचार करणे हीदेखील अल्झायमर किंवा डिमेंशियाची अतिशय सुरुवातीची लक्षणं असू शकतात. मात्र, ही प्रत्येकच रुग्णामध्ये दिसतीलच असं नाही.

यापुढच्या स्टेजेसविषयी डॉ. सागर सांगतात, "आजाराची पुढची स्टेज असते ज्यात क्रमाने कराव्या लागणाऱ्या गोष्टी करण्यात रुग्णाला अडचणी येतात. उदाहरणार्थ भाजी करायची असेल. तर ती कुठल्या क्रमाने करायची, हे रुग्णाला आठवत नाही.

गाडी चालवणे, कपडे घालणे यासारख्या गोष्टी ज्यात एकानंतर दुसरी क्रिया एका विशिष्ट क्रमाने कराव्या लागतात, त्या त्यांना जमत नाही. या पुढचा टप्पा म्हणजे रुग्ण घराच्याच व्यक्तींना ओळखत नाही किंवा ओळखलं तर दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने ओळखतात. चेहरा बघून आपण या व्यक्तीला ओळखतो असं त्यांना वाटतं. पण नाव आठवत नाही. घरचा पत्ता आठवत नाही. पाठ असलेले मोबाईल नंबर आठवत नाही. या स्टेजपर्यंत उपचार मिळाले नाही तर रुग्णांना दिवस आहे की रात्र, तारीख, महिना, वर्ष हेसुद्धा लक्षात राहत नाही."

डिमेंशियाच्या दुसऱ्या टप्प्यात रुग्णाची चिडचिड वाढते, तो कपडे घालायला विसरतो आणि तिसऱ्या स्टेजमध्ये तो पूर्णपणे इतरांवर अवलंबून राहतो. म्हणजे घरचा पत्ता आठवत नाही, त्यामुळे एकट्याने घराबाहेर पडता येत नाही. आंघोळ कशी करायची, आधी साबण लावायचा की पाणी हेही विसरतो. त्यामुळे आंघोळ घालावी लागते. आता टॉयलेटला जायचं आहे, याची सूचना मेंदूकडून मिळत नाही. त्यामुळे कुठेही सू-शी होते. अशावेळी डायपर वापरावे लागतात.

स्मृतीभ्रंशाच्या या स्टेजेस असल्या तरी याच क्रमाने प्रत्येक रुग्णाला त्रास होतो, असं नाही. अनेक रुग्ण कित्येक वर्ष पहिल्या स्टेजमध्येच असतात. तर काही रुग्णांमध्ये चार महिन्यातच त्रास वाढतो.


डॉक्टरांकडे कधी जायचं ?

याआधी सांगितल्याप्रमाणे हा ज्येष्ठ नागरिकांना होणारा आजार आहे. तेव्हा डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वयाच्या पन्नाशीनंतर प्रत्येकाना दर सहा महिन्यांनी ब्लड टेस्ट करायला हवी. रुटीन चेकअप करायला हवं. यात लिव्हर प्रोफाईल, किडनी प्रोफाईल, व्हिटॅमिन बी-12, व्हिटॅमिन डी यांची टेस्ट करायला हवी. मात्र, काही गोष्टी अशा आहेत की ज्या जाणवल्यावर डॉक्टरांचा सल्ला नक्की घेतला पाहिजे.

लहान-लहान गोष्टींचा विसर पडत असेल. उदाहरणार्थ 1000 लिहिताना एकावर किती शून्य लिहायचे ते विसरणे. लोकांची नावं विसरणे. कुलुपाची नेमकी किल्ली कोणती, ते विसरणे, गाडीची चाबी फ्रिजमध्ये ठेवणे.

कारण नसताना सारखी चिडचिड होत असेल.

कुठल्याच गोष्टीत आनंद न वाटता नैराश्य येत असेल. कुठल्याही कामात सहभागी होण्याची इच्छा होत नसेल.

अशी काही लक्षणं असल्यावर डॉक्टरांची मदत नक्की घ्यावी. यापैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त लक्षणं असल्यावर तो डिमेंशिया किंवा अल्झायमर असेलच असं नाही.

कदाचित काही मानसिक ताण किंवा इतरही आजार असू शकतात. मात्र, त्याच योग्य निदान डॉक्टरांकडे गेल्यावरच होऊ शकतं. त्यामुळे एखादी गोष्ट क्षुल्लक आहे, असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही.


अल्झायमर रुग्णांची काळजी कशी घ्यावी

अल्झायमर झालेला रुग्ण गोष्टी विसरतो. त्यामुळे त्याला वारंवार गोष्टी लक्षात आणून द्याव्या लागतात. हे करताना सर्वात महत्त्वाचा ठरतो तो संयम. अल्झायमर रुग्णाला प्रेमाची आणि आपुलकीची गरज असते.

व्यक्ती जेव्हा लहान-लहान गोष्टी विसरायला लागतो त्यावेळी कुटुंबीयांना त्याचा खूप त्रास होतो आणि रुग्णाबरोबरच त्याच्या कुटुंबीयांचीही चिडचिड वाढते. त्यामुळे अल्झायमरचा रुग्ण म्हणजे लहान बाळ हे कायम लक्षात ठेवून शांतपणे प्रत्येक गोष्ट सांगणं गरजेचं असतं.

तुम्ही आता काही कामाचे नाहीत, एकच गोष्ट कशी वारंवार सांगावी लागते, असं म्हटल्याने रुग्णाचं मानसिक खच्चीकरण होत असतं. अशा रुग्णांचा तिरस्कार करणे, थट्टा-मस्करी करणे योग्य नाही. त्यांना कुटुंबाच्या आणि एकूणच समाजाच्या पाठिंब्याची गरज असते.


अल्झायमर ग्रस्त रुग्ण आणि कुटुंब

आजारपण म्हटलं की रुग्णाबरोबरच त्याच्या कुटुंबालाही त्याचा त्रास होतो. मात्र, अल्झायमर या आजारात रुग्णापेक्षा कुटुंबीयांना जास्त त्रास होतो. अल्झायमर झालेला रुग्ण गोष्टी विसरतो. पण, कपडे घालायला विसरणे, कुठेही नैसर्गिक विधी करणे, वस्तू जागेवर न ठेवणे या सगळ्या गोष्टींचा त्याच्या कुटुंबीयांना अतिशय त्रास होत असतो. रुग्णाची चिडचिड वाढते. अशावेळी कुटुंबीयांचा संयम संपतो.

डॉ. मिश्रा म्हणतात, "पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत घरी कुणीतरी सतत असायचं. त्यामुळे म्हाताऱ्या माणसांची, रुग्णांची काळजी घेतली जायची. मात्र, आज परिस्थिती बदलली आहे. विभक्त कुटुंब झालेली आहेत. स्त्रियासुद्धा घराबाहेर पडल्या आहेत. शहरातली घरं छोटी झाली आहेत. अशावेळी घरात एखादा अल्झायमर झालेली व्यक्ती असेल तर तिचा सांभाळ करणं फार अवघड होतं."

दुसरं म्हणजे हा खूप खर्चिक आजार आहे. डिमेंशियाच्या रुग्णांना सारखे डायपर वापरावे लागतात. वृद्धांचे डायपर महाग असतात. शिवाय, घरात सगळे कामावर जाणारे लोक असतील तर रुग्णासाठी केअर टेकर ठेवावा लागतो, त्याला 8 तासांचे 700 ते 800 रुपये मोजावे लागतात. म्हणजे अशा रुग्णांसाठी महिन्याला 30 ते 40 हजार रुपयांचा खर्च येतो.

शिवाय, डिमेंशियाच्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करता येत नाही. कारण विसरभोळेपणाव्यतिरिक्त इतर कुठलाही शारीरिक त्रास त्यांना नसतो. त्यामुळे ते घरीच असतात. ही सगळी परिस्थिती कुठल्याही कुटुंबासाठी कष्टप्रद असते.


रुग्णाची काळजी

डिमेंशिया किंवा अल्झायमरच्या रुग्णांना प्रेम आणि जिव्हाळा अत्यंत महत्त्‌वाचा असतो. याशिवाय संगीत, नृत्य, चेअर योगा, छंद अशा वेगवेगळ्या मिनिंगफुल अॅक्टिव्हिटीज फार महत्त्वाच्या असतात.

डिमेंशिया रुग्णांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत त्यासाठीचं काम झालेलं नाही, अशी खंत डॉ. मिश्रा व्यक्त करतात. ते म्हणतात, "या आजारासाठी सरकारी पातळीवर म्हणावे तितके प्रयत्न झालेले नाही. महाराष्ट्रात सरकार मेमरी क्लिनिक सुरू करणार होते. पण ते काम कितपत झालं, याची काहीही माहिती नाही. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये मेमरी क्लिनिक हवं. आरोग्य सेवकांना विशेष प्रशिक्षण हवं."

डॉ. मिश्रा म्हणतात, "डिमेंशियाच्या रुग्णांची संख्या बघता राष्ट्रीय डिमेंशिया धोरणाची गरज आहे. याअंतर्गत प्रत्येक वॉर्डात डिमेंशिया डे-केअर असायला हवं. लहान मुलांना जसं आई-वडील दिवसभर डे-केअरमध्ये ठेवून आपापल्या कामावर जातात. तसेच सेंटर्स डिमेंशिया रुग्णांसाठी हवे.

दुसऱ्या आणि त्यापुढच्या टप्प्यातल्या रुग्णांसाठी असिस्टेड लिव्हिंग केअर होम्स हवेत. जिथे रुग्णांची 24 तास काळजी घेतली जाईल. त्यानंतर होम केअर सर्व्हिस हवी. यात डिमेंशिया आजाराच्या दृष्टीने प्रशिक्षित आरोग्य सेवक हवे त्या वेळेला घरी येऊन रुग्णांची तपासणी करू शकतात."

भारतात आज घडीला केवळ दहा डिमेंशिया केअर होम्स आहेत.

याशिवाय केअर गिव्हरना प्रशिक्षण देण्यासाठी एक दीर्घकालीन योजना सरकारने आखायला हवी. इतकंच नाही तर मेडिकल कॉलेजसमध्ये डॉक्टर आणि नर्सेसना डिमेंशिया उपचारासंबंधीचं प्रशिक्षण देणंही गरजेचं असल्याचं डॉ. मिश्रा यांचं म्हणणं आहे.

ते म्हणतात, "भारतात डिमेंशिया एमडी डॉक्टर नाहीत. म्हणजेच भारतात डिमेंशिया स्पेशलिस्ट नाहीत. एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात डिमेंशिया आजार हा अभ्यासक्रमाचा खूप छोटा भाग आहे. मानसोपचारामध्ये एमडी करणाऱ्या डॉक्टरांनाच या विषयाची सविस्तर माहिती अभ्यासक्रमात असते. या सगळ्यामधून एक चांगलं वातावरण तयार होईल."


प्रतिबंधात्मक उपाय

डिमेंशिया कधीही होऊ नये, यासाठी खात्रीशीर उपाय नाही. मात्र, जीवनशैलीमध्ये काही बदल करून हा आजार दूर ठेवता येतो.

हृदय निरोगी ठेवा

चांगली झोप घ्या

जीवनशैली उत्तम ठेवा

रोज किमान 30 मिनिटं योगा, व्यायाम, सायकलिंग, रनिंग असा एकतरी व्यायाम प्रकार करा

दारू, सिगारेट, तंबाखू, अशी व्यसनं टाळा

मिनिंगफुल अॅक्टिव्हिटीजमध्ये स्वतःला गुंतवा.

सकस आणि ताजं अन्न खा. साखर, मीठ यांचा आहारात कमी प्रमाणात समावेश करा.

डॉ. मिश्रा सांगतात, "एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा म्हातारपणात होणारा आजार असला तरी त्याची सुरुवात 40 ते 50 व्या वर्षापासून होते. माझं वय 40 ते 50 च्या घरात असेल आणि मी खूप व्यसनं करत असेन, सतत पिझ्झा, बर्गर खात असेन, पुरेशी झोप घेत नसेन किंवा दिवसातला रिकामा वेळ मिनिंगफुल अॅक्टिव्हिटीमध्ये न घालवता तासनतास टिव्ही किंवा मोबाईलसमोर बसत असेन तर अशा प्रकारचे त्रास होणार, हे निश्चित."

पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये तर 40-50 वर्षांच्या लोकांमध्येही हे आजार दिसू लागले आहेत. त्यामुळे आपणही यातून शिकवण घेऊन घरात कुणाला विसरभोळेपणा आहे, याची लाज वाटून न घेता त्यावर उपचार घेतले पाहिजे.


डिमेंशिया किंवा अल्झायमर झालेली व्यक्ती स्वतः सगळं विसरत असते. त्यामुळे तिच्या काहीच लक्षात राहत नाही. अशावेळी तुम्ही तिच्यावर योग्य उपचार केले नाही तर तो आपल्या प्रिय व्यक्तीवर अत्याचार ठऱत असतो.


- नूतन कुलकर्णी
बीबीसी मराठी
bbc.com

Wednesday, 15 September 2021

कशी येते मॅच्युरिटी ?


"परिपक्व व्यक्तिमत्व"


१) माणूस जेव्हा दुसऱ्यांना बदलण्याऐवजी स्वतःमध्ये बदल घडवायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.


२) माणूस जेव्हा जास्त बोलण्याऐवजी समोरच्याचे ऐकून घ्यायला शिकतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.


३) माणूस त्याच्या समोरचे लोक जसे आहेत तसे त्यांना स्वीकारायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.


४) प्रत्येक माणसाचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा स्वतःचा असा विशिष्ट दृष्टिकोन असतो हे समजायला लागते तेव्हा माणसाकडे मॅच्युरिटी येते.


५) प्रत्येकवेळी आपणच शहाणे असल्याचा आविर्भाव आणणे माणूस जेव्हा बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.


६) माणूस काळानुसार बदल स्विकारुन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.


७) माणूस आपल्याजवळ जे आहे त्यात आनंद मानून तक्रारी करणे बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.


८) माणूस जेव्हा जबाबदाऱ्या घ्यायला आणि चुकांमधून पुढे जायला शिकतो, तसेच आपल्या चुकांचे खापर इतरांवर फोडणे बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.


९) माणूस इतरांवर जळण्याऐवजी स्वतःमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.


१०) माणूस इतरांची स्वतःसोबत तुलना बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.


*११) माणूस रागावर नियंत्रण ठेवून समजूतदारीने वागण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*


*१२) माणूस निर्णय घेतल्यानंतर चंचलपणे न वागता घेतलेल्या निर्णयाच्या बाजूने उभे राहायला शिकतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते. परिपक्व असणे म्हणजेच प्रत्येक प्रसंगात समजूतदारीने निर्णय घेणे !*

             

(कॉपी पेस्ट)

Saturday, 4 September 2021

उन्माद

या मानसिक विकृतीचे विविध प्रकार असून ते मज्‍जाविकृतीच्या सदरात पडतात कारण चित्तविकृतींच्या बाबतीत आढळून येणारे व्यक्तिमत्त्वाचे गंभीर विघटन या विकृतीच्या बाबतीत झालेले नसते. इंग्रजीत ह्या विकृतीस ‘हिस्टेरिया’ म्हणतात. प्राचीन ग्रीक वैद्य हिपॉक्राटीझ याची अशी समजूत होती, की तरुण स्त्रियांच्या अतृप्त गर्भाशयाचे (हिस्टेरा = गर्भाशय) ऊर्ध्व दिशेने चलनवलन होऊ लागल्यामुळे या विकृतीची लक्षणे उद्‍‍भवतात. ही कल्पना अर्थातच चुकीची ठरली आहे कारण लहान मुलांमध्ये, पौगंडावस्थेतील किशोरांमध्ये, त्याचप्रमाणे सैनिक, लेखनिक, तारखात्यातील संदेशप्रेषक वगैरे व्यक्तींमध्येही या विकृतीची काही लक्षणे आढळलेली आहेत. तथापि ‘हिस्टेरिया’ ही आता अन्वर्थक नसलेली संज्ञाच या विकृतीस रूढ होऊन बसली आहे.


लक्षणे व प्रकार : या विकृतीच्या लक्षणांच्या मुळाशी प्रत्यक्ष शारीरिक-इंद्रियांतील स्‍नायूंमधील वा केंद्रीय मज्‍जासंस्थेतील बिघाड नसतो परंतु रुग्णाच्या इंद्रियांची, कर्मेंद्रियांची, तसेच प्रत्यभिज्ञा, स्मृती वगैरे मनोव्यापारांसंबंधीची विक्रिया अथवा अक्षमता तीत निर्माण होते. त्यामुळे ही कार्यिक अक्षमता म्हणजे केवळ ढोंग वा कामचुकारपणाने केलेली बतावणी होय, असे लोकांना वाटण्याचा संभव असतो. परंतु असे समजणे बरोबर नाही कारण या अक्षमतेपायी व्यक्ती सुखाला पारखी होत असते इतकेच नव्हे, तर काही लक्षणे इतकी गंभीर असतात, की त्यापायी व्यक्तीच्या जिवास अपाय होण्याचाही संभव असतो.


या विकृतीच्या लक्षणांचे (१) कारक इंद्रियांशी संबंधित, (२) वेदनेंद्रियांशी संबंधित, (३) अंतस्थ इंद्रियांशी संबंधित आणि (४) मनोव्यापारांशी संबंधित असे प्रकार पडतात. हातापायांचा वा इतर स्‍नायूंचा लुळेपणा, स्‍नायुकंप, वांब येणे, सांधे जखडणे, स्वरयंत्राची अक्षमता, खुदूखुदू हसल्यासारखी शरीर चेष्टा होणे ही कारकइंद्रियांशी संबंधित लक्षणे होत.


त्वचेच्या विशिष्ट भागापुरतीच आग, कधी या तर कधी दुसऱ्याच एखाद्या भागाची स्पर्शबधिरता, अचानक झिणझिण्या, डोळे किंवा कान अगदी सुस्थितीत असूनही पूर्ण किंवा निवडक गोष्टींपुरतेच अंधत्व किंवा बहिरेपण, स्वतःच्या हालचालींचे वेदनच लुप्त होणे, डोकेदुखी तसेच पाठदुखी ही वेदनेंद्रियांशी संबंधित लक्षणे होत.


अंतस्थ इंद्रियांबाबतच्या लक्षणांमध्ये समाविष्ट होणारी या विकृतीची लक्षणे म्हणजे अन्न घशाखाली न उतरणे, श्वासनलिकेची विक्रिया होऊन श्वास घेण्यास त्रास वाटणे, खोकल्याची उबळ, गुदमरल्यागत वा गळा भरून आल्यागत अवस्था, वांतीची भावना, बद्धकोष्ठ, हृदयाची धडधड, हृदयाच्या वरच्या बाजूस छातीत दुखणे गर्भारपणाची भावना (वंध्या स्त्रियांना) वगैरे होत.


उन्माद विकृतीच्या मनोव्यापारांच्या पातळीवरील लक्षणांमध्ये स्मृतिलोप, निद्राभ्रमण, तंद्रावस्था, आपण कोण व कुठचे आहोत, हेच विसरून जाऊन आत्मविस्मृतिपूर्वक भ्रमण व व्यवहार, मूर्च्छा वगैरेंचा समावेश होतो. ही मूर्च्छा फक्त जागेपणीच व साधारणतः इतरांच्या उपस्थितीत येते. स्वतःस इजा न होईल अशा बेताने व्यक्ती जमिनीवर पडते, दातखीळ वा तोंडास फेस नसतो. या अवस्थेत होणाऱ्या हालचाली म्हणजे एक प्रकारचे नाट्य असते व या मूर्च्छेनंतर, अपस्माराच्या झटक्यानंतर येतो तसा थकवा न येता, उलट मोकळे वाटते. एकाच शरीरात दोन वा अधिक मने वा व्यक्ती, अथवा दुहेरी व्यक्तिमत्त्व तसेच व्यक्तिमत्त्व बाहुल्य हेही याच विकृतीचे अत्यंत नेत्रवेधक व नाट्यपूर्ण प्रकार होत.


उन्मादाची लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व साधारणतः पुढीलप्रमाणे असल्याचे आढळते : त्यांच्या भावनिक प्रतिक्रियांमध्ये संयम कमी असतो व लहान मुलांप्रमाणे त्या प्रतिक्रिया अपरिपक्‍वतेच्या निदर्शक असतात. आप्त व मित्र यांबाबत त्यांची वागणूक लहरी कधी खूप प्रेमाची तर कधी द्वेषपूर्ण असते. इतरांनी आपल्याकडे लक्ष द्यावे व आपले कौतुक करावे, सहानुभूती दर्शवावी, अशी त्यांची अपेक्षा असते. संघर्षजनक समस्या जबाबदाऱ्या टाळण्याकडे तसेच त्या दुसऱ्यावर ढकलण्याकडे त्यांची प्रवृत्ती असते. त्यांच्या भावनिक प्रतिक्रियांमध्ये उथळपणा व इतरांशी असलेल्या संबंधांमध्ये हिकमतीपणा व नाटकीपणा असतो. या व्यक्ती खूप सूचनक्षम असतात. त्यांना चिंताकुलतेचे अधूनमधून झटके येत असतात.


कारणमीमांसा: या विकृतीची लक्षणे शारीरिक दोषमूलक नसतात. काही काही लक्षणे सूचनवशतेमुळे निर्माण होतात, असे बॅबिन्स्की याने दाखवून दिले आहे. प्येअर झाने (१२५९–१९४७) याच्या मते ही विकृती म्हणजे मानसिक अवसन्नतेचाच एक प्रकार होय. त्याची उपपत्ती अशी आहे : (अ) काही व्यक्तींमध्ये आनुवंशिक कारणांमुळे मानसिक शक्तीची कमतरता असते. (ब) त्यातच मनोभावात्मक आघांताची किंवा ताणांची भर पडल्यामुळे, अशा व्यक्तींच्या मानसिक जीवनाचे संश्लेषण व्हावे तसे होत नसते. (क) अशा स्थितीत जर तीव्र मानसिक आघात करणाऱ्या अथवा मनःशक्तीचा अतोनात व्यय करणाऱ्या घटना घडल्या तर त्या घटना जाणिवेच्या प्रवाहात सामावून घेतल्या जाण्याऐवजी संपूर्णपणे किंवा अंशतः विलग म्हणजे वियुक्त राहतात. या वियोजन प्रक्रियेमुळे व्यक्तीच्या अंतरंगात जणू एक निराळी संघटना बनते व व्यक्तिमत्त्वात कार्यात्मक एकात्मता येत नाही. व्यक्तिमत्त्वाचा असा विलग राहिलेला भाग स्वतंत्र रीत्या कार्य करू लागतो व प्रसंगविशेषी या विकृतीच्या लक्षणांच्या रूपाने डोकावतो.


परंतु हे वियोजन का घडून येते ? झाने याच्या उपपत्तीत या प्रश्नाचे उत्तर नाही ते सिग्मंड फ्रॉइड (१२५६–१९३९) याने देण्याचा प्रयत्‍न केला.त्याची उपपत्ती अशी : व्यक्तीच्या अप्रशस्त प्रेरणा व वासना, तिच्या भावजीवनात दुःखदायक वा लज्‍जास्पद खळबळ उत्पन्न केलेल्या प्रसंगांच्या स्मृती इत्यादींचा व्यक्तीच्या ‘अहं’शी संघर्ष होतो व अहंकडून अर्धवट दडपल्या गेलेल्या व निराळी संघटना करून राहिलेल्या प्रेरणा, वासना व स्मृती नानाविध लक्षणांची रूपे घेतात व बोधमनात डोकावू लागतात. अर्थात त्यांचे ‘रूपांतरण’ झालेले असते. या दृष्टीने पहाता, ही विकृतिलक्षणे प्रयोजनगर्भ व अर्थपूर्ण असतात.


उन्माद विकृतीच्या कोणत्या लक्षणांचा अवलंब व्यक्तीकडून होईल हे दोन गोष्टींवर अवलंबून असते : (१) व्यक्तीचा स्वतःचा पूर्वानुभव आणि (२) इतरांचे तिच्या नजरेस पडलेले वर्तन. स्वतःला हवे असणारे कौतुक व सहानुभूती मिळवायला अथवा नको असलेले भावनाक्षोभक प्रसंग टाळायला अमुक अमुक प्रकारची शारीरिक तक्रार अथवा अमुक प्रकारची अवस्था उपयोगी पडेल, हे तिने लहानपणाच्या स्वानुभवांवरून तसेच इतरांचे वर्तन पाहून हेरलेले असते व मग स्वयंसूचनेद्वारा ती ती लक्षणे त्या त्या व्यक्तीत दृग्गोचर होऊ लागतात.


चिकित्सा: ही विकृती दूर होऊ शकते. रुग्णाचा मंत्रतंत्रादींवर विश्वास असला, तर त्याच्या सूचनवशतेचा फायदा घेऊन मंत्रतंत्रादींचा उपयोग करता येतो. काहीतरी औषध देणे वा दिल्यासारखे करणे तसेच वेळप्रसंगी शस्त्रक्रियेचे नाटक करणे म्हणजे अप्रत्यक्ष सूचनतंत्र वापरणे हेही उपयोगी पडू शकते. प्रत्यक्ष सूचनांचाही उपयोग होतो. संमोहनपूर्वक सूचनांचाही उपयोग होतो तथापि केवळ सूचनोपचार हा चिरपरिणामी ठरत नाही. कारण जोवर स्वतःच्या विकृतीचे अबोध मनात असलेले मूळ रुग्णाच्या बोध मनात आणले जात नाही तोवर त्याची विकृती या नाहीतर दुसऱ्या कोणत्यातरी लक्षणांच्या रूपाने शिल्लकच राहते. काहींच्या मते इतर कोणत्याही उपायांनी न सुधारणाऱ्या रुग्णांच्या बाबतीतच सूचनतंत्र वापरावे, एरव्ही वापरू नये कारण हे रुग्ण आधीच सूचनक्षम असतात व सूचनतंत्राने ते अधिकच सूचनक्षम होण्याचा संभव असतो.


रोग्याच्या मनातील (त्याची त्यालाच जाणीव नसलेलेही) काढून घेणे हा चिकित्सेचा उत्तम मार्ग होय. त्यासाठी त्याला संमोहित करून (हिप्‍नोअनॅलिसिस) किंवा औषध देऊन (नार्कोअनॅलिसिस) अथवा जागृत अवस्थेत मुक्तपणेबोलावयास लावून (सायकोअनॅलिसिस) आणि त्याबरोबरच त्याच्या स्वप्नांचा अन्वयार्थ लावून विश्लेषण करता येते. यांपैकी शेवटचा मार्ग श्रेयस्कर ठरतो कारण त्यायोगे रुग्णाचे मनोविरेचन होते व शिवाय स्वतःच्या विकृतीच्या मुळाशी असलेले संघर्षप्रसंग रुग्णाचे रुग्णालाच समजू लागतात. मात्र मनोविश्लेषण बरोबरच रुग्णाच्या ठिकाणी मानसिक परिपक्‍वता आणणे, त्याची स्वतःकडे व इतरांकडे पाहण्याची दृष्टी सुधारणे, त्याच्या सवयींत व अभिवृत्तींत बदल घडवून आणणे, हेही आवश्यक असते. यांशिवाय रुग्णाशी संबंधित असलेल्या व्यक्तींतही बदल घडवून आणणे पुष्कळदा आवश्यक असते.


अकोलकर, व. वि.

मराठी विश्वकोश

Thursday, 2 September 2021

माणूस “मागे” असण्याची २३ कारणे


1. कमी प्रवास - 

प्रवास केल्याने जग कळते, कल्पना सुचतात, मार्ग सापडतात व प्रगती होते. मराठी माणूस आर्थिक स्थितीमुळे फारसा प्रवास करताना दिसत नाही, अनेक औद्योगिक प्रदर्शनात मराठी माणूस दिसत नाही.


2. अति राजकारण -

सर्वतजास्त मराठी माणूस राजकारण वेडा आहे. राजकीय नेत्यांच्या सभेला आपला कामधंदा सोडून लाखोंच्या संख्येने येणारा मराठी माणूसच असतो. यात व्यापारी समाजातला एक तरी माणूस दिसतो का? मी काय करतो आहे या पेक्षा लोकांनी काय केले, काय करतात यात जास्त लक्ष.


3. दोनच हात कमावणारे -

सर्वसाधारण मराठी कुटुंबात एकच व्यक्ती कमवते. कुटुंबातील जास्तीत जास्त लोकांनी काम केले पाहिजे.


4. सर्वांची तोंडे वेगळ्या दिशेला –

कुटुंबात एकी नसते. बाप एका दिशेला, मोठा मुलगा एका दिशेला तर लहान भाऊ तिसरीकडेच. प्रत्येक कुटूंबात एकी पाहिजे.


५)  खोटं बोल पण रेटून बोल –

सगळ्या थापा एकमेकांना गंडवण्याच्या गोष्टी, खरे सांगण्यासारखे नसतेच म्हणून खोट बोलावे लागते. मी हे करीन ते करीन या स्वप्नातच आयुष्य संपते, पण मी हे करतोच असा निश्चय घेत नाहीत.


६) आहार व आरोग्याकडे दुर्लक्ष –

आरोग्याकडे अत्यंत दुर्लक्ष, महागाईमुळे उपचारही परवडत नाही, थातुरमातुर उपचार केले जातात. योग्य आहार नाही, व्यसनांचे प्रमाण प्रचंड आहे. भरपूर पैसा व्यसनातच संपतो.


७) आर्थिक निरक्षरता –

पैसा काय आहे ? तो कसा वापरायचा ? शेअरमार्केट, डिमॅट, फॉरेन एक्सचेंज, डॉलर, आय टी याची खूप कमी माहिती शिकलेल्या लोकांनाही नाही. ९०% महिलांचे तर साधे पॅनकार्ड सुद्धा नसते.


८) दूरदृष्टीचा अभाव –

पुढील ५, १०, २० वर्षाच्या योजना आखाव्या लागतात. त्यावर आजपासूनच काम करावे लागते. अशा दूरदृष्टीमुळे नियोजन होते व माणसे कामाला लागतात.


९) ऐतिहासिक स्वप्नात –

अजूनही मराठी माणूस ऐतिहासिक स्वप्नात जगत आहे. जास्तीजास्त वेळ फेसबुक व्हाट्सएप वर कोणी कधी काय केले ते शोधत फिरतो, आणि स्वतःचा वेळ वाया घालवतो, तेव्हा सत्य आणि सध्याच्या परिस्थितीचे भान ठेऊन उद्योग करून पैसा कमावला पाहिजे.


१०) गृहकलह, कोर्टकचेरी –

गृहकलहाचे प्रमाणही प्रचंड आहे. भावाभावातचं वाद. संपत्तीवरून भावकीत वाद , वादावादी, मारामारी, खून, कोर्टकचेऱ्या सामंजस्यपणे निपटावे व प्रगतीच्या मार्गे लागावे.


११) समाज अर्थपुरवठा पद्धत –  

नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी अत्यंत कमी व्याज दरात किंवा बिनव्याजी ताबडतोब अर्थपुरवठा करण्याची व समाजातील सर्वाना वरती आणण्याची पद्धत गुजराती, सिंधी, समाजात आहे. तशी मराठी समाजात आढळत नाही.

आता तर सरकार ने नवीन व्यावसायिकांसाठी 5 लाखांपर्यंत कर्जयोजना सूरु केली आहे, ज्यात बिना गैरेंटी कर्ज उपलब्ध आहे, पण त्याबद्दल काहीच माहिती करून घेत नाहीत.


१२) जनरेशन गॅप –

खूप मोठा जनरेशन गॅप कुटुंबात जाणवतो. एखादा हुशार तरुण उद्योग करतो म्हटले कि त्यालाच येड्यात काढले जाते. जुन्या लोकांच्या डोक्यातून नोकरी अजून जात नाही.


१३) ज्ञानापेक्षा सर्टिफिकेट –

प्रत्यक्ष व प्रॅक्टिकल ज्ञानापेक्षा पदवीच्या सर्टिफिकेटला जास्त महत्व आहे. काहीही करून पदवी मिळवायची. त्यामुळे सिव्हिल इंजिनियर झाले बेरोजगार…. व बाहेरून आलेला प्लंबर, गवंड्यांचे काम करून महिना ५० हजार कमवतो.


१४) धरसोड वृत्ती –

हे प्रमाण प्रचंड आहे. थोडे दिवस खासजी संस्थेत नोकरी… कामाच्या अगोदरचं पगार किती देणार ? विचारायची प्रवृत्ती…हे काम केले तर लोकं काय म्हणतील??? अशा धरसोड वृत्तीमुळेच आयुष्यातील १० वर्ष निघून जातात. एकदाच ठसून एखाद्या क्षेत्रात टिकून राहिले पाहिजे.


१५) कष्टाची लाज –

विशेषतः सुशिक्षित तरुणांना कष्टाची लाज वाटते. Easy Money चे खुळ डोस्क्यात थैमान घालतयं. मी एमए, बीई, बीएड, झालोय म्हणजे मला इस्त्रीचे कपडे घालून फिरण्याचा अधिकार आहे असे समजतात. स्वतःच्याच घरातही कामं करण्यास लाजं वाटते.


१६) फालतू बाबींना महत्व –

एकत्र येणे, प्रगती साधणे, उद्योग उभारणे हे मुख्य विषय राहिले बाजूला… पण मराठी माणूस अजून लग्नपत्रिकेत नाव नाही टाकले, लग्नात आहेर नाही केला, होर्डिंग ववर नाव माही टाकले, अशा फालतू बाबींमध्ये अडकला आहे.


१७) दुसऱ्यांच्याच अपयशात आनंद –

भावाचा ऊस जळाला, त्याला पाण्याची नाही दिली, त्याची म्हैस गेली कि दुसऱ्या भावाला भलताच आनंद व उकळ्या फुटतात…मित्रांचे व्यवसायात नुकसान झाले, बरं झालं मी आधीच सांगत होतो नको करू, अगदी आपल्या सख्ख्या भावाचं चांगले झाल्यावरही बघवत नाही हे “आश्चर्य”…!!! मराठी माणूसच मराठी माणसाचा शत्रू आहे…!!!


१८) इंग्रजी कच्चे –

मराठीचा अभिमान जरूर बाळगावा पण जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी व पुढे जाण्यासाठी अस्सलिखित इंग्रजी बोलणे, लिहिणे, वाचणे आलेच पाहिजे. अति उत्तम इंग्रजी आलेच पाहिजे. इंग्रजी बोलता येत नाही म्हणून इंग्रजीवर राग दाखवून काही होणार नाही.


१९)  संवाद कौशल्याचा अभ्यास –

जीवनात व उद्योगात पुढे जाण्यासाठी आपण दुसऱ्यांशी संवाद करतो ह्या कौशल्याचे खूप मोठे महत्त्व आहे. मोठे प्रोजेक्ट मिळवणे, काम मिळवणे, विविध स्थानिक अधिकारी वर्ग इतर व्यक्ती यांनाही आपण प्रत्यक्ष पत्रव्यवहार, इ-मेल द्वारे, फोनवर कसा उत्कृष्ट संवाद साधला पाहिजे हे शिकले पाहिजे.


२०) चाकोरी मोडत नाही –

अजूनही जुन्याच पद्धतीने काम चालू आहे. त्यामुळे प्रगती होत नाही, मतदार संघात काहीही काम न करता कित्येक दशके तोच खासदार, आमदार, नगरसेवक, झेडपी – पंचायत – ग्रामपंचायत सदस्य निवडून देण्याचे / येण्याचे प्रकार दिसतात.

 त्या जागी नविन उत्साही चांगल्या ईमानदार व्यक्तीस निवडुन देऊन बदल करायला तयार होत नाहीत. छोट्याशा स्वार्था साठी गुलामी चमचेगीरी करायची वाईट सवय जात नाही.


२१) जाती प्रथा –

(फालतू प्रथा) 21व्या शतकात सुद्धा जाती प्रथेचा पगडा प्रचंड आहे. एकाच गावात व एकाच गल्लीत १० वेगवेगळ्या जातीचे पुढारी आहेत. संपूर्ण समाज अनेक धर्म – पंथ – जात – पोटजातीत विभागला गेला आहे, त्यामुळे समाजाची ताकद क्षीण झाली आहे. या धावपळीच्या युगात एक मराठी माणूस म्हणून कोणीच एकत्र यायला मागत नाही. आणि याचा फायदा इतरांना होतो.

अमुक एका जातीत जन्म झाला यासारख्या अर्थशून्य गोष्टींचा मराठी माणसाला; स्वतःची  एक व्यक्ती म्हणून दमडीची अचीव्हमेंट नसताना; चक्क अभिमान वाटतो.


२२) वेळेची किंमत –

वेळेचे महत्व समजलेले नाही. अनेक व्यक्ती आयुष्याच्या वेळेचा प्रचंड अपव्यय करताना दिसतात. बारसे, साखरपुडा, मुलगी बघणे, विवाह, यात्रा, मयत, प्रचार सभा, निवडणूक, वारी, देवदर्शन, राजकारण, या अनेक बाबींसाठी सरासरी वर्षातले १०० दिवसाहून अधिक काळ वाया घालवतात.


२३) ग्राहकाला किंमत न देणे - 

ग्राहक म्हणजे राजा समजला जातो पण अपल्याकडे तसे होत नाही, ग्राहकाला समोर रुबाब दाखवणे, तसेच ऐन कामाच्या वेळेला मोबाईल बंद करून ठेवणे आणि ग्राहकाला दिलेलं वेळ न पाळणे, 10 ची वेळ सांगून 11 ला पोचणे, याने ग्राहक सुद्धा निसटतो. आणि आपला रेफरन्स पुढे कोणाला देत नाही.

*प्रत्येकाने स्वत:च्या विचारसरणीत बदल करा*

*तरच तुमचे  भविष्य बदलेल*


(आर्थिक सल्लागार मकरंद गाडगीळ यांच्या लेखणीतून)

Tuesday, 6 July 2021

मानसिक आजार पळवुन लावण्याची चौदा सूत्रे


🙂*कसल्याही प्रकारच्या निराशेला नाहीशी करणारी चौदा सुत्रे*🙂


1) सतत पॉझीटीव्ह रहा -

कितीही वाईट घडो, नेहमी पॉझीटीव्हच रहायचं!

उदा. “एक डोळा गमावला पण दुसरा डोळा शाबुत आहे,” ज्यामुळे मी हे सुंदर जग पाहु शकतो, देवाची किती कृपा आहे.

प्रत्येक अपयश मला एक संधी देऊन जात आहे.

उदा. जेव्हा लोक आपल्याला टाळतात, आपल्याकडे बघुन नाकं मुरडतात, तेव्हा तर अधिकधिक आकर्षक दिसण्याबद्द्ल, आपण जागरुक होतो.

आपली मस्करी उडवली की, आपला कोणी कळत नकळत अपमान केला की, आपल्यातल्या महत्वकांक्षा जागृत होतात.


2) पॅशन निर्माण करा -

आयुष्यात पोकळी आणि निराशा आली की एक असं पॅशन शोधावं, ज्यासाठी संपुर्ण आयुष्यच पणाला लावावं.

पॅशन म्हणजे अशी एखादी गोष्ट जी गोष्ट न थकता, अगदी उत्साहाने, महिन्याचे तीस दिवस, दिवसातल्या दहा-बारा तासाच्या वर आपण ते करु शकतो, ह्याला म्हणतात पॅशन!

त्या गोष्टीसाठी अक्षरशः आयुष्य झोकुन द्यावं. अगदी स्वतःला विसरायला लावतं, तेच खरं पॅशन!

कोणासाठी व्यापार हे पॅशन असेल, कोणासाठी खेळ हे पॅशन असेल, कोणासाठी भटकंती हेच पॅशन असेल.

त्याच्याशिवाय आपण जगु शकत नाही, आणि मग एके दिवशी जगही आपल्याला त्या एकाच गोष्टीसाठी ओळखु लागतं.

सचिन-क्रिकेट, धीरुभाई-रिलायन्स, अमिताभ-एक्टींग, लता मंगेशकर-गायन, मोदी-नेतृत्व, पटनायक-वाळुची शिल्पे, प्रकाश आमटे-आनंदवन, श्रीश्री रविशंकर गुरुजी – आर्ट ऑफ लिविंग, स्टीव्ह जॉब्ज-गॅझेट्स,

ह्या यादीत आपलंही नाव येऊ शकतं, आपणही आपल्या पॅशनसाठी वेडं बनलो तर!….


३) महिन्याला दोन पुस्तके - 

माझ्या आयुष्यातल्या अत्यंत वाईट आणि पडत्या काळामध्ये मला फक्त आणि फक्त चांगल्या विचारांच्या पुस्तकांनीच तारलं, नाहीतर कदाचित मी आज हा लेख लिहायला शिल्लकच राहीलो नसतो, इतके पुस्तकांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत.

महिन्याला कमीत कमी दोन तरी चांगली पुस्तके तरी वाचुनच काढेन आणि त्यातल्या चांगल्या गोष्टी तात्काळ जीवनात आणेन, हा चंगच बांधावा, आपोआप जे जे हवे ते सारे मिळत जाते, हा माझा स्व-अनुभव आहे.


4) डायरी लिहा - 

दररोज घडलेल्या बर्‍या वाईट घटना आपल्याला बहुमुल्य अनुभव देऊन जातात, त्यांना शब्दबद्ध करत गेलं की जगण्याची रंगत वाढत जाते.

माझ्या मनात चाललेले द्वंद बाहेर काढण्यासाठी मला ह्या डायर्‍यांनी खुप मदत केली. झालेले अपमान, आलेले अपयश, भविष्याच्या चिंता, मनाचं रिकामपण, सगळी मळमळ मी बाहेर काढली, आणि प्रत्येक जखम डायर्‍यांमध्ये जपुन ठेवली, आणि शहाण्या बाळांसारखं त्या सर्वांनीही मला त्रास देणं बंदच करुन टाकलं.

आजही माझ्या कॉम्पूटर मध्ये मी स्वतःलाच लिहलेली शेकडो पत्रं आहेत, जी वाचुन मला आता खुप गंमत वाटते. कधी छोट्यामोठ्या कारणाने मी खचलो की ते वाचुन प्रचंड बळ मिळतं. बॅटरी पुन्हा टणाटण चार्ज होते.


5) जे सुरु केलंय त्याचा शेवट करा - 

हातात घेतलेलं काम पुर्ण करायचं म्हणजे करायचं!

मनावर विजय मिळवण्यासाठी मनाचाच वापर करायचा, काम सुरु होतानाच असं भासवायचं की ते पुर्ण झालेलं आहे, आणि मन गोंधळुन जातं आणि ते पुर्ण करुनच एका जागेवर शांत बसतं!

‘आसान है’ हा यशाचा मुलमंत्र नेहमी लक्षात ठेवायचा!


6) कंफर्ट झोन तोडा -

नवी आव्हाने स्वीकारा - तु मागच्या एक महिन्यामध्ये अशी कोणतीही एक गोष्ट केलीस का, जे तुला येत नाही, जे करण्याची तुला भिती वाटते?


7) कमीत कमी तीस मिनीटे व्यायाम - 

मनाला ताजंतवाणं ठेवण्याचा हुकुमी एक्का आहे, शरीराला व्यायाम करायला भाग पाडायचं, मन आपोआप ताळ्यावर येतं!

जगातल्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीला हे सुत्र माहित आहे.


8) ध्यान, सर्व समस्यांवर रामबाण उपाय - 

तुझं शारीरीक व्यंग हे तुझ्या आयुष्यात कधीही अडथळा बनु शकत नाही, कारण तु म्हणजे तुझं शरीर नाहीस!

खरा तु तर वेगळाच कोणीतरी आहेस, हे तुला ध्यान करायला लागलं की आपोआप उमगत जाईल.

आतापर्यंत केला नसशील तर एकदा आर्ट ऑफ लिविंगचा हॅपिनेस कोर्स नक्की कर.


9) महिन्याला एक वाईट सवय सोडा - 

आपल्या प्रत्येकामध्ये वाईट सवयी असतात, मी एका महिन्याला एक वाईट सवय सोडायची आहे, आणि एक चांगली सवय जोडायची आहे, असं प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला अंतर्मनाला सांगतो. महिनाभर त्याची कसोशीने अंमलबजावणी करतो.


10) आपल्या आजुबाजुला प्रसन्नतेचा शिडकावा करा -

घरातुन बाहेर पडण्याआधी एकदा आरशात बघुन स्वतःलाच वचन देतो की आज माझ्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला मी आनंद आणि प्रसन्नता वाटणार आहे. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर हसु फुलवणार आहे.

कधी एखाद्या उपाशी माणसाला पोटभर खावु घालावं, कधी एखाद्या लहान मुलाशी लहान बनुन खेळावं!

कधी रस्त्याने जाताना कोणाला लिफ्ट द्यावी, कधी जोक्स सांगुन लोकांना खळखळुन हसवावे.


11) जे मिळालयं त्याबद्द्ल कृतज्ञ रहा -

जो कृतज्ञ आहे, त्यालाच ब्रम्हांड अजुन जास्त भरभरुन देतं, हेच सिक्रेट आहे.

आपल्याला मिळालेल्या दहा वरदानांबद्द्ल रोज मनःपुर्वक आभार व्यक्त केल्यास आयुष्यातली सगळी दुःखे आपोआप नाहीशी होतात, याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे.


12) यशस्वी लोकांसोबत मैत्री करा - 

असे लोक ज्यांनी स्वतःचा ठसा ह्या जगात उमटवला आहे, त्यांच्याशी अधिकाधिक ओळखी कराव्यात, त्यांच्याशी भेटण्याच्या संधी शोधाव्यात.

यश ही उत्साहासारखं संसर्गजन्य असतं!


13) सुरक्षित अंतर ठेवा -

जे लोक आपलं मानसिक खच्चीकरण करतात, आपली टर उडवतात, अशा लोकांपासुन चार हात दुर रहावे. निगेटीव्ह लोकांना आपल्या आयुष्यात आणि आपल्या मनात कुठेही स्थान देऊ नये.


14) तीस दिवसांचा प्लान - 

पुढच्या तीस दिवसात मी काय करणार आहे, ह्याचा प्लान महिन्याच्या सुरुवातीला तयार करुन भिंतीला चिटकवुन टाकावा.

एकेक लक्ष्य साध्य केलं की ‘विजयी’ असं लिहुन त्याचं अगदी उत्साहाने आणि आनंदाने ‘सेलिब्रेशन’ करावं....!!!!


Sunday, 4 July 2021

माणुसकीची किंमत


अमेरिकेतल्या एका आडबाजुच्या शहरातील आडबाजुला असलेल्या एका सामान्य हॉटेलात रात्रीच्यावेळी एक वृद्ध जोडपे शिरले. बाहेर मुसळधार पाऊस चालु होता. थंड वादळी वारे वहात होते. प्रचंड थंडी पडली होती. अशा या थंडीत हे वृद्ध जोडपे हॉटेलात शिरले तेव्हा थंडीने त्यांचे अंग थरथरत होते. कपडे पण थोडेसे पावसात भिजलेले होते. तसे त्यांचे कपडे सामान्यच होते. त्यावेळी हॉटेलच्या काऊंटरच्या मागे अगदी सामान्य असा दिसणारा एक निग्रो तरुण बसला होता.

‘आम्हाला आजची रात्र रहाण्यासाठी या हॉटेलात रुम मिळेल का?’ त्या म्हातार्याा आजिबाईंनी थंडीत कुडकुडत त्या निग्रो तरुणाला विचारले.

‘सॉरी मॅम! आज हॉटेल मध्ये सगळ्या रुम्स फुल आहेत. एकही रुम शिल्लक नाही.’ त्या निग्रो तरुणाने सांगीतले पण सांगताना त्याचा चेहेरा असा झाला होता की हॉटेलात एकही रुम शिल्लक नाही हा जणुकाही त्याचा अपराध असावा.

‘बघाना काही जमते का? हवे तर दुप्पट पैसे घ्या. बिल नाही दिलेत तरी चालेल.’ म्हातारबुवा म्हणाले. थोडक्यात त्या रुमचे पैसे त्या निग्रो तरुणाने खुशाल खीशात घालावेत असे ते म्हातारबुवा सुचवत होते. पण तो निग्रो तरुण त्यामुळे काही बधेल असे वाटे ना.

‘हे बघा मी तुम्हाला माझी रुम देऊ शकतो. माझी रुम तशी छोटी आहे पण त्यात तुमची सोय होईल. मला जर 10 मिनिटे वेळ दिलात तर मी माझी रुम जरा आवरून येतो. तोपर्यंत मी तुम्हाला गरमागरम चहा आणुन देतो. त्यामुळे तुम्हाला थोडे बरे वाटेल’. असे म्हणुन तो निग्रो तरुण किचनमध्ये चहा करायला गेला आणि थोड्याच वेळात वाफाळलेल्या चहाचे दोन कप आणि कुकिज घेऊन आला आणि आपली खोली साफ करायला निघुन गेला.

थोड्या वेळात तो निग्रो तरुण परत आला तेव्हा ते म्हातारबुवा आपल्या गाडीच्या डिकितुन एक जाडजुड बॅग काढत असतातना दिसले. ‘थांबा मी तुम्हाला मदत करतो’ असे म्हणुन तो निग्रो तरुण पुढे आला आणि तो बॅग काढुन हॉटेलमध्ये घेऊन आला.

‘चला मी तुम्हाला तुमची रुम दाखवतो’ तो म्हणाला आणि त्या वृद्ध जोडप्याला आपल्या रुमपाशी घेऊन आला.

‘ही घ्या किल्ली! काही लागले तर मला हाक मारा!’ तो निग्रो तरुण म्हणाला.

‘तु कोठे झोपणार?’ त्या आजिबाईंनी विचारले.

‘तुम्ही काळजी करू नका! मी बाहेर हॉलमध्ये झोपेन. माझ्याकडे स्लिपिंग बॅग आहे! गुड नाईट!’ तो निग्रो तरुण म्हणाला.

आजीबाईंनी खोलीचे दार उघडले. खोली तशी लहानशीच होती पण व्यवस्थित आवरून ठेवलेली होती. खोलीचे बाथरुम पण स्वच्छ करून ठेवले होते. खोलीचा हिटर चालु करून ठेवला होता. तसेच पलंगावर दोन इस्त्री केलेले नाईट गाऊन्स ठेवलेले होते. प्यायचे पाणी पण भरुन ठेवले होते.

दुसर्या दिवशी सकाळी ते वृद्ध जोडपे फ्रेश होऊन बाहेर पडले. आता त्यांना निघायचे होते.

‘किती पैसे झाले?’ त्या आजोबांनी वरचारले

‘पैशांचे आपण नंतर बघु. आधी चांगला ब्रेकफास्ट करा! मी तुमच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन येतो.’ असे सांगुन तो निग्रो तरुण पॅन्ट्रिमध्ये गायब झाला आणि थोड्याच वेळात ऑम्लेट, टोस्ट आणि गरम कॉफी घेऊन आला.

‘किती पैसे द्यायचे?’ त्या म्हातारबुवांनी ब्रेक फास्ट झाल्यावर विचारले.

‘त्याचे असे आहे. मी तुम्हाला माझी खोली वापरायला दिली. ती काही हॉटेलची खोली नव्हती. त्यामुळे त्याचे पैसे काही नाहीत.’ तो निग्रो तरुण म्हणाला.

‘असे कसे? बर मग चहाचे आणि ब्रेकफास्टचे किती पैसे द्यायचे’ त्या आजीबाईंनी विचारले.

‘मॅडम! मला आई वडील नाहीत. माझे आई वडील माझ्या लहानपणीच गेले. तुम्हाला पाहीले आणि मला माझे आई वडील आठवले. आज जर माझे आई वडील या हॉटेलमध्ये आले असते तर मी त्यांच्याकडुन चहाचे आणि नाष्त्याचे पैसे घेतले असते का? नाही ना! मग मला तुमच्याकडुन पैसे नकोत’ तो निग्रो तरुण म्हणाला.

तो निग्रो तरुण काऊंटरजवळ गेला आणि आपल्या खिशातुन काही पैसे काढुन हॉटेलच्या गल्यात टाकु लागला. म्हातारबुवा कुतुहलाने ते बघत होते. त्यांच्या लक्षात आले की त्यांनी जो चहा घेतला होता आणि ब्रेकफास्ट केला होता त्याचे पैसे तो निग्रो तरुण स्वतःच्या खिषातुन हॉटेलच्या गल्यात टाकत होता.

ते वृद्ध जोडपे जायला निघाले. त्या निग्रो तरुणाने त्यांची जड बॅग त्यांच्या गाडीच्या डिकित आणुन ठेवली. तेवढ्यात त्याची नजर गाडीतील रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांकडे गेली. ‘थांबा मी तुम्हाला पाणी आणुन देतो.’ असे म्हणुन त्याने त्या दोन्ही वाटल्या स्चच्छ करून पिण्याच्या पाण्याने भरुन आणून दिल्या. ते वृद्ध जोडपे एकमेकांकडे बघत होते.

‘हे पहा आम्हाला या ठिकाणी जायचे आहे. आम्ही या गावात नवीन आहोत. आम्हाला कसे जायचे हे सांगायला थोडी मदत करणार का?’ आजोबांनी विचारले.

थोडे थांबा’ असे म्हणुन तो निग्रो तरुण आत गेला आणि गावाचा नकाशा घेऊनच बाहेर आला. त्याने तो नकाशा आजोबांना देताना म्हणाला ‘आत्ता तुम्ही या ठिकाणी आहात. तुम्हाला येथे जायचे आहे. हा बघा हा रस्ता तुम्हाला सरळ तेथे घेऊन जाईल.’ म्हातारबुवांनी बघीतले. त्या निग्रो तरुणाने नकाशावर पेन्सिलने व्यवस्थित खुणा केल्या होत्या.

त्या आजिबाई त्या निग्रो तरुणाचे आभार मागताना म्हणाल्या. ‘तुझे नाव काय? तुझे बिझनेस कार्ड असेल तर मला दे.’

‘सॉरी मॅम! माझ्याकडे बिझनेस कार्ड नाही कारण मी सध्या टेम्पररी नोकरीवर आहे. पण हॉटेलच्या बिझनेस कार्डवर माझे नाव लिहुन देतो. परत या बाजुला आलात तर आमच्या हॉटेलवर जरुर या!’ असे म्हणत त्या निग्रो तरुणाने आपल्या खिशातुन हॉटेलचे बिझनेस कार्ड काढले, त्यावर पेनने आपले नाव लिहीले आणि ते कार्ड आजीबाईंना दिले.

पंधरा दिवस असेच गेले आणि त्या निग्रो तरुणाच्या नावाने एक भला मोठा लिफाफा पोस्टाने आला. तशी त्याला पत्रे वगैरे फारशी येत नसत. हा लिफाफा कोणाचा म्हणुन त्याने उघडुन बघीतला. ओ कॅफे हॉटेलचे लेटर हेड बघुन तो चमकला. ओ कॅफे ही त्याकाळची अमेरिकेतील अत्यंत नावाजलेली अशी हॉटेल्सची साखळी होती. अमेरिकेतील बहुतेक मोठ्या आणि महत्वाच्या शहरांमध्ये ही हॉटेल्स होती. बहुतेक हॉटेल्स पंचतारांकीत होती. ओ कॅफे हॉटेल्समध्ये काम करायला मिळावे अशी अनेकांची ईच्छा असायची.

ओ कॅफे हॉटेलकडुन कसले पत्र आले आहे हे बघावे म्हणुन तो पत्र वाचु लागला आणि उडालाच. त्याला चक्क इंटरव्ह्युचा कॉल आला होता. त्याच्या शहराजवळच ओ कॅफेचे एक नवीन पंचतारांकीत हॉटेल सुरु झाले होते. तिथे त्याला इंटरव्ह्युला बोलावले होते. पण आपण अर्ज केलेला नसताना आपल्याला इंटरव्ह्युचा कॉल कसा आला याचे त्या आश्चर्यच वाटत होते.

तो इंटरव्ह्युच्या दिवशी त्यातल्या त्यात चांगला पोशाख करुन आणि आपली फाईल घेऊन इंटरव्हुला हजर झाला. या हॉटेलमध्ये आपल्याला वेटरची नोकरी मिळाली तरी पुष्कळ झाले असे त्याला वाटले. त्याने रिसेप्शन काऊंटरवर आपले इन्टरव्ह्युचे लेटर दिले. त्याला सांगण्यात आले की हॉटेलचे चेअरमनसाहेब स्वतः त्याचा इंटरव्ह्यु घेणार आहेत. त्याला आश्चर्यच वाटले. थोड्याच वेळात त्याला हॉटेलच्या सातव्या मजल्यावर असलेल्या चेअरमन साहेबांच्या ऑफीसमध्ये नेण्यात आले. त्यांचे ऑफीस चांगले भव्य होते. थोड्याच वेळात त्याला आत बोलावण्यात आले. तो चेअरमन साहेबांच्या भव्य केबिममध्ये शिरला. त्याने समोर नजर टाकली आणि तो उडालाच.

चेअरमन साहेबांच्या डेस्कच्या मागे तेच वृद्ध जोडपे बसले होते जे त्याच्या हॉटेलमध्ये आले होते.

‘मी जॉन ओ किफे. या माझ्या पत्नि लिलियन ओ किफे. ओ किफे चेन हॉटेल्स आमच्या मालकीची आहेत.’ ते आजोबा म्हणाले.

‘त्या दिवशी रात्री तु आम्हाला जी माणुसकीची वागणून दिलीस त्यामुळे आम्ही भारावुन गेलो आहोत. हल्ली अशी माणुसकी बघायला सुद्धा मिळत नाही.’ आजीबाई म्हणाल्या

‘मला तुझ्यासारखी माणुसकीची जाण असणारी माणसेच माझ्या हॉटेलसाठी हवी आहेत. मी या हॉटेलच्या जनरल मॅनेजर पदासाठी तुझा विचार करतो आहे. तु आमच्या हॉटेलमध्ये जनरल मॅनेजर म्हणुन जॉईन होशील का?’ ओ किफे साहेब म्हणाले.

‘जनरल मॅनेजर?’ तो निग्रो तरुण चांगलाच उडाला होता, ‘सर! पण मी या पदासाठी लायक आहे का? कारण माझे शिक्षण--- ‘

‘आम्ही तुझी सर्व माहिती काढली आहे.’ ओ किफे साहेब मधेच त्याला थांबवत म्हणाले, ‘घरच्या परिस्थितीमुळे तुला काही फारचे शिक्षण घेता आले नाही हे आम्हाला कळले. तसेच तुझ्या काळ्या रंगामुळे पण तुला कुठे चान्स मिळत नाही हे पण आम्हाला समजते. पण माणुसकी काही शिकवून मिळत नाही. ती उपजतच असावी लागते. आम्ही शरीराचा कलर, जाती, धर्म असा भेद करत नाही. आम्ही माणसातील गुणवत्तेला महत्व देतो. त्या दिवशी रात्री आम्ही तुझी परिक्षा घेत होतो त्यात तु उत्तम मार्काने पास झाला. जेव्हा तु आमच्या चहाचे आणि ब्रेकफास्टचे पैसे तुझ्या खिशातुन हॉटेलच्या गल्यात टाकलेस तेव्हाच आमच्या लक्षात आले की तु नुसताच प्रामाणीक माणुस नाहीस तर ऊत्तम कॅरॅक्टर असलेला माणुस आहेस. आमच्या या हॉटलचा जनरल मॅनेजर म्हणुन तुझे स्वागत असो!’ ओ किफे साहेब म्हणाले आणि त्यांनी त्या निग्रो तरुणाशी शेकहॅन्ड केला.

कधी कधी माणुसकीची आणि कॅरॅक्टरची अशी पण किंमत मिळते.

(एका सत्य घटनेवर आधारीत)

Wednesday, 23 June 2021

ध्यान साधनेची लस


      आजच्या कोविडच्या वातावरणामुळे प्रत्येकाला भयभीत केलंय. आणि ही भीती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एका ठराविक कालावधीपेक्षा जास्त दिवस भीती, नकारात्मक विचार, चिंता, काळजी हे कायम राहीलं तर त्यातून मानसिक आणि शारीरिक व्याधी निर्माण होतात. आणि तस चित्र आज सर्वत्र दिसतय. हा कोरोनाचा विषाणू अनेकांना झपाट्याने  आपला विखारी डंख मारत सुटलेला असताना...आपले लोक, आपल्या जवळचे लोक अत्यवस्थ अवस्थेत असताना,  मरत असताना आपलं मन शांत कस राहू शकेल? असा प्रश्न कित्येकांना पडू शकतो. आणि हा असा  विचार येणही सहाजिकच  आहे. पण या अस्वस्थ,बेचैन, भयभीत मनःस्थितीला , नकारात्मक विचारांना सावरण खूप गरजेचं आहे. नाहीतर ही भीतीच अनेक निरोगी लोकांनाही  विविध रोगांनी ग्रस्त करून टाकेल...अगदी प्रदीर्घ कालावधीसाठी.

      मग करायच तरी काय? कसे थांबवावेत हे विचार? अस्वस्थ मनस्थिती स्थिर कशी होणार? ही चिंता, हे वाढत भय, भयाण वातावरण असल तरी त्याच्याशी सामना करण्याचं बळ आपल्याला कस येणार? असे अनेक प्रश्न अनेकांना पडू शकतात. 

       यावर आहे एक उत्तम उपाय.... कोणत्याही औषधाशिवाय ही भीती, चिंता, मानसिक ताण,अस्थिरपणा दूर होऊ शकतो. आपलं मन आलेल्या वातावरणाशी झुंजायला सक्षम होऊ शकत. किंवा जरी दुर्दैवाने आपल्याला काही   आजार झालाच तरी सहीसलामत यातून आपण बाहेर पडू शकतो. तो उपाय म्हणजे.... ध्यान! (मेडिटेशन).

      ध्यानाने मन शांत होत. चंचल मन एकाग्र होत.सकारात्मक होत.आणि मन शांततेच्या आल्हाददायी कारंज्यात भिजून निघालं  की कोणतेही बाहेरील विचार आपल्याला त्रास देऊ शकत नाहीत. ध्यानाच्या अधिकाधिक साधनेने, सरावाने भीती,अवस्थपणा, मानसिक ताण पर्यायाने शारीरिक ताण नाहीसा होतो. आंतरिक शक्ती वाढल्याचे जाणवते. कार्यक्षमता वाढते. व्यक्ती सृजनशील झाल्याची जाणीव होते. 

      ध्यानाचेही शुद्ध शास्त्र आहे. ध्यानाचा शास्त्रोक्त अभ्यास करणे महत्वाचे आहे. ध्यान म्हणजे आपल्या प्राणशक्तीला - इच्छा शक्तीच्या अधिन आणणारी शक्ती!

        ध्यान म्हणजे  नुसतेच मांडी घालून ,डोळे मिटून बसणे नव्हे. ध्यानाद्वारे आपल्या देहात,अंतरात प्राणशक्ती निर्माण करणे आणि शरीर हे प्रत्यक्ष ऊर्जेचे स्रोत बनवणे .

        शरीरातील स्नायू,पेशी,हाडं, मज्जासंस्था, रक्त या सर्वांमध्ये ऊर्जा साठवलेली असते. ही ऊर्जा दैनंदिन जीवनात सतत वापरली जाते. मग अशीच अधिकाधिक ऊर्जा आपण आपल्या इच्छाशक्तीच्या वापराने ध्यान साधनेच्या शास्त्र शुद्ध पद्धतीतून  निर्माण करू शकतो.आणि आपली प्राणशक्ती अधिकाधिक चैतन्यमय बनवू शकतो. शरीरातील पेशी अधिकाधिक क्रियाशील होतात. त्यामुळे आपल्याला शांत,  सकारात्मक वाटू लागतं. कोणतेही आजार आपल्या जवळ येऊ शकत नाहीत, आणि आले तरी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आपण त्यावर मात करू शकतो.

      ध्यानातही विविध तंत्र असतात, त्यातील विशिष्ट तंत्र, प्राणायाम,श्वासावर नियंत्रण या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे शरीरात निर्माण होणारी शक्ती(ऊर्जा) आणि त्याद्वारे राखले जाणारे मानसिक, शारीरिक संतुलन!

      ध्यानाच्या विज्ञानाला राजयोग म्हणूनही ओळखले जाते.. म्हणजेच ईश्वर प्राप्तीचा राजमार्ग!

        आपलं मन एखाद्या चुंबकासारखं असत. चांगले विचार केले तर आपण स्वतः कडे सगळं चांगलच आकर्षित करू, सतत भीतीदायक  निराशाजनक, नकारात्मक विचार केले तर आपल्याला मिळणारं फळही तसच असत. आपण चिंता, भय, अस्वस्थपणा आपल्या नकळतच आकर्षित करत असतो.आणि नकारात्मक विचारांनी सकारात्मक आणि प्रसन्न जीवन कधीच जगता येत नाही.

       ध्यान करणे आणि त्यातून मिळणारा आनंद  अनुभवणे हे प्रत्यक्ष ध्यान केल्याशिवाय कळू शकणार नाही. 

       आपल्या दैनंदिनीत कितीतरी वेळ आपण वाया घालवत असतो. त्यातून ध्यानासाठी आपण  २० मिनिटं  दिली तर आपणच रोज नव्याने रिचार्ज होऊ शकतो. ९० दिवस आपण सातत्याने ध्यान केलं तर आपल्यामध्ये आणि आपल्या आजूबाजूलाही त्याचा परिणाम दिसू शकतो. आपल्या स्वभावामध्ये, वर्तनामध्ये, बोलण्यामध्येही चांगली सुधारणा होऊ शकते. 

       दैनंदिन धावपळीच्या युगात, सतत कोणत्या न कोणत्या ताणात असलेले आपण, काही  कारणांनी आनंदी होतो....हो ना? किंवा आनंदी होण्यासाठी कारण शोधतो. पण कायम स्वरूपी आनंदी ,प्रसन्न ,ताणमुक्त राहण्यासाठी ध्यान साधनेची लस कायम स्वरूपी घेतली तर अशी कोणतीही कारण कधीही शोधण्याची गरजच नाही. मनाला अशा पद्धतीने सक्षम करायला, मनालाच समजून सांगावं आणि तयार कराव म्हणजे ध्यान ही फक्त एक क्रिया म्हणून होणार नाही तर शास्त्र शुद्ध चैतन्याचा स्रोत नक्कीच होईल आणि मन होईल  सकारात्मकतेच आगर! 


©® सौ अश्विनी कुलकर्णी

   सांगली

Thursday, 17 June 2021

आरोग्य

        सध्या सगळ्यात जास्त महत्त्वाचे काय आहे अस जर कोणाला विचारल तर 80% लोक हेच सांगितलं की आपल आरोग्य सगळ्यात महत्त्वाचे आहे. कोरोनानी आपल्याला दिलेल्या शिकवणीत महत्त्वाची ही शिकवण आहे आणि नक्की ते सर्वांना पटले असावे, असे मला वाटते. खर तर आपल्या पूर्वजांनी पूर्वीच आपल्याला शिकवल आहे आरोग्यंम धनसंपदा. आपण मात्र ते आरोग्य आणि धनसःपदा अस वेगवेगळे केले आणि त्यातली संपदा महत्त्वाची मानली. 

   त्यात आपण हेही विसरलो हे आपल शरीर आहे ते मशिनसारख काम करत असेल तर ते मशिन कधीकधी सव्हिंसिंग मागत. त्याची एक सिस्टीम आहे, त्यात बिघाड होऊ  शकतो , तीपण दुरूस्त करायला लागते .  

  लोक सांगतात अहो माणूस काल पर्यत चांगला होता अचानक त्याला हार्टॲंटॕक आला. पण मला सांगा शरीर खरच काहीच इशारा देत नाही का? 

   स्त्रियांचे असे काॕमन आजार आहेत जे १०० पैकी ८० स्त्रीयांना होतात . ज्यातला एक आजार म्हणजे गर्भाशयाचा आजार . पण किती स्त्रीया याची काळजी घेतात. यावर एक साधा उपाय आहे तो म्हणजे स्त्रीयांची मासिक पाळी बंद झाली की एकदा डाॕक्टर कडे जाऊन तपासणी करून घ्यायची असते, पण आज कमवत्या अगदी ऊच्च शिक्षित महिला सुध्दा हे करताना दिसत नाहीत. ब्यूटीपार्लर मध्ये चार तास घालवणार्या बायकांकडे डाॕक्टर कडे जाण्यासाठी वेळच नसतो.

साध डोक तर दुखतय त्या साठी कशाला डाॕक्टर कडे जायच ? मान्य , पण हे जर वारंवार होत आहे तर प्रत्येक वेळी पेनकिलर घेऊन काम चालवण किती योग्य आहे ? 

  मागच्या आठवड्यात मला पण असच झाल होत मी हाहा उपाय केला आजपर्यंत त्रास नाही .तू पण हे करुन बघ. कशाला डाॕक्टर हवा.  पण एखाद्याला निळा रंग आवडतो तर एखाद्याला नाही आवडत,, एवढा बाह्य बदल आपल्याला मान्य आहे, मग तुमच शरीर आतून एकच असेल ? कस काय शक्य  आहे? 

    आता वेळ आली आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा. आतातरी आपण जर विचार नाही केला तर आपल्या हातात काहीही राहणार नाही . आपणही ह्या निसर्गाचा अविभाज्य भाग आहोत, त्याने मोठ्या मेहनतीने कदाचित हा मानव बनवला असेल जो सगळ्याच संवर्धन करण्यासाठी त्याने बनवला आहे .त्यासाठीच त्याला सगळ्यात मोठी ताकद दिली आहे ती म्हणजे बुद्धी . तिचा वापर करा आणि विचार करा .


  - समूदेशक सुजाता डोंगरे 

   

Thursday, 10 June 2021

सकारात्मक राहून, रोगप्रतिकार शक्ती वाढवा

      सद्याची कोविडची परिस्थिती.... आणि त्यावरील सोशिअल मिडीया वरील बातम्या,

      ब्रेकिंग न्युज च्या सरपटणाऱ्या मसालेदार- चटपटीत पट्ट्या, ह्यामुळे निरोगी व्यक्तींच्याही हृदयाची धडधड  वाढू लागली आहे. त्याच त्यांचं गोष्टींची घराघरात चर्चा, फोन वरून गप्पा, आजाराचे फॉरवर्ड मेसेज, आजारावरील उपायांचे शेकडो मेसेज, आजार होऊन गेल्यावरचे  नुकसान.... धुमाकूळ घातलाय या मेसेजनी.यामुळे तर  लोकांना घरबसल्या आजारी असल्यासारखं वाटू लागलंय. जरा काही झालं ... शिंक आली, ढास लागली तरी  आपल्याला काय होऊ लागलय ? कोरोना तर नाही ना? अशा कोरोना बद्दलच्या विचारांच्या चक्रव्यूहात लोक अडकू लागलेत. स्वतः घाबरून दुसऱ्यांनाही घाबरवत आहेत.   कित्येक जण फक्त टीव्ही वरील बातम्या बघून भीती, चिंता आणि नकारात्मक मानसिकतेने त्रस्त झाले आहेत. त्याचे शरीरावर वाईट परिणाम होताना दिसत आहेत.

   मान्य आहे हे वातावरण भीतीदायक आहे. पण यातून आपल्याला आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवायचे आहे. त्यासाठी काय काय करता येईल?

   पूर्वीच्या रोजच्या दैनंदिन कामात, धावपळीत अनेक गोष्टी राहून गेलेल्या असतील. त्याला एक उजाळा द्यायचा. अस एकही घर नसेल की जिथे एकही पुस्तक नाही. अनेक पुस्तक घरी असतात, नंतर वाचू म्हणून तशीच ठेवलेली. सामाजिक,  कौटुंबिक, अध्यात्मिक असतील, कविता संग्रह , कथा संग्रह, कादंबऱ्या असतील. काढा त्या बाहेर.....रोज थोडं जरी वाचलं तरी विचारांना वेगळी दिशा मिळू शकते.  रोज एखाद्या पुस्तकातील  थोडं तरी वाचन,मनन,चिंतन करून एखाद्या आवडलेल्या मुद्यावर लिहिता येऊ शकत. आपले विचार मांडून व्यक्त होता येऊ शकत. एक चांगला विचार...पूर्ण विचारांती जर खरोखर आचरणात आणला, तर पूर्ण आयुष्य बदलू शकतो. मग चांगल्या विचाराच बीज आपल्यामध्ये पेरलं तर त्याचे अंकुरही साहजिकच हिरवे आनंद देणारे असतील. आणि दुसर्यांसाठीही हे आदर्श उदाहरण ठरेल.

    अनेक माता भगिनींनी मागील वर्षी लॉक डाउन मध्ये विविध, उत्कृष्ठ पाककृती केल्या. त्या जर एकत्रित लिहून काढल्या तर त्याचा उत्तम संग्रह होऊ शकेल. त्यातून मिळणारा आनंद वेगळाच असेल.

  अनेक जण सोशिअल मीडिया वर नुसतच लाईक व कंमेन्ट देत असतात. त्यांचं वाचन फक्त मोबाईल हातात धरून काय समोर येईल ते आणि तेव्हढंच वाचायचं! खर वाचन म्हणजे फक्त सोशिअल मीडिया नव्हे....हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आपले अनेक धर्मग्रंथ भगवतगीता,

     विविध ग्रंथांनी आपल्या मस्तकावर वरदहस्त ठेवलाय. कस वागावं,कस बोलावं, आलेल्या परिस्थितीत संयम कसा राखावा, मनस्थिती दोलायमान होताना ती स्थिर कशी करावी? मनःशांती कशी टिकवावी...हे तर  अनेक उत्तम उदाहरणं व दाखल्यांसह आपल्याला  पटवून दिलंय...याचा अभ्यास  अशा कठीण परिस्थितीतील शरीर व मानसिक स्वास्थ्यासाठी फारच फलदायी ठरतो.

      काही जण उत्तम लिहितात, लेख ,कविता, गजल,ललित , पुस्तक परीक्षण, रसग्रहण आदी प्रकार. त्यांना लिहायची आवड असतेच आणि लिखाणातून व्यक्त होण तर जीव की प्राण असतो त्यांचा! त्यांनी गुंतवून घेतलंय म्हणण्यापेक्षा त्यात ते आनंदी आहेत  अस म्हणावं लागेल. त्यामुळे त्यांचा जीवन कळलंय... असच म्हणावं लागेल!

       याहून अधिक काय?.... तर छंद जोपासता येतील. राहुन गेलेलं भरतकाम, शिवणकाम नव्याने करता येईल. स्त्री ही 'सृजनाचही सृजन' आहे. त्यातून काही नवीन शोधेल ती  नक्कीच!

        काहीजण शिकले होते संगीत...पण राहील होत अर्धवट. त्याला जवळ करा. ऐका संगीत!जस जमेल तसं चित्र काढा ..  रंगांच्या दुनियेत हरवून जा. ध्यानस्थ व्हा आवडीच्या गोष्टीत!

        आली आहे कठीण परिस्थिती....पण  घरबसल्या  काय करता येईल ह्या  अशा विचाराना थोडं हलवायला हवं. अनेक गोष्टी समोर येतील, मार्ग व दिशा मिळू लागतील. मग विचार मनाच्या पेल्यातून ओसंडून वाहू लागतील.. हे करुया...ते करुया... अनेक गोष्टीनी हा आनंदाचा पेला भरून वाहू लागेल. हा आनंदच एक प्रकारचं ध्यान आहे. जेव्हा हा आनंद अणू व रेणू बनून मेंदूत पसरेल, तेव्हा जाणवेल...मन व सगळं शरीर शांत असेल...कोणतीही अस्वस्थता, भय, चिंता नावालाही नसेल. 

       आता वेळच नसेल अवांतर, नकारात्मक विचारांना... कारण आपला आनंद आपल्यातच होता,आणि तो आपण शोधलाय! शरीरासाठी पौष्टीक अन्न खातोय, तस मनानेही आशावादी, आनंदी स्पदनाना आकर्षित केलं असेल, आणि  तेही सकस विचारांचं , निरोगी झालंय आता. हो ना?



©® सौ अश्विनी कुलकर्णी

सांगली

Monday, 7 June 2021

बॅड पॅच


   जीवनाच्या वाटेवर, विविध रंगात आपण  रंगून गेलेले असताना, अचानक येतात काही पॉझ, वेगवगळे प्रसंग घेऊन. कुठेतरी सगळं थांबल्यासारखं, बिथरल्यासारखं वाटत. हे वागणं , अस वाटण, ही अवस्था माणूस म्हणून जगताना, प्रत्येक मनुष्य समाजातील प्रत्येक जीवाकडून, घटकांकडून,   प्रसंगानुसार, परिस्थितीनुसार, वातावरणानुसार,  वेळेनुसार विविध अनुभव घेत असतो. आलेल्या अनुभवांना ,मिळवलेल्या क्षणांना, दिवसाना, वर्षांना आपण सुखद, दुःखद, आशादायी, निराशादायी, प्रेरणादायी, ऊर्जा देणारे, ऊर्मी देणारे, सकारात्मक अशी अनेक  लेबलं लावत असतो. 

       त्यातीलच एक असा कालावधी, जो अनेक व्यक्ती अनुभवतात. थोड्या फार कमी जास्त फरकाने असा कालावधी मनुष्याच्या जीवनात कधीही येऊ शकतो. मग तो शारीरिक, मानसिक, आर्थिक कोणत्याही समस्या , कठीण प्रसंग, आघात, घरगुती समस्या,कलह,  नात्यांमधील दरी, सामाजिक  क्लेश , प्रेमभंग, घटस्फोट, अत्याचार, कोर्ट कचेऱ्या, नोकरी जाणे, नोकरीत अडचणी येणे ,इस्टेटीच्या गोष्टी... या समस्यां सोडवताना शेवटी मानसिक त्रास होतो तो वेगळाच ..अशा एक ना अनेक गोष्टी चा सामना करावा लागतो. अशा कोणत्याही रुपात येऊन 'आ' वासून उभा राहतो तो एक 'बॅड पॅच'. 

     मनुष्याच जीवन सुरळीत सुरू असताना, प्रत्येक व्यक्ती ह्या बॅड पॅच ला बळी पडते.काय असतो हा बॅड पॅच? ....कधी भूतकाळातील आपल्याच चुकांचा वर्तमानातील परिणाम बॅड पॅच म्हणून समोर येतो.  परिस्थिती, शारीरिक,मानसिक , आर्थिक समस्या आणि इतर अनेक घटक याला कारणीभूत असतात. ह्या समस्या किंवा संकटं सांगून येत नसतात. प्रत्येक व्यक्तीगणिक वेगळ्या  असणाऱ्या ह्या समस्यांचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळा होऊ शकतो. 

   हे  बॅड पॅच  जीवन विस्कळीत करून टाकतात. अगदी काही वेळेस होत्याच नव्हतंही होत.   कित्येक वेळेस चूक असो वा नसो असे काही विचित्र प्रसंग आणि अनुभव येतात की  या सर्वातून मग निराशा, उदासीनता, चिंता, भय, नकारात्मक विचार सुरू होतात.

   प्रत्येकालाच वाटत असत की हे असे बॅड पॅच मलाच का? माझ्याच वाट्याला अशी दुःख का येतात? पण अशी कोणतीही व्यक्ती नाही जिला एकही दुःख ,वेदना कधीही झालं नसेल. त्यामुळे आलेल्या प्रसंगांना स्वीकारून, सामोरे जाण्याचे मार्ग निवडणे. आपल्या जीवनातील ह्या कठीण प्रसंगात आपल्याच दृष्टीकोनाची  ही परीक्षा असते. 

   विवेक बुद्धी, सारासार विचार,  ज्ञान व कृतीच्या संगमाने, मनाच आणि शरीराच  संतुलन आपण स्वतःच करू शकतो.  आपले धैर्य आणि कमी झालेला आत्मविश्वास नक्कीच परत मिळू शकतो. आणि परत सगळं पूर्ववत होऊ शकत.

      पण हिम्मत न हारता  चिकाटीने प्रश्न सोडवताना, इथे स्वयंप्रेरणा  खूप महत्वाची आहे. 

   आपण स्वतःच ह्या बॅड पॅच च्या मुळाशी जाऊन शोध घेतला पाहिजे. यालाच रूट कॉझ अनालिसिस म्हणतात. म्हणजेच आपल्या भूमिकेत आपली कुठे चूक झाली ह्याचं थोडं खोलात जाऊन आपणच उत्खनन कराव.  नेमक्या चूका आणि समस्या सापडत गेल्या की त्यावर उत्तरही आपल्यालाच शोधता येतं. त्यासाठी आपणच आत्मशोध घेणं गरजेचं आहे. मग आपल्यातच आपण काय सुधारणा केली पाहिजे हे लगेचच कळू शकत. हेच बॅड पॅच नव्या दिशा दाखवतात, नवे मार्ग मोकळे करून देत असतात. मग ही संधी म्हणून बघायची की हताश होऊन निराशेच्या गर्तेत स्वतःला झोकायच? 

   आपल्यासोबत घडलेल्या चांगल्या वाईट  गोष्टी, त्याचे परिणाम, आपली मानसिकता, आणि त्यावर आपण घेत असलेले निर्णय याबाबत    स्वतःला शोधताना काही वेळेस मित्राचं, वरिष्ठांच, वेळ लागली तर तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शनही जरूर घ्यावं.

    काही वेळेस काही संकटं, घटना ह्या तात्पुरत्या स्वरूपाच्याअसतात तर काही गंभीर आणि परत परत येणाऱ्या.   पण सर्वच घटनांमध्ये ,प्रसंगांमध्ये अतिशय शांत चित्ताने, संयम राखून विचार व कृती करणे हितावह असते.

    श्रीकृष्णांनी हजारो वर्षांपूर्वी सर्व विश्वाला भगवत गीतेच्या माध्यमातून दिलेल्या संदेशात  जीवनात येणाऱ्या सर्व समस्या,त्याची कारण,आणि त्यावर विविध दाखल्यांद्वारे  केलेले समाधानी निवारण आहे.

 कारण हा जीवनातील समस्यांचा रामबाण उपाय आहे!

भगवान सांगतात, मनातून संशयांच्या बिजाच उच्चाटन करा. रागावर नियंत्रण ठेवा.मनावर ताबा ठेवावा.त्याला अनावश्यक भरकटू देऊ नये.जीवनाचं ध्येय ठरवून त्याकडे नेटाने वाटचाल करा.आपण स्वतःवर विश्वास ठेवावा.

आणि चांगल्या कामात ईश्वरी मदत मिळते यावरही विश्वास ठेवावा.मनाची चंचलता नष्ट करण्याचा प्रयत्न करा.प्रत्येक क्षण माणसाला नवी शिकवण देतो.प्रयत्नांना यश मिळतेच.फक्त ते मनापासून व न कंटाळता करावे.आत्मसन्मान टिकवावा,पण अभिमान नसावा.स्वकर्तृत्वावर विश्वास हवा.मनाने कधीहि कमकुवत बनू नये.बुद्धीचा योग्य वापर करा.ज्ञानप्राप्तीने जीवन  यशस्वी होते.भीतीचा त्याग करून नेटाने प्रयत्न करा.

    खर तर, बॅड  पॅच हाच जीवनातला खूप मोठा टर्निंग पॉईंट असतो.  मी तर अस म्हणेन की जीवनात येणारे असे बॅड पॅच नवे टर्निंग पॉईंट घेऊनच येतात. नवीन शिकवण देण्यासाठी! 

      मग अशा वेळीश्रीकृष्णांनी दिलेल्या ह्या दिव्य संदेशाच आचरण केलं तर  बॅड पॅच मधून सहजच बाहेर पडता येऊ शकेल आणि जीवनातील नव्या टर्निंग पॉइंट कडे , नव्याने वाटचाल करता येईल. आत्मशोध घेऊन , स्वतःच स्वतःचा सूर्य होऊन!


©® सौ अश्विनी कुलकर्णी,

सांगली

(लेखिका या य. च. म. महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिकचे कन्या महाविद्यालय, मिरज अभ्यासकेंद्राच्या विद्यार्थिनी आहेत.)

Saturday, 29 May 2021

चुकीची छाप

      रोजच्या दैनंदिन जीवनात आपला संपर्क अनेक व्यक्तींशी येतो. त्यापैकी आपण काही व्यक्तींना बरोबर ओळखतो. काही व्यक्ती ओळखण्यात आपण चूक करतो. एखादी व्यक्ती चुकीची वाटल्यास आपण त्या व्यक्तीबद्दल अनेक मते तयार  करतो. एखादी व्यक्ती आपल्याला मैत्रीस योग्य वाटते तर एखादी व्यक्ती अयोग्य वाटते. एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती नसल्यामुळे त्याबाबत चुकीचे मत तयार करणे याला चुकीची छाप म्हणजेच Mistaken Impressions असे म्हणतात. आपण अपुऱ्या माहितीवरून एखाद्या व्यक्तीला आकार देत असतो. जेव्हा चटकन एखाद्याचे मूल्यमापन करतो तेंव्हा आपण आपल्या मानसिक पातळीवरती जवळचा मार्ग शोधतो. त्यामुळे चुकीचा निर्णय घेतला जातो. चुकीची छाप पडण्यामागे काही कारणे आहेत. त्यामध्ये साचेबंदपणा, सकारात्मक व नकारात्मक पूर्वग्रह आणि आरोपण इत्यादी घटकांचा परिणाम होतो. 


१. साचेबंदपणा : आपण बरेचदा एका समस्येतून सर्वच व्यक्तींबद्दलचे मूल्यमापन करत असतो. त्यामुळे चुकीची छाप पडत असते. उदा. सगळे शिक्षक सारखेच असतात. पोलीस, वकील, शासकीय क्षेत्रात नोकरी करणाऱ्या व्यक्तींबद्दल साचेबंदपणातून पाहिले जाते. त्यामुळे चुकीची छाप निर्माण होते. चित्रपट, विविध टिव्ही मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका करणाऱ्या पात्रांचे सादरीकरण ठराविक साच्यातून केले जाते. उदा. पुरुष अधिक स्वावलंबी आणि सर्जनशील असतात. स्त्रीया अधिक स्वावलंबी व सर्जनशील नसतात. जाहिरातीमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांनाच अधिक प्रमाणात दाखविले जाते. काही संशोधनानुसार, साचेबंदपणा हा नैसर्गिक व आपोआप येत असून साचेबंदपणाविषयी सार्वजनिक जीवनात आक्रमक प्रतिक्रिया दिसते. दुर्देवाने साचेबंदपणा नकारात्मक असेल तर त्याचा नातेसंबंधांवर प्रतिकूल परिणाम होतो. 


२. सकारात्मक आणि नकारात्मक पूर्वग्रह : लोकांना काही गुणविशेषणाच्या आधारे चांगले व वाईट असे लेबल लावण्याची वृत्ती आपल्याकडे असते. असे लेबल लावताना आपण व्यक्तींमधील आपण एखादाच चांगला गुण विचारात घेतो व संबंधित व्यक्ती चांगली आहे असे समजतो. काही गुणविशेष नकारात्मक असणाऱ्या व्यक्तीचे संवेदन नकारात्मक होते. उबदार, हुशार, उदयोगशीलता या गुणांच्या आधारे सकारात्मकता ठरवली जाते.  तर माघार घेणाऱ्या, शांत व अबोल व्यक्ती असतील तर त्यांची छाप नकारात्मक पडते. खरेतर व्यक्ती चांगल्या व वाईट गुणांचे एक मिश्रण असते. प्रत्येकाचा इतरांकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो व त्यातून छाप निर्माण होते. 


३. आरोपण : आपण लोकांच्या बाह्य किंवा सभोवतालच्या परिस्थितीचा वर्तनावर होणारा परिणाम विचारात न घेता त्याच्या बाबतीत गैरसमज करून घेतो; त्या संदर्भातील त्रुटी म्हणजे आरोपण होय. आपण वर्तनाचे मूल्यमापन करताना काही मानदंड वापरतो आणि इतरांच्या वर्तनाचे मापन करतो. लोक नेहमी एकाच भूमिकेतून वावरत असतात, असे आपण गृहीत धरतो. उदा. एखाद्याच्या हातून कॉफीचा कप पडला तर त्या संबंधित दोन प्रकारे आरोपण केले जाते. पहिले म्हणजे, ती व्यक्ती अडाणी आहे; तर दुसरे म्हणजे, कॉफी गरम असल्याने कप पडला असेल. खरे सत्य हे आहे की, लोक क्षणिक परिस्थितीशी बांधील असतात. आरोपणाचा सहसंबंध व्यक्तिमत्वाशी जोडला जातो. सभोवतालच्या परिस्थितीचा विचार केला जात नाही असे सामाजिकदृष्ट्या घडत असते. यास मूलभूत आरोपणाची त्रुटी असे म्हणतात. 


शेवटी काय तर एखाद्या व्यक्तीबद्दल आपण किती जाणून घेतो. त्याच्याशी आपल्या आंतरक्रिया कशा होतात यावर अचूक छाप अवलंबून असते. एखाद्या व्यक्तीला सारासार समजून न घेता काढलेला निष्कर्ष हा चुकीचा ठरु शकतो.  त्यामुळे संभाषणाची शैली, सामाजिक मानदंड, शाब्दिक संकेत, अशाब्दीक संकेत, भावनाविष्कार याचे अचूक मूल्यमापन करण्याचे कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. 



 (संदर्भ: उपयोजित मानसशास्त्र : नाईक, शिरगावे, घस्ते, बिराजे) 



Thursday, 27 May 2021

यशप्राप्तीचे मूलमंत्र

 

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी २६ परफेक्ट गुरूमंत्र..


1. *Empower smiling*.

चेहऱ्यावर हास्य असू द्या


2. *Relax yourself*.

आरामशीर / तणावमुक्त रहा


3. *Have a clear understanding*.

आपले विचारात सुस्पष्टता असू द्या


4. *Avoid misconceived thoughts*.

गैरसमज / चुकीचे समज टाळा


5 *Prompt decision - making*.

तात्काळ निर्णयक्षमता


6. *Avoid inferiority complex*.

न्यूनगंड बाळगू नका


7. *Believe yourself*.

स्वतःवर विश्वास ठेवा


8. *Be inspirational*.

प्रेरणादायी रहा


9. *Develop challenging attitude*.

आव्हानात्मक दृष्टिकोन विकसित करा


10. *Be a positive thinker*.

सकारात्मक विचार ठेवा


11. *Have self – encouragement*.

स्वयंप्रेरित रहा


12. *Avoid procrastination*.

चालढकल (दिरंगाई) टाळा


13. *Learn lessons from others*.

इतरांकडून प्रेरणा घ्या


14. *Dont lose your spirit*.

हिंमत / धीर सोडू नका


15. *Think about time-use*.

वेळेचे काटेकोर नियोजन करा


16. *Be smart at all costs*.

नेहमी चाणाक्ष रहा


17. *Be a goal setter*.

ध्येय निश्चित करा


18. *Be punctual*.

तत्पर रहा


19. *Focus Involvement*.

कामावर लक्ष केंद्रित करा


20. *Possess mental alertness*.

मानसिकरित्या तत्पर रहा


21. *Sharpen your intelligence*.

आपली बुद्धीमत्ता अधिक तीक्ष्ण करा


22. *Try to be intellectual*.

बुद्धीमान बनण्याचा प्रयत्न करा


23. *Be co-operative*.

सहकार्याची भावना बाळगा


24. *Avoid fearful feelings*.

मनातील भीतीची भावना टाळा


25. *Strengthen your will power*.

आपली इच्छाशक्ती प्रबळ असू द्या


26. *Never bother about failure*.

कधीही अपयशाच्या तणावाखाली राहू नका


(कॉपी पेस्ट)

Tuesday, 18 May 2021

चला निराशा पळवून लावू

 *मानसिक आजार पळवुन लावणार्‍या चौदा कृती!…*

*कसल्याही प्रकारच्या निराशेला नाहीशी करणारी चौदा सुत्रे*

1) सतत पॉझीटीव्ह -

कितीही वाईट घडो, नेहमी पॉझीटीव्हच रहायचं!

उदा. “एक डोळा गमावला पण दुसरा डोळा शाबुत आहे,” ज्यामुळे मी हे सुंदर जग पाहु शकतो, देवाची किती कृपा आहे.

प्रत्येक अपयश मला एक संधी देऊन जात आहे.

उदा. जेव्हा लोक आपल्याला टाळतात, आपल्याकडे बघुन नाकं मुरडतात, तेव्हा तर अधिकधिक आकर्षक दिसण्याबद्द्ल, आपण जागरुक होतो.

आपली मस्करी उडवली की, आपला कोणी कळत नकळत अपमान केला की, आपल्यातल्या महत्वकांक्षा जागृत होतात.

2) पॅशन निर्माण करा - आयुष्यात पोकळी आणि निराशा आली की एक असं पॅशन शोधावं, ज्यासाठी संपुर्ण आयुष्यच पणाला लावावं.

पॅशन म्हणजे अशी एखादी गोष्ट जी गोष्ट न थकता, अगदी उत्साहाने, महिन्याचे तीस दिवस, दिवसातल्या दहा-बारा तासाच्या वर आपण ते करु शकतो, ह्याला म्हणतात पॅशन!

त्या गोष्टीसाठी अक्षरशः आयुष्य झोकुन द्यावं. अगदी स्वतःला विसरायला लावतं, तेच खरं पॅशन!

कोणासाठी व्यापार हे पॅशन असेल, कोणासाठी खेळ हे पॅशन असेल, कोणासाठी भटकंती हेच पॅशन असेल.

त्याच्याशिवाय आपण जगु शकत नाही, आणि मग एके दिवशी जगही आपल्याला त्या एकाच गोष्टीसाठी ओळखु लागतं.

सचिन-क्रिकेट, धीरुभाई-रिलायन्स, अमिताभ-एक्टींग, लता मंगेशकर-गायन, मोदी-नेतृत्व, पटनायक-वाळुची शिल्पे, प्रकाश आमटे-आनंदवन, श्रीश्री रविशंकर गुरुजी – आर्ट ऑफ लिविंग, स्टीव्ह जॉब्ज-गॅझेट्स,

ह्या यादीत आपलंही नाव येऊ शकतं, आपणही आपल्या पॅशनसाठी वेडं बनलो तर!….

३) महिन्याला दोन पुस्तके - माझ्या आयुष्यातल्या अत्यंत वाईट आणि पडत्या काळामध्ये मला फक्त आणि फक्त चांगल्या विचारांच्या पुस्तकांनीच तारलं, नाहीतर कदाचित मी आज हा लेख लिहायला शिल्लकच राहीलो नसतो, इतके पुस्तकांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत.

महिन्याला कमीत कमी दोन तरी चांगली पुस्तके तरी वाचुनच काढेन आणि त्यातल्या चांगल्या गोष्टी तात्काळ जीवनात आणेन, हा चंगच बांधावा, आपोआप जे जे हवे ते सारे मिळत जाते, हा माझा स्व-अनुभव आहे.

4) डायरी लिहा - दररोज घडलेल्या बर्‍या वाईट घटना आपल्याला बहुमुल्य अनुभव देऊन जातात, त्यांना शब्दबद्ध करत गेलं की जगण्याची रंगत वाढत जाते.

माझ्या मनात चाललेले द्वंद बाहेर काढण्यासाठी मला ह्या डायर्‍यांनी खुप मदत केली. झालेले अपमान, आलेले अपयश, भविष्याच्या चिंता, मनाचं रिकामपण, सगळी मळमळ मी बाहेर काढली, आणि प्रत्येक जखम डायर्‍यांमध्ये जपुन ठेवली, आणि शहाण्या बाळांसारखं त्या सर्वांनीही मला त्रास देणं बंदच करुन टाकलं.

आजही माझ्या कॉम्पूटर मध्ये मी स्वतःलाच लिहलेली शेकडो पत्रं आहेत, जी वाचुन मला आता खुप गंमत वाटते. कधी छोट्यामोठ्या कारणाने मी खचलो की ते वाचुन प्रचंड बळ मिळतं. बॅटरी पुन्हा टणाटण चार्ज होते.

5) जे सुरु केलंय त्याचा शेवट करा - हातात घेतलेलं काम पुर्ण करायचं म्हणजे करायचं!

मनावर विजय मिळवण्यासाठी मनाचाच वापर करायचा, काम सुरु होतानाच असं भासवायचं की ते पुर्ण झालेलं आहे, आणि मन गोंधळुन जातं आणि ते पुर्ण करुनच एका जागेवर शांत बसतं!

‘आसान है’ हा यशाचा मुलमंत्र नेहमी लक्षात ठेवायचा!

6) कंफर्ट झोन तोडा. नवी आव्हाने स्वीकारा - तु मागच्या एक महिन्यामध्ये अशी कोणतीही एक गोष्ट केलीस का, जे तुला येत नाही, जे करण्याची तुला भिती वाटते?

7) कमीत कमी तीस मिनीट व्यायाम - मनाला ताजंतवाणं ठेवण्याचा हुकुमी एक्का आहे, शरीराला व्यायाम करायला भाग पाडायचं, मन आपोआप ताळ्यावर येतं!

जगातल्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीला हे सुत्र माहित आहे.

8) ध्यान, सर्व समस्यांवर रामबाण उपाय - तुझं शारीरीक व्यंग हे तुझ्या आयुष्यात कधीही अडथळा बनु शकत नाही, कारण तु म्हणजे तुझं शरीर नाहीस!

खरा तु तर वेगळाच कोणीतरी आहेस, हे तुला ध्यान करायला लागलं की आपोआप उमगत जाईल.

आतापर्यंत केला नसशील तर एकदा आर्ट ऑफ लिविंगचा हॅपिनेस कोर्स नक्की कर.

9) महिन्याला एक वाईट सवय सोडा - आपल्या प्रत्येकामध्ये वाईट सवयी असतात, मी एका महिन्याला एक वाईट सवय सोडायची आहे, आणि एक चांगली सवय जोडायची आहे, असं प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला अंतर्मनाला सांगतो. महिनाभर त्याची कसोशीने अंमलबजावणी करतो.

10) आपल्या आजुबाजुला प्रसन्नतेचा शिडकावा करा - घरातुन बाहेर पडण्याआधी एकदा आरशात बघुन स्वतःलाच वचन देतो की आज माझ्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला मी आनंद आणि प्रसन्नता वाटणार आहे. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर हसु फुलवणार आहे.

कधी एखाद्या उपाशी माणसाला पोटभर खावु घालावं, कधी एखाद्या लहान मुलाशी लहान बनुन खेळावं!

कधी रस्त्याने जाताना कोणाला लिफ्ट द्यावी, कधी जोक्स सांगुन लोकांना खळखळुन हसवावे.

11) जे मिळालयं त्याबद्द्ल कृतज्ञ रहा.

जो कृतज्ञ आहे, त्यालाच ब्रम्हांड अजुन जास्त भरभरुन देतं, हेच सिक्रेट आहे.

आपल्याला मिळालेल्या दहा वरदानांबद्द्ल रोज मनःपुर्वक आभार व्यक्त केल्यास आयुष्यातली सगळी दुःखे आपोआप नाहीशी होतात, याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे.

12) यशस्वी लोकांसोबत मैत्री करा - असे लोक ज्यांनी स्वतःचा ठसा ह्या जगात उमटवला आहे, त्यांच्याशी अधिकाधिक ओळखी कराव्यात, त्यांच्याशी भेटण्याच्या संधी शोधाव्यात.

यश ही उत्साहासारखं संसर्गजन्य असतं!

13) सुरक्षित अंतर ठेवा - जे लोक आपलं मानसिक खच्चीकरण करतात, आपली टर उडवतात, अशा लोकांपासुन चार हात दुर रहावे. निगेटीव्ह लोकांना आपल्या आयुष्यात आणि आपल्या मनात कुठेही स्थान देऊ नये.

14) तीस दिवसांचा प्लान - पुढच्या तीस दिवसात मी काय करणार आहे, ह्याचा प्लान महिन्याच्या सुरुवातीला तयार करुन भिंतीला चिटकवुन टाकावा.

एकेक लक्ष्य साध्य केलं की ‘विजयी’ असं लिहुन त्याचं अगदी उत्साहाने आणि आनंदाने ‘सेलिब्रेशन’ करावं....!!!!


*सुनील इनामदार*

Sunday, 2 May 2021

मानसशास्त्रज्ञांकडून काही सूचना

 

१. विषाणूच्या (व्हायरस) बातम्यांपासून स्वतःला दूर ठेवा. (याबद्दल आपल्याला जे जे माहिती असायला हवं ते एव्हाना माहिती झालेलं आहे).


२. कितीजण दगावले ते पाहत बसू नका. ही एखादी क्रिकेट मॅच नाही की ज्याचा लेटेस्ट स्कोर काय झाला ते तुम्हाला माहिती असायलाच हवं, त्यामुळे याकडे लक्ष देणे पूर्णपणे टाळा.


३. इंटरनेटवर अधिक माहिती शोधू नका, याने तुमचे मानसिक खच्चीकरण होऊ शकते. 


४. गंभीर मेसेजेस इतरांना पाठवणे त्वरित थांबवा. तुम्ही जितके मनाने खंबीर असाल तितकीच खंबीर समोरची व्यक्ती असेलच असे नाही (याने मदत तर होणार नाहीच उलट तुम्ही समोरच्याला डिप्रेशनमध्ये टाकू शकता).


५. शक्य झाल्यास घरात शांत मंद आवाजात आवडते संगीत ऐका. लहानग्यांशी खेळ खेळा, त्यांना छान छान गोष्टी सांगा भविष्यात काय काय करणार याविषयी चर्चा करा. 


६. आयुर्वेदिक काढा, अमृतप्राश, गरम सूप, हळदीचे दूध, ताजे जेवण यांचा समावेश असुद्यात.


७. स्वतःच्या मनाने औषधे घेणे टाळा. आयुर्वेदिक औषधांचा सुपरिणाम सर्वज्ञात आहे, त्यामुळे आपल्या ओळखीच्या आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. (घरगुती आयुर्वेदिक उपचार किंवा ऐकीव औषधे टाळा.)


८. तुमचा सकारात्मक मूड तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला वाढवतो, परंतु तोच मूड नकारात्मक असेल तर तीच रोगप्रतिकारक शक्ती मंदावते आणि विषाणूशी लढा देण्यास कमकुवत ठरते.


९. सर्वात महत्वाचे, हे सगळं एक ना एक दिवस टळणार आहे आणि आपण सर्वजण सुरक्षित होणार आहोत हे ध्यानात ठेवा.... !


१०. तुमचे भविष्यातील आखाडे काय असतील त्यावर लक्ष केंद्रित करा , हीच ती योग्य वेळ आहे जीचा सदुपयोग तुम्हाला तुमची वैयक्तिक आणि व्यावसायिक उद्दिष्टे काय आहेत त्यावर विचार करण्याची..


११. विनोदी चित्रपट, साहित्य पहा कारण विनोदाने बराच ताणतणाव कमी होतो आणि ते एक उत्तम औषध आहे. 


१२. आपल्या परिचीत कोणी अत्यवस्थ असेल, रेमेडिसिव्हीर/ व्हेंटिलेटर/ बेड ची व्यवस्था होत नसेल तरी धीर सोडू नका, सोबत आयुर्वेदिक औषधे चालू करा, अनेक गंभीर अवस्थेतील रुग्ण या औषधाने आजारातून यशस्वीपणे बाहेर आले आहेत.


 

*सकारात्मक रहा.*


(कॉपी पेस्ट) 

Wednesday, 28 April 2021

Ten Careers in Psychology

 To become a psychologist, professionals must earn a minimum of a master’s degree in psychology. However, a bachelor of arts in psychology also prepares graduates for other careers outside the field due to its developmental course offerings: For example, K-12 teachers must also complete similar classes. Other careers that require psychology coursework include human resources managers, registered nurses, or healthcare services managers.

Students should also understand the difference between a bachelor of science (BS) and a bachelor of arts (BA) in psychology to determine which best suits their career goals. A BS in psychology focuses on mathematics and science courses. Students who plan to earn advanced degrees with an affinity for extensive research methodology should consider a BS in psychology.

A BA in psychology emphasizes liberal arts courses. BA programs offer more options that reflect a student’s specific career goals. Therefore, many BA in psychology graduates may use their degree for careers outside of psychology.

Journalist

Journalists conduct research to compose news articles for various media outlets. Research includes following leads, interviewing people about difficult content, and asking questions that allow the journalist to collect pertinent information. Therefore, earning a bachelor of arts in psychology can provide aspiring journalists with a competitive advantage, as psychology coursework explores the way people behave and think.

The average BA in psychology degree includes perception and cognition, social psychology, evaluating psychological research, and perspectives on psychological issues. While entry-level positions require a bachelor’s degree at a minimum, students may want to consider earning an advanced degree to stand out among other applicants.

Criminologist

Criminologists serve as analysts or scientists who identify the causes of criminal behavior through data collection and statistical analysis. Criminologists may interview officers or incarcerated felons to develop psychological profiles. Therefore, professionals often work in law enforcement or government settings.

Earning a bachelor of arts in psychology can benefit future criminologists by allowing students can tailor the degree to fit their career goals. Furthermore, a bachelor’s degree in psychology contains courses that provide knowledge and skills criminologists need to excel in their job. Entry-level positions typically require a bachelor’s degree from an accredited university. Leadership or management roles may require an advanced degree.

Human Resources Manager

Human resources managers stay up to date on all local, state, and federal laws that impact benefits and organizational activities. These managers oversee compliance, productivity, and effectiveness. Human resources management also requires professionals to identify ways to improve policies and implement change. This role relies heavily on effective communication.

Earning a bachelor of arts in psychology explores human behavior or social psychology, which assists human resources managers in achieving tasks that require interacting with incumbents and executives. While some organizations accept candidates with a bachelor’s degree, many organizations prefer applicants with an advanced degree.

Political Scientist

Political scientists conduct research on topics relating to the political system both nationally and internationally. This role also requires professionals to gather and assess data from surveys, evaluate policies, remain up-to-date on events, and forecast trends.

Political scientist roles typically require a master’s degree or Ph.D. For instance, popular master’s programs include a master of public administration or public affairs. A BA in psychology provides students with foundational knowledge and skills, such as cognitive and social explanations regarding human behavior, the development of belief systems, and the decision-making process.

Social Worker

Social workers develop solutions for clients struggling with everyday issues. Responsibilities include identifying people in need, creating pathways for clients to adjust to life changes, researching resources or solutions to modern dilemmas, improving clients’ quality of life, monitoring progress, and offering psychotherapy assistance.

Earning a bachelor of arts in psychology addresses many of the topics social workers need to do their job. While entry-level positions exist, leadership roles require a master’s degree or Ph.D. Therefore, students should plan to continue their education. Additionally, social workers also need to obtain a state license or certification for nonclinical work.

Substance Abuse, Behavioral Disorder, and Mental Health Counselor

Substance abuse, behavioral disorders, and mental health counselors assist patients struggling with one or more disorders. Duties include assessing a patient’s condition and readiness to begin treatment, educating the client’s families, uncovering factors that prohibit recovery, developing treatment plans, and collaborating with other care team members.

Entry-level positions require a bachelor’s degree from an accredited institution. However, many organizations also require applicants to hold a master’s degree, as many states require licensing and up to 4,000 clinical hours for upper-level duties. A bachelor of arts in psychology offers fundamental knowledge and skills that helps students launch their career.

Marketing Manager

Marketing managers collaborate with staff and other department leaders to identify budgets and marketing or advertising campaign plans. Duties include contract negotiation, campaign evaluation, market research, identifying target clients, developing pricing strategies, and hiring staff. Important qualities include analytical, communication, interpersonal, and decision-making skills.

Employers typically look for candidates with a bachelor’s degree from an accredited institution in a relevant field. By earning a bachelor of arts in psychology, students learn about human behavior and social aspects of psychology that could improve their effectiveness in daily tasks. However, students may continue their education to provide a competitive advantage.

Psychologist

Psychologists work with target populations in multiple settings. Psychologists examine cognitive, social, and emotional processes from a client’s experience. Duties include conducting research or studies on human behavior, conducting interviews and surveys, identifying disorders, researching patterns, developing tests that assist in predicting behavior, educating patients and their families, and creating research papers or articles that other professionals can learn from.

For clinical, counseling, or research roles, employers look for applicants with a Ph.D. or Psy.D. Most states also require practitioners to obtain a state license. Therefore, earning a BA in psychology is the first step toward qualifying for this role.

Marriage and Family Therapist

Marriage and family therapists receive mental health training to address difficult clinical issues, including depression, anxiety, marital problems, and family dilemmas. Duties consist of creating safe environments for clients to discuss sensitive information, making action plans to adjust to change, providing guidance in decision making, developing strategies to cope with difficult circumstances, and maintaining client files.

To qualify for this role, candidates should start by earning a bachelor’s degree in psychology, which explores fundamental information needed to proceed to a master’s in psychology, as this role requires a state license and a set number of clinical hours.

School Counselor

School counselors work with students to address academic and social gaps. Daily duties include evaluating student abilities and interests, uncovering issues that prohibit academic and social success, creating action plans to correct issues, collaborating with teachers and students’ families, maintaining records, and reporting instances of neglect or abuse.

School counselors can work in K-12 settings or adult settings as career counselors. Employers look for candidates with a master’s degree as nearly all states require a license to practice. However, earning a bachelor of arts in psychology remains the first step in working toward this career. At the bachelor’s level, candidates may qualify for relevant support roles.

Selecting the best BA in psychology program requires extra consideration, as this field offers multiple professional opportunities. Prospective students should identify specific goals to develop a career pathway. Additionally, tuition varies and many universities offer in-person, hybrid, or online format options.


(Ref: https://www.psychology.org/resources/jobs-with-a-bachelor-of-arts-in-psychology/) 

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

        आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्...